शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

सर्वेक्षणानंतरच वाळूचे लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 1:10 AM

राज्य पातळीवर नेमण्यात आलेल्या पर्यावरण समितीने मंजुरी दिल्यावरच वाळू घाटांचे लिलाव होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वाळू आणि खडी टंचाईमूळे बांधकाम व्यवसाय धोक्यात आला आहे. वाळू पट्ट्यांचे लिलाव रखडल्याने ही टंचाई निर्माण झाली आहे. शासनाने नवीन वाळू धोरण जाहीर केल्याने आता भूजल सर्वेक्षण विभागाने ज्या नद्यांमधून वाळू उपसा करण्यासाठी परवानगी दिली आहे, अशा वाळू घाटांचे खाजगी एजंन्सीकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ही सर्वेक्षण एजन्सी कोणत्या वाळू घाटांमधून किती वाळू उपसावी याचे विवरण गौण खनिज विभागाला देईल. त्यानंतर हे प्रकरण मंजुरीसाठी राज्य पातळीवर नेमण्यात आलेल्या पर्यावरण समितीने मंजुरी दिल्यावरच वाळू घाटांचे लिलाव होणार आहेत.गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यात वाळू तसेच खडीची टंचाई निर्माण झाली आहे. मध्यंतरी अवैध वाळू वाहतुकीने कळस गाठल्याने विभागीय आयुक्तांनी या विरोधात विशेष मोहीम हाती घेतली. त्या नंतर अवैध वाळू उपसा आणि त्याच्या वाहतुकीवर बराच फरक पडला आहे. असे असले तरी वाळू माफियांकडून सद्यस्थितीत अधिकारी तसेच पोलिसांना हाताशी धरून चढ्या भावाने वाळूचे ट्रक, टिप्पर विक्री होत आहे. सध्या शासनाकडून पर्यावरण संवर्धनाला मोठे महत्व दिले जात आहे. त्यामूळे अवैध वाळू उत्खननावर बारीक लक्ष असून, ते जो पर्यंत संपूर्ण वाळू घाटांचे लिलाव होणार नाहीत, तो पर्यंत असेच राहणार असल्याचे सांगण्यात आले.जिल्हा खनिकर्म विभागाने जिल्ह्यात जानेवारी महिन्यात अवैध उत्खनन व वाहतुकीची २३१ कारवाया केल्या आहेत. या कारवाईत संबंधितांना ४ कोटी ८५ लाख १० हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला असून, १ कोटी ४४ लाख ३४ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात जालना तालुक्यात १७ कारवाया करून ३३ लाख ५६ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पैकी २१ लाख ९९ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. बदनापूर केलेल्या १३ कारवायांमध्ये २४ लाख ७० हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला असून, ९ लाख ३६ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. भोकरदन २२ कारवाया करण्यात आल्या आहेत. यात ४५ लाख ६३ हजाराचा दंड आकारण्यात आला असून, यातील १८ लाख २१ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.५६ प्रकरणांत गुन्हे दाखलवाळू उत्खनन, वाहतूक प्रकरणात जिल्ह्यात ५६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात जालना तालुक्यात २, भोकरदन तालुक्यात ३, जाफराबाद तालुक्यात ५, परतूर तालुक्यात २, मंठा तालुक्यात १, अंबड तालुक्यात ३६ तर घनसावंगी तालुक्यातील ७ प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.१०५ वाहने जप्तजिल्हा खनिकर्म अधिकारी विभागाने केलेल्या कारवाईत आजवर १०५ वाहने जप्त करण्यात आले आहेत. यात परतूर तालुक्यात १८, अंबड तालुक्यात ८७ असे एकूण १०५ वाहने जप्त करण्यात आली आहेत.पथकावरही झाला हल्लाअवैध वाळू तस्करांविरूध्द प्रशासनाने कारवाई मोहीम हाती घेतली आहे. यात कारवाईवेळी जाफराबाद तालुक्यात एका पथकावर हल्ला झाला आहे. या प्रकरणात पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :sandवाळूRevenue Departmentमहसूल विभागSmugglingतस्करी