शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
5
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
6
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
7
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
8
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
9
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
10
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
11
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
12
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
13
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
14
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
15
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
16
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
17
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
18
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
19
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
Daily Top 2Weekly Top 5

पाच जूननंतरच बीटी बियाणांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:24 IST

बीटी बियाणांच्या पाकिटांची विक्री ही ५ जून नंतरच करण्याचे निर्देश सर्व विक्रेत्यांना देण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगाम अद्याप लांब असला तरी कृषी विभागाकडून त्याची जय्यत तयारी आतपाासूनच केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी कृषी विभागाने कलश सीडस्मध्ये कृषी विक्रेत्यांची कार्यशाळा घेतली. त्यात बीटी बियाणांच्या पाकिटांची विक्री ही ५ जून नंतरच करण्याचे निर्देश सर्व विक्रेत्यांना देण्यात आले आहेत. हे निर्देश देण्या मागे बोंड अळीने पुन्हा हल्ला केल्यास त्यावर नियंत्रण मिळवतांना उपाययोजना करणे सोपे होऊ शकते असे सांगण्यात आले.जालना जिल्ह्यात जवळपास सहा लाख हेक्टरवर खरिपाच्या परेणीचे नियोजन आहे. त्यासाठी ११ लाख बीटी बियाणांची पाकिटे लागणार असून, ही पाकिटे कृषी विक्रेत्यांना त्यांच्या दुकानात साठवून ठेवता येतील, मात्र, त्यांची विक्री ही पाच जून नंतरच करावी असे सांगण्यात आले. यावेळी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ अजय मिटकरी यांनी कपाशीला बोंड अळीपासून रोखण्या संदर्भातील सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, अनेक शेतकरी हे जालना जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात साधारणपणे ज्यांच्याकडे मुबलक पाणी आहे, ते कपाशीची लागवड करतात. त्यामुळे बोंडअळीच्या पतंगांना सहज हल्ला करणे शक्य होते. परंतु नंतर तिचे उच्चाटन करताना नाकी नऊ येतात. हे रोखण्यासाठी एकाच वेळी लागवड करणे हितकारक ठरणार असल्याचे मिटकरी म्हणाले.यावेळी बियाणांप्रमाणेच खतांचे नियोजनही महत्त्वाचे असल्याचे सांगून, यावेळी खतांचा तुटवडा जाणवणार नसल्याचे सांगितले. परंतु रेल्वे स्थानकावरून खताची वाहतूक करतांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यायसाठी विशेष उपाय योजना करण्याची गरज यावेळी व्यक्त केली गेली. यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाही त्याची कल्पना देण्यात आली. बोगस बियाणांची विक्री रोखण्यासाठी नऊ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी औरंगाबाद येथून आलेले संशोधन सहायक संचालक बी.डी. पवार यांनी मार्गदर्शन केले.शेतक-यांना मदतकरणे गरजेचेदुष्काळाने होरपळलेल्या शेतक-यांना येत्या हंगामात कुठलीच अडचण येऊ नये म्हणून, कृषी विभाग तसेच व्यापा-यांनी देखील सहकार्य करण्याची गरज आहे. कुठल्याही बियाणे, खतांची विक्री झाल्यास लगेचच शेतक-यांना त्याचे पक्के बिल देण्यास सहकार्य करावे, जेणेकरून एखाद्यावेळी उगवण क्षमता कमी असणे अशा तक्रारी येणार नाहीत. बोगस बियाणांची विक्री होत असल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येऊन संबंधितांचा विक्री परवाना निलंबित करण्याचे अधिकारही शासनाने राखून ठेवले आहेत.- विजय माईनकर,सहसंचालक कृषी विभाग, जालना

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी