शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

सावकारी पाश सैल; तीन शेतकऱ्यांची जमीन परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 01:38 IST

सावकारकीतून केलेले जमिनीचे खरेदीखत रद्द ठरवून संबंधित शेतकऱ्यांना जमिनी परत करण्याचे आदेश जालना येथील सावकाराचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सावकारकीतून केलेले जमिनीचे खरेदीखत रद्द ठरवून संबंधित शेतकऱ्यांना जमिनी परत करण्याचे आदेश जालना येथील सावकाराचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिले. या प्रकरणात तीन शेतक-यांना ७ एकर ३९ आर जमीन परत मिळाली आहे.भाऊसाहेब शेषराव पवार (कर्जत ता. अंबड) यांनी शेतीच्या कामासाठी सावकारी व्यवहारातून ५० हजार रूपये घेतले होते. या व्यवहारात संबंधित शेतक-याने ५ एकर ३ गुंठे जमीन बाबूराव म्हसू नरोटे व कुटुंबाला खरेदीखत करून दिले होते. मात्र, व्याजासह पैसे परत देऊनही जमीन परत मिळत नव्हती. पंढरीनाथ रायभान सरोदे (रा. सरफगव्हाण ता. घनसावंगी) यांनी शेषराव बोरगे याच्याकडून सावकारी व्यवहारातून घेतल्या पैशापोटी एक एकर जमीन खरेदीखत करून दिली होती. पैशाची परतफेड करूनही जमीन परत मिळत नव्हती. या प्रकरणात पंढरीनाथ सरोदे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सीताबाई सरोदे यांनी डीडीआर यांच्याकडे दावा दाखल केला होता. तर उत्तमराव खराबे (रा. हेलस ता. मंठा) यांनी गावातील पुंजाराम आश्रोबा खराबे याच्याकडून सावकारी व्यवहारातून घेतलेल्या पैशापोटी ७६ आर जमीन लिहून दिली होती. पैशांची परतफेड करूनही जमीन मिळत नव्हती. उत्तमराव खराबे यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा महादेव खराबे यांनी २०१८ मध्ये सावकाराचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जालना यांच्याकडे दावा दाखल केला होता.या तिन्ही प्रकरणात शेतक-यांच्या बाजूने अ‍ॅड. दशरथ शिराळे यांनी बाजू मांडली. या प्रकरणात समोर आलेले पुरावे, साक्ष व अ‍ॅड. शिराळे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सावकाराचे जिल्हा उपनिबंधक चव्हाण यांनी सोमवारी, या तिन्ही शेतक-यांच्या शेतीचे सावकारीतून झालेले खरेदीखत रद्द करून जमिनी शेतक-यांना परत केल्या.

टॅग्स :RegistrarकुलसचिवFarmerशेतकरी