शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

हाडांच्या विविध आजारांवर फिजिओथेरपीची मात्रा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 00:41 IST

जिल्हा रूग्णालयातील फिजिओथेरपी विभागात महिन्याकाठी ३०० वर रूग्ण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार घेऊन व्यायाम करीत आहेत.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हाडांचा आजार असो किंवा शस्त्रक्रियेनंतरचे उपचार असोत डॉक्टरांनी दिलेल्या औषधांबरोबर फिजिओथेरपी उपचार घेणे गरजेचे असते. जिल्हा रूग्णालयातील फिजिओथेरपी विभागात महिन्याकाठी ३०० वर रूग्ण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार घेऊन व्यायाम करीत आहेत. त्यामुळे अनेक रूग्णांना हाडाच्या दुखण्यातून आराम मिळाला आहे.अनियमित आहार, अपुरी झोप, सततचा प्रवास, बैठे काम, रस्त्यावरील खड्ड्यांचे साम्राज्य, अपघात व इतर अनेक कारणांनी हाडाचे विविध आजार नागरिकांना जडतात. यात सर्वाधिक रूग्ण हे मणका, मान दुखी, कंबरदुखी, टाचा दुखणे, पाठ दुखणे आदी विविध आजारांनी त्रस्त असतात. विशेषत: मणक्याच्या आजाराने त्रस्त झालेले अनेक रूग्ण दिसून येतात. जुनी दुखणी, अपघातातील दुखणी, बदलत्या जीवनशैलीमुळे येणारे आजार, हाडांमधील जुनी दुखणी बंद करणे, शस्त्रक्रियेनंतर हात, पायाची पूर्ववत हलचाल व्हावी, यासाठी फिजिओथेरपी उपचार पध्दतीचा अवलंब केला जातो. तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली औषधे घेण्याबरोबर फिजिओथेरपी उपचार घेणेही तितकेच महत्वाचे आहे. ही गरज ओळखून जालना येथील जिल्हा रुग्णालयात फिजिओथेरपी विभाग सुरु करण्यात आला आहे.या विभागात महिन्याकाठी ३०० च्या आसपास रूग्ण फिजिओथेरपी उपचार घेण्यासाठी येतात. या विभागातील तज्ज्ञ डॉ. अमित जैस्वाल (पी.टी.), डॉ. पायल जैस्वाल (पी.टी.) हे रूग्णाला जो आजार आहे त्यावर उपचार करतात. कोणत्या आजारात ७ दिवस, कोणत्या आजारात १५ ते २० दिवस उपचार केले जातात. या विभागातील वॅक्स बाथ, शॉट वेट डायथर्व्ही, ट्रॅक्शन, टेन्स, आयएफटी-आयआरआर, यूव्हीआर, सीपीएम, मसल स्टीमयुलेटर, शोल्डर व्हील, स्टॅटीक बायसिकल आदी विविध यंत्रणेचा वापर उपचारासाठी केला जातो. नियमित उपचार आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व्यायाम केल्यानंतर रूग्णांना आजारातून मुक्तता मिळत आहे.हाडाची शस्त्रक्रिया झाली असेल अशा रूग्णांना फिजिओथेरपी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करणे गरजेचे असते. असे अनेक रूग्ण येथील विभागात उपचारासाठी येतात. योग्य पध्दतीने नियमित व्यायाम केल्याने शस्त्रक्रियेनंतरही रूग्णांच्या हात- पायांची पूर्वीप्रमाणे हालचाल होण्यास मदत होऊ लागली आहे.खासगी सेंटरमध्ये फिजिओथेरपीचे आठ ते दहा दिवस उपचार घ्यायचे म्हटलं की हजारो रूपये खर्च करावे लागतात. मात्र, जिल्हा रूग्णालयात सुरू असलेल्या फिजिओथेरपी विभागामुळे समाज घटकातील गरजू रूग्णांना मोठा आधार मिळाला आहे.त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील गरजू रूग्णांनी शासकीय रूग्णालयातील फिजिओथेरपी विभागात जाऊन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या आजारावर योग्य पध्दतीने उपचार घेण्याची गरज आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्यMedicalवैद्यकीय