शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

हाडांच्या विविध आजारांवर फिजिओथेरपीची मात्रा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 00:41 IST

जिल्हा रूग्णालयातील फिजिओथेरपी विभागात महिन्याकाठी ३०० वर रूग्ण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार घेऊन व्यायाम करीत आहेत.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हाडांचा आजार असो किंवा शस्त्रक्रियेनंतरचे उपचार असोत डॉक्टरांनी दिलेल्या औषधांबरोबर फिजिओथेरपी उपचार घेणे गरजेचे असते. जिल्हा रूग्णालयातील फिजिओथेरपी विभागात महिन्याकाठी ३०० वर रूग्ण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार घेऊन व्यायाम करीत आहेत. त्यामुळे अनेक रूग्णांना हाडाच्या दुखण्यातून आराम मिळाला आहे.अनियमित आहार, अपुरी झोप, सततचा प्रवास, बैठे काम, रस्त्यावरील खड्ड्यांचे साम्राज्य, अपघात व इतर अनेक कारणांनी हाडाचे विविध आजार नागरिकांना जडतात. यात सर्वाधिक रूग्ण हे मणका, मान दुखी, कंबरदुखी, टाचा दुखणे, पाठ दुखणे आदी विविध आजारांनी त्रस्त असतात. विशेषत: मणक्याच्या आजाराने त्रस्त झालेले अनेक रूग्ण दिसून येतात. जुनी दुखणी, अपघातातील दुखणी, बदलत्या जीवनशैलीमुळे येणारे आजार, हाडांमधील जुनी दुखणी बंद करणे, शस्त्रक्रियेनंतर हात, पायाची पूर्ववत हलचाल व्हावी, यासाठी फिजिओथेरपी उपचार पध्दतीचा अवलंब केला जातो. तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली औषधे घेण्याबरोबर फिजिओथेरपी उपचार घेणेही तितकेच महत्वाचे आहे. ही गरज ओळखून जालना येथील जिल्हा रुग्णालयात फिजिओथेरपी विभाग सुरु करण्यात आला आहे.या विभागात महिन्याकाठी ३०० च्या आसपास रूग्ण फिजिओथेरपी उपचार घेण्यासाठी येतात. या विभागातील तज्ज्ञ डॉ. अमित जैस्वाल (पी.टी.), डॉ. पायल जैस्वाल (पी.टी.) हे रूग्णाला जो आजार आहे त्यावर उपचार करतात. कोणत्या आजारात ७ दिवस, कोणत्या आजारात १५ ते २० दिवस उपचार केले जातात. या विभागातील वॅक्स बाथ, शॉट वेट डायथर्व्ही, ट्रॅक्शन, टेन्स, आयएफटी-आयआरआर, यूव्हीआर, सीपीएम, मसल स्टीमयुलेटर, शोल्डर व्हील, स्टॅटीक बायसिकल आदी विविध यंत्रणेचा वापर उपचारासाठी केला जातो. नियमित उपचार आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व्यायाम केल्यानंतर रूग्णांना आजारातून मुक्तता मिळत आहे.हाडाची शस्त्रक्रिया झाली असेल अशा रूग्णांना फिजिओथेरपी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करणे गरजेचे असते. असे अनेक रूग्ण येथील विभागात उपचारासाठी येतात. योग्य पध्दतीने नियमित व्यायाम केल्याने शस्त्रक्रियेनंतरही रूग्णांच्या हात- पायांची पूर्वीप्रमाणे हालचाल होण्यास मदत होऊ लागली आहे.खासगी सेंटरमध्ये फिजिओथेरपीचे आठ ते दहा दिवस उपचार घ्यायचे म्हटलं की हजारो रूपये खर्च करावे लागतात. मात्र, जिल्हा रूग्णालयात सुरू असलेल्या फिजिओथेरपी विभागामुळे समाज घटकातील गरजू रूग्णांना मोठा आधार मिळाला आहे.त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील गरजू रूग्णांनी शासकीय रूग्णालयातील फिजिओथेरपी विभागात जाऊन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या आजारावर योग्य पध्दतीने उपचार घेण्याची गरज आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्यMedicalवैद्यकीय