शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

सुतार मंचच्या माध्यमातून पुनर्विवाहाची कोंडी फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:31 IST

दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वी समाज हा फारसा जागृत नव्हता. अंध परंपरा आणि समाजातील अनेक नागरिक काय म्हणतील, या भीतीपोटी विधवेचा पुनर्विवाह करणे म्हणजे यक्ष प्रश्न होता. तोच प्रश्न दोनशे वर्षानंतरही कायम असल्याचे वास्तव सुतार समाज मंचचे जिल्हाध्यक्ष राजेश भालेकर यांनी सांगितले.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कदोनशे ते अडीचशे वर्षापूर्वी समाज हा फारसा जागृत नव्हता. अंध परंपरा आणि समाजातील अनेक नागरिक काय म्हणतील, या भीतीपोटी विधवेचा पुनर्विवाह करणे म्हणजे यक्ष प्रश्न होता. तोच प्रश्न दोनशे वर्षानंतरही कायम असल्याचे वास्तव सुतार समाज मंचचे जिल्हाध्यक्ष राजेश भालेकर यांनी सांगितले. या विवाहमंचच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रयत्नाने जवळपास ३९ विवाह जुळविले आहेत. मुळात त्यांचीच आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही समाजाचे आपण काही देणे लागतो, यातूनच ते सामाजिक बांधिलकी जपत आहेत.पुनर्विवाहात कुठल्या अडचणी आहेत ?एकीकडे आपण साक्षर होऊन शिक्षण आणि उच्च शिक्षण घेतले. परंतु ज्यांनी हे शिक्षण घेतले. त्यांच्याच कुटुंबामध्ये क्षुल्लक कारणावरून टोकाचे वाद होऊन विवाह संस्थाच धोक्यात आली आहे. पती-पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी अशिक्षित पती-पत्नीमध्ये समेट घडविण्यासाठी जेवढा वेळ लागत नाही. तेवढा वेळ शिक्षित असलेल्या जोडप्यांसाठी खर्च करावा लागतो. विधवा मुलींचा तर प्रश्नच वेगळा आहे. नियतीने त्यांच्यावर ही वेळ आणली आहे. हे समजून घेण्यास समाज आजही तयार नसल्याने मोठी खंत आहे.किती विवाह जुळविले ?सुतार समाज मंचच्या माध्यमातून विधवा तसेच घटस्फोटित मुला-मुलींचे ३९ विवाह गेल्या तीन वर्षात जुळविले आहेत. तर अनेकांचे संसार तुटण्यापासून मंचने पुढाकार घेतला. यात समाजबांधवांचाही सिंहाचा वाटा आहे.हलाखीतून भरारीमूळचे जालना तालुक्यातील गोंदेगाव येथील असलेले भालेकर यांनी शालेय शिक्षण पोटाला भाकरी मिळत नसल्यामुळे अर्धवट सोडले. हॉटेलमध्ये काम करून उपजीविका भागविली. परंतु जिद्द सोडली नाही. याकामी मला समाज बांधवांसह इतर समाजांतूनही हिंमत मिळत गेली आणि त्यातूनच आज मी हे सामाजिक कार्य करतो.

टॅग्स :Socialसामाजिकcommunityसमाजmarriageलग्न