शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 15:33 IST

महायुती आणि महाविकास आघाडी मिळून आचारसंहिता लागण्यापूर्वी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या : मनोज जरांगे

वडीगोद्री: दसरा मेळाव्याला तुफान गर्दी होणार आहे. हा मेळावा पारंपारिक होणार आहे, जातीचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. खूप दिवसांनी इच्छा पूर्ण झाली म्हणून संपूर्ण ताकदीने लोक येणार असून ५० ते ५५ हजार फक्त स्वयंसेवक आहेत. दुःखापासून समृद्धीकडे जाण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे. सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला यायला पाहिजे कारण हा सामाजिक मेळावा आहे. राजकीय पक्षाच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्याला या, असे आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी आज केले. त्यांनी अंतरवाली सराटीत प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

मनोज जरांगे पुढे म्हणाले, एका तासात मराठा आणि कुणबी एकच आहे असा शासन निर्णय होऊ शकतो. असं घडलं आहे या अगोदर. तिन्ही गॅजेट आज लागू होऊ शकतात. मर्यादा वाढायचं ठरलं तर एका दिवसात होऊ शकते. मला शंभर टक्के खात्री आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आमची मागणी मान्य केल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत. लोकसभेत मोदी महाराष्ट्रात होते तरी मराठ्यांनी दणका दिला. १३ महिन्यात तयारीच केली आहे ना, यांच्या एकदा याद्या होऊ द्या मग बघू. मराठ्यांना डावलून राज्यात सत्ता आणण सोपी गोष्ट नाही, असा थेट इशारा जरांगे यांनी सरकारला यावेळी दिला.

बोलबच्चन जमणार नाहीसत्ताधारी आणि विरोधकांना विनंती आहे की, ज्या गोष्टी होऊ शकत नाहीत त्या निवडणुकीच्या तोंडावर मांडून मराठ्यांना फसवू नका. तुमच्या दोघांच्या नाटकात मराठ्यांच्या पोरांचा बळी घेऊ नका. महायुती आणि महाविकास आघाडी मिळून आचारसंहिता लागण्यापूर्वी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या आणि मग कोट्याची मर्यादा वाढवा. सगळ्या मराठ्यांना सांगतो हे सगळे नाटक आहे. आपण आपल्या ध्येयावर राहू. तुम्ही मर्यादा वाढवा पण ओबीसीतून मराठ्यांना ५० % आरक्षण द्या, असं करत असाल तर दोघांचेही कौतुक. पण बोलबच्चन करणार असाल तर नाही जमणार, असा सणसणीत टोला राजकीय पक्षांना जरांगे यांनी लगावला.

तुमच्यापेक्षा हुशार शेतकरी आहेनिवडणुकीत काय भूमिका असेल यावर बोलताना जरांगे म्हणाले की, यांना निवडून आणण्यासाठी आमच्या गरिबांनी मारामारी केल्या. दुसऱ्या दिवशी हे म्हटले आम्ही एक आहोत. तुम्ही मित्र आणि आम्ही शत्रू किती कमाल आहे. तुमच्यापेक्षा हुशार गुडघाभर चिखलात काम करणारा शेतकरी आहे. तुम्ही दगा फटका केलेला जनतेला मान्य नाही, अशी टीका जरांगे यांनी राजकीय पक्षांवर केली. मागील एक महिन्यापासून राजकीय भाषा माझ्या तोंडात नाही, आम्ही आमच्या संयमाने राहतो, मी त्यावेळेस सांगितलं होतं गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, गुलाल रुसवायची ताकद मराठ्यांमध्ये आहे, अशा शब्दात जरांगे यांनी राजकीय पक्षांना निर्वाणीचा इशारा दिला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस