शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जालन्यात भुसार मालाच्या दरातील चढ-उतारामुळे उलाढालीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 12:02 IST

बाजारगप्पा : सोयाबीन, मक्याची आवक घटली असून, तुरीची आवक चांगली आहे

- संजय देशमुख ( जालना )

जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन, मक्याची आवक घटली असून, तुरीची आवक चांगली असली तरी भावामध्ये चढ-उतार होत असल्याने त्याचा परिणाम उलाढालीवर झाला आहे. बाजरी, रबी ज्वारीच्या दरात सरासरी ३०० रुपयांची घसरण प्रतिक्विंटल झाली आहे. साखरेच्या दरातही किंचितशी वाढ झाली असली तरी मुबलक साठा असल्याने मालाला उठाव नाही. मकर संक्रांत असल्याने तिळाची आवक राजस्थान, गुजरात, पंजाबमधून मोठ्या प्रमाणावर झाली असून, घाऊक बाजारपेठेत एका किलोचा दर हे १४० रुपये असल्याचे दिसून आले. 

जालना बाजारपेठेत सध्या गव्हाची आवक शंभर पोती असून २,०५० ते २,४५० रुपये, भाव मिळत आहे. ज्वारीची आवक ३०० पोती असून, ज्वारीच्या दरात क्विंटलमागे गेल्या आठवड्याच्या तुलनेत २०० रुपयांची घट झाली आहे. बाजरीची आवक आता कमी झाली असून, दररोज केवळ २०० पोती येत आहेत. मक्याची आवक आता ५०० क्विंटलने घटली आहे. तुरीची आवक दोन हजार पोती असून, ४ हजार ६०० ते ५ हजार ५०० रुपये भाव मिळत आहे. चना डाळीच्या दरात थेट ४०० रुपयांनी घसरण झाली आहे. सोयाबीनची आवक कमी होताच यात १०० रुपयांची किरकोळ वाढ गेल्या काही महिन्यांपासून झाली आहे.

तूर डाळीतही मोठी घसरण दिसून येत असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत ५०० रुपयांनी भाव कमी झाले आहेत. आज तूर डाळीचे भाव ६ हजार ५०० ते ७  हजार रुपये क्विंटलवर पोहोचले आहेत. मूग डाळीचे ६ हजार ५०० ते ७ हजार २०० दर आहेत. मसूर डाळीत २०० रुपयांची घट झाली आहे. 

केंद्र सरकारने चालू महिन्याचा कोटा कमी केल्याने त्याचा क्षुल्लक परिणाम साखरेच्या किमतीवर होऊन शंभर रुपयांची वाढ झाली आहे. संक्रांत आठवड्यावर आली असल्याने तिळासह गुळाला मोठी मागणी आहे. किरकोळ बाजारपेठेत चांगल्या दर्जाच्या तिळाचा दर हा  १८० रुपये किलोवर पोहोचला असून, गुळातही किंचितशी तेजी आली आहे. लातूर, विदर्भातून  गुळाची आवक चांगली असली तरी पाहिजे तेवढा दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

जालना येथे गेल्या वर्षभरापूर्वी रेशीम कोष खरेदीसाठीच पहिली बाजारपेठे सुरू केली होती. त्यामुळे जालन्यासह अन्य जवळपासच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्नाटकातील रामनगरम् येथे जावे लागत होते. ती चक्कर वाचली असली तरी, रेशीम कोषालादेखील भाव मिळत नसल्याचे वास्तव आहे. मोसंबीची आवक नगण्य असून, पांढरे सोने अर्थात कापसाची आवकही सीसीआयच्या खरेदी केंद्रावर जेमतेमच आहे.

तुरीचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू होईल, अशी आशा होती. मात्र, अद्यापही हे केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना त्यांची तूर व्यापाऱ्यांकडे विकावी लागत आहे. काही मोजक्या शेतकऱ्यांनी रबी ज्वारी पेरली असून, ती बाजारात येण्याला अजून अवकाश असल्याने ज्वारीचे दर उतरणार नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी