शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात भुसार मालाच्या दरातील चढ-उतारामुळे उलाढालीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 12:02 IST

बाजारगप्पा : सोयाबीन, मक्याची आवक घटली असून, तुरीची आवक चांगली आहे

- संजय देशमुख ( जालना )

जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन, मक्याची आवक घटली असून, तुरीची आवक चांगली असली तरी भावामध्ये चढ-उतार होत असल्याने त्याचा परिणाम उलाढालीवर झाला आहे. बाजरी, रबी ज्वारीच्या दरात सरासरी ३०० रुपयांची घसरण प्रतिक्विंटल झाली आहे. साखरेच्या दरातही किंचितशी वाढ झाली असली तरी मुबलक साठा असल्याने मालाला उठाव नाही. मकर संक्रांत असल्याने तिळाची आवक राजस्थान, गुजरात, पंजाबमधून मोठ्या प्रमाणावर झाली असून, घाऊक बाजारपेठेत एका किलोचा दर हे १४० रुपये असल्याचे दिसून आले. 

जालना बाजारपेठेत सध्या गव्हाची आवक शंभर पोती असून २,०५० ते २,४५० रुपये, भाव मिळत आहे. ज्वारीची आवक ३०० पोती असून, ज्वारीच्या दरात क्विंटलमागे गेल्या आठवड्याच्या तुलनेत २०० रुपयांची घट झाली आहे. बाजरीची आवक आता कमी झाली असून, दररोज केवळ २०० पोती येत आहेत. मक्याची आवक आता ५०० क्विंटलने घटली आहे. तुरीची आवक दोन हजार पोती असून, ४ हजार ६०० ते ५ हजार ५०० रुपये भाव मिळत आहे. चना डाळीच्या दरात थेट ४०० रुपयांनी घसरण झाली आहे. सोयाबीनची आवक कमी होताच यात १०० रुपयांची किरकोळ वाढ गेल्या काही महिन्यांपासून झाली आहे.

तूर डाळीतही मोठी घसरण दिसून येत असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत ५०० रुपयांनी भाव कमी झाले आहेत. आज तूर डाळीचे भाव ६ हजार ५०० ते ७  हजार रुपये क्विंटलवर पोहोचले आहेत. मूग डाळीचे ६ हजार ५०० ते ७ हजार २०० दर आहेत. मसूर डाळीत २०० रुपयांची घट झाली आहे. 

केंद्र सरकारने चालू महिन्याचा कोटा कमी केल्याने त्याचा क्षुल्लक परिणाम साखरेच्या किमतीवर होऊन शंभर रुपयांची वाढ झाली आहे. संक्रांत आठवड्यावर आली असल्याने तिळासह गुळाला मोठी मागणी आहे. किरकोळ बाजारपेठेत चांगल्या दर्जाच्या तिळाचा दर हा  १८० रुपये किलोवर पोहोचला असून, गुळातही किंचितशी तेजी आली आहे. लातूर, विदर्भातून  गुळाची आवक चांगली असली तरी पाहिजे तेवढा दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

जालना येथे गेल्या वर्षभरापूर्वी रेशीम कोष खरेदीसाठीच पहिली बाजारपेठे सुरू केली होती. त्यामुळे जालन्यासह अन्य जवळपासच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्नाटकातील रामनगरम् येथे जावे लागत होते. ती चक्कर वाचली असली तरी, रेशीम कोषालादेखील भाव मिळत नसल्याचे वास्तव आहे. मोसंबीची आवक नगण्य असून, पांढरे सोने अर्थात कापसाची आवकही सीसीआयच्या खरेदी केंद्रावर जेमतेमच आहे.

तुरीचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू होईल, अशी आशा होती. मात्र, अद्यापही हे केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना त्यांची तूर व्यापाऱ्यांकडे विकावी लागत आहे. काही मोजक्या शेतकऱ्यांनी रबी ज्वारी पेरली असून, ती बाजारात येण्याला अजून अवकाश असल्याने ज्वारीचे दर उतरणार नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी