शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

जालन्यात भुसार मालाच्या दरातील चढ-उतारामुळे उलाढालीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 12:02 IST

बाजारगप्पा : सोयाबीन, मक्याची आवक घटली असून, तुरीची आवक चांगली आहे

- संजय देशमुख ( जालना )

जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन, मक्याची आवक घटली असून, तुरीची आवक चांगली असली तरी भावामध्ये चढ-उतार होत असल्याने त्याचा परिणाम उलाढालीवर झाला आहे. बाजरी, रबी ज्वारीच्या दरात सरासरी ३०० रुपयांची घसरण प्रतिक्विंटल झाली आहे. साखरेच्या दरातही किंचितशी वाढ झाली असली तरी मुबलक साठा असल्याने मालाला उठाव नाही. मकर संक्रांत असल्याने तिळाची आवक राजस्थान, गुजरात, पंजाबमधून मोठ्या प्रमाणावर झाली असून, घाऊक बाजारपेठेत एका किलोचा दर हे १४० रुपये असल्याचे दिसून आले. 

जालना बाजारपेठेत सध्या गव्हाची आवक शंभर पोती असून २,०५० ते २,४५० रुपये, भाव मिळत आहे. ज्वारीची आवक ३०० पोती असून, ज्वारीच्या दरात क्विंटलमागे गेल्या आठवड्याच्या तुलनेत २०० रुपयांची घट झाली आहे. बाजरीची आवक आता कमी झाली असून, दररोज केवळ २०० पोती येत आहेत. मक्याची आवक आता ५०० क्विंटलने घटली आहे. तुरीची आवक दोन हजार पोती असून, ४ हजार ६०० ते ५ हजार ५०० रुपये भाव मिळत आहे. चना डाळीच्या दरात थेट ४०० रुपयांनी घसरण झाली आहे. सोयाबीनची आवक कमी होताच यात १०० रुपयांची किरकोळ वाढ गेल्या काही महिन्यांपासून झाली आहे.

तूर डाळीतही मोठी घसरण दिसून येत असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत ५०० रुपयांनी भाव कमी झाले आहेत. आज तूर डाळीचे भाव ६ हजार ५०० ते ७  हजार रुपये क्विंटलवर पोहोचले आहेत. मूग डाळीचे ६ हजार ५०० ते ७ हजार २०० दर आहेत. मसूर डाळीत २०० रुपयांची घट झाली आहे. 

केंद्र सरकारने चालू महिन्याचा कोटा कमी केल्याने त्याचा क्षुल्लक परिणाम साखरेच्या किमतीवर होऊन शंभर रुपयांची वाढ झाली आहे. संक्रांत आठवड्यावर आली असल्याने तिळासह गुळाला मोठी मागणी आहे. किरकोळ बाजारपेठेत चांगल्या दर्जाच्या तिळाचा दर हा  १८० रुपये किलोवर पोहोचला असून, गुळातही किंचितशी तेजी आली आहे. लातूर, विदर्भातून  गुळाची आवक चांगली असली तरी पाहिजे तेवढा दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

जालना येथे गेल्या वर्षभरापूर्वी रेशीम कोष खरेदीसाठीच पहिली बाजारपेठे सुरू केली होती. त्यामुळे जालन्यासह अन्य जवळपासच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्नाटकातील रामनगरम् येथे जावे लागत होते. ती चक्कर वाचली असली तरी, रेशीम कोषालादेखील भाव मिळत नसल्याचे वास्तव आहे. मोसंबीची आवक नगण्य असून, पांढरे सोने अर्थात कापसाची आवकही सीसीआयच्या खरेदी केंद्रावर जेमतेमच आहे.

तुरीचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू होईल, अशी आशा होती. मात्र, अद्यापही हे केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना त्यांची तूर व्यापाऱ्यांकडे विकावी लागत आहे. काही मोजक्या शेतकऱ्यांनी रबी ज्वारी पेरली असून, ती बाजारात येण्याला अजून अवकाश असल्याने ज्वारीचे दर उतरणार नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी