शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

"तत्कालीन सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा आरक्षण टिकले नाही", दानवेंचं विरोधकांकडे बोट

By विजय मुंडे  | Updated: September 2, 2023 20:41 IST

लाठीहल्ल्याचा निषेधच, मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र काम करावे

विजय मुंडे

जालना : भाजप सरकारच्या काळात मराठा आरक्षण मंजूर झाले होते. उच्च न्यायालयात ते टिकलेही होते. परंतु, सत्तांतरानंतर सर्वोच्च न्यायालयात अपिल झाले आणि तेथे तत्कालीन सरकारच्या दुर्लक्षामुळे आरक्षण रद्द झाले. अंतरवाली सराटी येथे पोलिसांनी केलेला अमानुष लाठीहल्ला हा निषेधार्ह असून, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्रित काम करावे, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

जालना येथे शनिवारी रात्री आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, विधानसभा अध्यक्ष भास्कर दानवे यांची उपस्थिती होती. मराठा आरक्षणासाठी आजवर झालेल्या शांततामय आंदोलनाची देशानेच नव्हे तर जगाने दखल घेतली आहे. मनोज जरांगे हे चार दिवसांपासून शांततामय मार्गाने आंदोलन करीत होते. परंतु, त्यांची प्रकृती ढासळल्यानंतर त्यांनी उपचार घ्यावेत यासाठी अधिकारी, पोलिस त्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर लाठीचार्ज झाला. झालेला लाठीचार्ज हा निषेधार्ह असल्याचे मंत्री दानवे म्हणाले. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षण मंजूर झाले होते. ते उच्च न्यायालयातही टिकले होते. परंतु, सत्तांतरानंतर तत्कालीन सरकारने कायदेशीर बाबी योग्य पद्धतीने हाताळल्या नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नाही. नंतर शिंदे, फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. आरक्षण रद्द होण्यापूर्वी ज्यांनी विविध जागांसाठी अर्ज केले होते त्यांची नोकरभरतीही केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी सर्वपक्षीयांनी राजकारण बाजूला ठेवून काम करावे, असे आवाहनही रावसाहेब दानवे यांनी केले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण