शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

"तत्कालीन सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा आरक्षण टिकले नाही", दानवेंचं विरोधकांकडे बोट

By विजय मुंडे  | Updated: September 2, 2023 20:41 IST

लाठीहल्ल्याचा निषेधच, मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र काम करावे

विजय मुंडे

जालना : भाजप सरकारच्या काळात मराठा आरक्षण मंजूर झाले होते. उच्च न्यायालयात ते टिकलेही होते. परंतु, सत्तांतरानंतर सर्वोच्च न्यायालयात अपिल झाले आणि तेथे तत्कालीन सरकारच्या दुर्लक्षामुळे आरक्षण रद्द झाले. अंतरवाली सराटी येथे पोलिसांनी केलेला अमानुष लाठीहल्ला हा निषेधार्ह असून, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्रित काम करावे, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

जालना येथे शनिवारी रात्री आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, विधानसभा अध्यक्ष भास्कर दानवे यांची उपस्थिती होती. मराठा आरक्षणासाठी आजवर झालेल्या शांततामय आंदोलनाची देशानेच नव्हे तर जगाने दखल घेतली आहे. मनोज जरांगे हे चार दिवसांपासून शांततामय मार्गाने आंदोलन करीत होते. परंतु, त्यांची प्रकृती ढासळल्यानंतर त्यांनी उपचार घ्यावेत यासाठी अधिकारी, पोलिस त्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर लाठीचार्ज झाला. झालेला लाठीचार्ज हा निषेधार्ह असल्याचे मंत्री दानवे म्हणाले. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षण मंजूर झाले होते. ते उच्च न्यायालयातही टिकले होते. परंतु, सत्तांतरानंतर तत्कालीन सरकारने कायदेशीर बाबी योग्य पद्धतीने हाताळल्या नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नाही. नंतर शिंदे, फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. आरक्षण रद्द होण्यापूर्वी ज्यांनी विविध जागांसाठी अर्ज केले होते त्यांची नोकरभरतीही केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी सर्वपक्षीयांनी राजकारण बाजूला ठेवून काम करावे, असे आवाहनही रावसाहेब दानवे यांनी केले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण