शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

"तत्कालीन सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा आरक्षण टिकले नाही", दानवेंचं विरोधकांकडे बोट

By विजय मुंडे  | Updated: September 2, 2023 20:41 IST

लाठीहल्ल्याचा निषेधच, मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र काम करावे

विजय मुंडे

जालना : भाजप सरकारच्या काळात मराठा आरक्षण मंजूर झाले होते. उच्च न्यायालयात ते टिकलेही होते. परंतु, सत्तांतरानंतर सर्वोच्च न्यायालयात अपिल झाले आणि तेथे तत्कालीन सरकारच्या दुर्लक्षामुळे आरक्षण रद्द झाले. अंतरवाली सराटी येथे पोलिसांनी केलेला अमानुष लाठीहल्ला हा निषेधार्ह असून, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्रित काम करावे, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

जालना येथे शनिवारी रात्री आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, विधानसभा अध्यक्ष भास्कर दानवे यांची उपस्थिती होती. मराठा आरक्षणासाठी आजवर झालेल्या शांततामय आंदोलनाची देशानेच नव्हे तर जगाने दखल घेतली आहे. मनोज जरांगे हे चार दिवसांपासून शांततामय मार्गाने आंदोलन करीत होते. परंतु, त्यांची प्रकृती ढासळल्यानंतर त्यांनी उपचार घ्यावेत यासाठी अधिकारी, पोलिस त्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर लाठीचार्ज झाला. झालेला लाठीचार्ज हा निषेधार्ह असल्याचे मंत्री दानवे म्हणाले. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षण मंजूर झाले होते. ते उच्च न्यायालयातही टिकले होते. परंतु, सत्तांतरानंतर तत्कालीन सरकारने कायदेशीर बाबी योग्य पद्धतीने हाताळल्या नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नाही. नंतर शिंदे, फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. आरक्षण रद्द होण्यापूर्वी ज्यांनी विविध जागांसाठी अर्ज केले होते त्यांची नोकरभरतीही केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी सर्वपक्षीयांनी राजकारण बाजूला ठेवून काम करावे, असे आवाहनही रावसाहेब दानवे यांनी केले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण