शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

पीककर्जासाठी पहाटे चारपासून शेतकऱ्यांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:25 IST

शेषराव वायाळ परतूर : खरिपातील हातचे गेलेले पीक, उसनवारी करून केलेली रब्बी पिकांची पेरणी आणि आता पीककर्ज घेण्यासाठी चक्क ...

शेषराव वायाळ

परतूर : खरिपातील हातचे गेलेले पीक, उसनवारी करून केलेली रब्बी पिकांची पेरणी आणि आता पीककर्ज घेण्यासाठी चक्क पहाटे चार वाजल्यापासून बँकेच्या दारात उभे राहण्याची आलेली वेळ... ही व्यथा आहे, परतूर व परिसरातील शेतकऱ्यांची! त्यामुळे ‘उध्दवा, अजब तुझे सरकार...’ असे म्हणण्याची वेळ कडाक्याच्या थंडीत रांगेत उभे राहिलेल्या शेतकऱ्यांवर आली आहे.

शेतकऱ्यांच्या नशिबी आस्मानी- सुल्तानी संकटे पूजलेली! यंदा खरिपाच्या प्रारंभी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, नंतर अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरच पाणी पडले. खरिपातील उत्पन्न सोडाच पण केलेला खर्चही शेतकऱ्यांच्या हाती पडला नाही. शासनाने मदतीची घोषणा केली. मात्र, अद्यापही असंख्य शेतकऱ्यांच्या हातात ही रक्क्म आलेली नाही. त्यामुळे परतूर परिसरातील शेतकऱ्यांनी उसनवारी करून, सावकारी कर्ज काढून रब्बीतील पिकांची पेरणी केली.

पीककर्ज मिळावे यासाठी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियात अनेक शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले. बँकेत चकरा मारूनही अद्याप अनेकांना कर्ज मिळाले नाही. कर्ज सोडा पण, बँकेत प्रवेश मिळणेही मुश्किल झाले. त्यामुळे शेतकरी चक्क कडाक्याच्या थंडीत पहाटे ४ वाजताच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या परतूर शाखेसमोर रांगा लावू लागले आहेत. त्याला कारण म्हणजे बँकेने तडजोड करणे व नवीन पीककर्ज देण्यासाठीची वेळ सकाळी १० ते २ केली आहे. परिणामी आपला नंबर लवकर लागावा म्हणून हे शेतकरी बँकेसमोर रांगा लावत आहेत. एकरकमी तडजोड केल्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा नवीन कर्ज देण्यात येईल असेही अश्वासन देण्यात येत आहे. त्यामुळे पीककर्ज देऊन केलेली उसनवारी, सावकारी कर्ज फेडता येईल, अशी आशा या शेतकऱ्यांना आहे. पहाटेच्या सुमारास कडाक्याच्या थंडीत रांगेत थांबलेले शेतकरी मात्र, उध्दवा अजब तुझे सरकार... असे म्हणत बँक प्रशासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षित भूमिकेबाबत संताप व्यक्त करीत आहेत.

चौकट

कचऱ्यापासून पेटविल्या जातायेत शेकोट्या

पीककर्जासाठी पहाटे ४ पासून शेतकऱ्यांना रांगेत उभे रहावे लागत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे बँक परिसरात पडलेला कचरा गोळा करून शेकोट्या पेटविल्या जात आहेत. या शेकोटीची उब पहाटेच्या सुमारास शेतकऱ्यांना आधार देत आहे. मात्र, पहाटेची थंडी अंगावर झेलूनही पीककर्ज मिळेल की नाही ? अशी चिंता या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

रात्रीपर्यंत बँकेचे व्यवहार

बँकेची एकरकमी तडजोड योजना सुरू आहे. शेतकरी सध्या पहाटेच येऊन रांगा लावत आहेत. ही कामे करून आम्हाला दैनंदिन कामे, व्यवहार रात्रीपर्यंत पहावे लागतात.

महेंद्र डोंगरे

शाखा व्यवस्थापक