शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

पीककर्जासाठी पहाटे चारपासून शेतकऱ्यांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:25 IST

शेषराव वायाळ परतूर : खरिपातील हातचे गेलेले पीक, उसनवारी करून केलेली रब्बी पिकांची पेरणी आणि आता पीककर्ज घेण्यासाठी चक्क ...

शेषराव वायाळ

परतूर : खरिपातील हातचे गेलेले पीक, उसनवारी करून केलेली रब्बी पिकांची पेरणी आणि आता पीककर्ज घेण्यासाठी चक्क पहाटे चार वाजल्यापासून बँकेच्या दारात उभे राहण्याची आलेली वेळ... ही व्यथा आहे, परतूर व परिसरातील शेतकऱ्यांची! त्यामुळे ‘उध्दवा, अजब तुझे सरकार...’ असे म्हणण्याची वेळ कडाक्याच्या थंडीत रांगेत उभे राहिलेल्या शेतकऱ्यांवर आली आहे.

शेतकऱ्यांच्या नशिबी आस्मानी- सुल्तानी संकटे पूजलेली! यंदा खरिपाच्या प्रारंभी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, नंतर अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरच पाणी पडले. खरिपातील उत्पन्न सोडाच पण केलेला खर्चही शेतकऱ्यांच्या हाती पडला नाही. शासनाने मदतीची घोषणा केली. मात्र, अद्यापही असंख्य शेतकऱ्यांच्या हातात ही रक्क्म आलेली नाही. त्यामुळे परतूर परिसरातील शेतकऱ्यांनी उसनवारी करून, सावकारी कर्ज काढून रब्बीतील पिकांची पेरणी केली.

पीककर्ज मिळावे यासाठी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियात अनेक शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले. बँकेत चकरा मारूनही अद्याप अनेकांना कर्ज मिळाले नाही. कर्ज सोडा पण, बँकेत प्रवेश मिळणेही मुश्किल झाले. त्यामुळे शेतकरी चक्क कडाक्याच्या थंडीत पहाटे ४ वाजताच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या परतूर शाखेसमोर रांगा लावू लागले आहेत. त्याला कारण म्हणजे बँकेने तडजोड करणे व नवीन पीककर्ज देण्यासाठीची वेळ सकाळी १० ते २ केली आहे. परिणामी आपला नंबर लवकर लागावा म्हणून हे शेतकरी बँकेसमोर रांगा लावत आहेत. एकरकमी तडजोड केल्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा नवीन कर्ज देण्यात येईल असेही अश्वासन देण्यात येत आहे. त्यामुळे पीककर्ज देऊन केलेली उसनवारी, सावकारी कर्ज फेडता येईल, अशी आशा या शेतकऱ्यांना आहे. पहाटेच्या सुमारास कडाक्याच्या थंडीत रांगेत थांबलेले शेतकरी मात्र, उध्दवा अजब तुझे सरकार... असे म्हणत बँक प्रशासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षित भूमिकेबाबत संताप व्यक्त करीत आहेत.

चौकट

कचऱ्यापासून पेटविल्या जातायेत शेकोट्या

पीककर्जासाठी पहाटे ४ पासून शेतकऱ्यांना रांगेत उभे रहावे लागत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे बँक परिसरात पडलेला कचरा गोळा करून शेकोट्या पेटविल्या जात आहेत. या शेकोटीची उब पहाटेच्या सुमारास शेतकऱ्यांना आधार देत आहे. मात्र, पहाटेची थंडी अंगावर झेलूनही पीककर्ज मिळेल की नाही ? अशी चिंता या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

रात्रीपर्यंत बँकेचे व्यवहार

बँकेची एकरकमी तडजोड योजना सुरू आहे. शेतकरी सध्या पहाटेच येऊन रांगा लावत आहेत. ही कामे करून आम्हाला दैनंदिन कामे, व्यवहार रात्रीपर्यंत पहावे लागतात.

महेंद्र डोंगरे

शाखा व्यवस्थापक