शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

दुभती जनावरे खरेदींचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:55 AM

दुष्काळावर मात करण्यासाठी शेतक-यांना पुरक उद्योग म्हणून दूग्ध व्यवसाय करण्यासाठी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने प्रायोगिक तत्वावर दुभती जनावरे अर्थात गायी-म्हशी तसेच २० शेळीचा गट आणि दोन बोकड यासाठी ५० टक्के अनुदानावर खरेदी करण्याची ही योजना होती. मात्र २०१७ मध्ये सुरू झालेल्या योजनेला दोन वर्षानंतर का होईना मुहूर्त लागला आहे.

ठळक मुद्देदोन वर्षानंतर हालचाल : बंँकांकडून शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन, प्रकल्पाला मिळेल गती

जालना : दुष्काळावर मात करण्यासाठी शेतक-यांना पुरक उद्योग म्हणून दूग्ध व्यवसाय करण्यासाठी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने प्रायोगिक तत्वावर दुभती जनावरे अर्थात गायी-म्हशी तसेच २० शेळीचा गट आणि दोन बोकड यासाठी ५० टक्के अनुदानावर खरेदी करण्याची ही योजना होती. मात्र २०१७ मध्ये सुरू झालेल्या योजनेला दोन वर्षानंतर का होईना मुहूर्त लागला आहे.दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जालना जिल्ह्यात पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढकाराने दुभती जनावरे देण्याची ही योजना मराठवाडा पॅकेजमधून करण्यासाठीची योजना जाहीर केली होती. त्यात संबंधित शेतकºयाने एक गाय, एक म्हैस यासाठी अनुक्रमे दोन लाख १० हजार रूपये लागणार आहेत. या गाई-म्हशी खरेदी करण्यासाठी एक खरेदी समिती नेमण्यात आली आहे. या समितीने मंजूरी दिल्यावरच संबंधित शेतकºयाला हे ५० टक्के अनुदान आणि ५० टक्के त्यांची स्वत:ची गुंतवणूक अशा प्रकारची ही योजना होती.मात्र मध्यंतरी या योजनेवरून बरेच राजकारण झाले. त्यामुळे योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडली. परंतु सध्या दुष्काळ असल्याने आणि शेकºयांकडे दुभती जनावरे खरेदीसाठी मुबलक पैसा नसल्याने त्या शेतकºयांना बँकांनी गाई- आणि म्हशीसाठी त्यांना साधारपणे दोन लाखाचे अर्थसाह्य करावे अशा सूचना राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी शुक्रवारी बँक अधिकाºयांना दिल्या. जिल्हा परिषदेच्या सभागृहात हा बँक मेळावा घेण्यात आला होता.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, मुख्याधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्याधिकारी मुकीम देशमुख, पंडित भुतेकर, संतोष मोहिते यांच्यासह जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक इलमकर, डॉ.एस.पी. गुडे, डॉ. अमितकुमार दुबे यांच्यासह अन्य अधिकाºयांची उपस्थिती होती.यावेळी शेतकºयांनी बँकेच्या अधिकाºयांना भेटण्यासाठी मोठी गर्दी सभागृहात केली होती.बंँकांनी सहकार्य करावेसध्या दुष्काळ असल्याने शेतकºयांसाठी ही योजना संजीवनी ठरू शकते. सध्या शेतकºयांकडे दुभती जनावरे खरेदीसाठी शिल्लक पैसा नसल्याने बँकांनी त्यांना कर्ज उपलब्घ करून द्यावे, त्यासाठी बँकांनी सहकार्य करण्याचे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. एकूणच संपूर्ण जिल्ह्यासाठी ही योजना एक पथदर्शी ठरणार आहे असेही खोतकर यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाArjun Khotkarअर्जुन खोतकरAgriculture Sectorशेती क्षेत्र