शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

बावन्न गावांचा वीजपुरवठा तोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:35 AM

जालना जिल्ह्यातील ५२ गावांचा वीजपुरवठा थेट विद्युत उपकेंद्रातून तोडल्याने ही गावे अंधारात डुबली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यातील ५२ गावांचा वीजपुरवठा थेट विद्युत उपकेंद्रातून तोडल्याने ही गावे अंधारात डुबली आहेत. आठही तालुक्यातील गावांचा त्यात समावेश आहे. त्यात अंबड १२ आणि घनसावंगीतील २८ गावांचा समावेश आहे.गेल्या काही महिन्यांपासून या गावातील लोकांनी वीजेची थकबाकी भरावी म्हणून त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने वीज वितरणने ही थेट कारवाई केल्याची माहिती अधीक्षक अभियंता के. डी.हुमने यांनी दिली. त्यात विभाग क्रमांक एममध्ये जवळपास ७२ लाख तर विभाग क्रमांक दोन मध्ये एक कोटी ३३ लाख रूपयांची बिले थकली आहेत.दोन दिवसांपूर्वी मुख्य अभियंता गणेशकर हे जालना दौऱ्यावर आले होते.त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. त्या बैठकीत वीज चोरी रोखण्यासह थकबाकी वसुलीच्या मुद्यावर चर्चा झाली होती. त्यांच्या सूचनेनुसार ही वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आल्याचे हुमने यांनी सांगितले.दरम्यान जालना शहरातील जे वीजमीटर फॉल्टी आहेत, ते तातडीने बदल्याच्या सूचना देण्यात आल्या असून, अनेक वीजग्राहकांना चुकीच्या रीडिंगची बिले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.याची दखल घेत, वीज मीटर रीडिंगचे काम देण्यात आलेल्या संस्थेसह वीज वितरण कंपनीच्या कर्मचा-यांनी याचे सर्वेक्षण करून कुठे वीज मीटर रीडिंग चुकत आहे, याचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देशही गणेशकर यांनी दिले होते.जालना : अव्वाच्या सव्वा बिलेजालना शहरातील बहुतांश वीज ग्राहकांना त्यांच्या मीटरवरील रीडिंग आणि वीजबिलावर आलेली रीडिंग यात मोठी तफावत असल्याचे दिसून येते. या बद्दल दररोज वीज ग्राहक चुकीच्या मीटर रीडिंगच्या तक्रारी घेऊन जालन्यातील मस्तगड भागातील वीज वितरणच्या कार्यालयात गर्दी करत असल्याचे दिसून आले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज