शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

पूर्णा, केळणा नदीपात्रात उरले बंधाऱ्याचे सांगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 00:38 IST

पूर्णा, केळणा नदीला आलेल्या पुरात तब्बल १२ कोल्हापुरी बंधारे वाहून गेले

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून, नद्या, नाल्या दुथडी वाहू लागल्या आहेत. पूर्णा, केळणा नदीला आलेल्या पुरात तब्बल १२ कोल्हापुरी बंधारे वाहून गेले. या बंधाऱ्यांचे केवळ सांगडे नदीपात्रात उभा आहेत. तर महापुरामुळे नद्यांनी प्रवाह बदलल्याने ५० हून अधिक शेतक-यांची शेतजमीन वाहून गेली आहे.भोकरदन तालुक्यात २७ आॅक्टोबर व १ नोव्हेबर रोजी परतीच्या पावसामुळे पूर्णा, गिरजा, केळणा, जुई, धामणा, रायघोळ या नद्यांना अनेक वर्षानंतर महापूर आला होता. पाण्याच्या प्रवाहात पूर्णा नदीवरील तांडा बजार, तांदुळवाडी, जैनपुर कठोरा, सिरसगाव मंडप, नांजा, बेलोरा, केदारखेडा येथील कोल्हापुरी बंधा-यांच्या दोन्ही बाजुचा भराव वाहून गेला. त्याच प्रमाणे केळना नदीवरील भोकरदन, गोकुुळ, आलापूर, आरतखेडा, वरखेडा विरो, जुई नदीवरील निंबोळा, व रायघोळ नदीवरील शेलूद व पारध येथील बंधाºयांचा भरावही पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी पाणीसाठा होणार नाही. या भागातील नद्यांनी पात्राच बदलल्याने लगतच्या शेतक-यांच्या जमिनी पिकासह वाहून गेल्या आहेत. नदीच्या काठावरील विहिरी गायब झाल्या असून, ५० पेक्षा जास्त शेक-यांना मोठा फटका बसला आहे. केळना नदीवरील आलापूर येथील बंधारा वाहून गेल्यामुळे येथील शेतकरी राहुल चौधरी यांची एका बाजुची शेती वाहून गेली आहे. शिवाय विहीर ढासळली आहे.पाणीसाठा व्हावा म्हणून लघुसिंचन जलसंधारण विभागाच्या वतीने तालुक्यातील कोल्हापुरी बंधा-यांना गेट बसविण्यात आले होते. मात्र, सतत अपुºया प्रमाणात पडणारा पाऊस यंदा धो-धो बरसला आणि पुरात कोल्हापुरी बंधा-याची वाताहत झाली.तालुक्यात सिंचनक्षेत्र वाढीसाठी गत पाच वर्षात मोठ्या प्रमाणात बंधा-याची कामे करण्यात आली होती. त्यापैकी कोल्हापुरी बंधा-याची वाताहात झाली. मात्र सिमेंट बंधारे तग धरून आहेत. केवळ शेलूद व पारध येथील बंधारा वाहून गेला आहे़

टॅग्स :RainपाऊसIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प