शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी निवडीवरून राजकीय नाट्य रंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 15:28 IST

सर्व तालुक्यांना प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न केल्याचा जिल्हाध्यक्ष दानवेंचा दावा

ठळक मुद्देविश्वासात घेतले नाही; लोणीकरांचा आरोप

जालना : भाजपचे जिल्हा प्रमुख आ. संतोष दानवे  हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र आहेत.  दोन दिवसांपूर्वी आ. दानवे यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. ही कार्यकारिणी जाहीर झाल्यावर त्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम सोशल मीडियासह भाजपच्या लोणीकर समर्थकांमध्ये उमटले आहेत. या मुद्यावरून संतप्त पदाधिकाऱ्यांनी लोणीकरांना साकडे घालून याबद्दल बैठक बोलावून आमच्या भावना ऐकून घ्याव्यात अशी मागणी केली होती. त्यानुसार बुधवारी आ. बबनराव लोणीकर यांनी भाजपच्या जिल्हा कार्यालयात बैठक बोलावली होती. 

एकूणच गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसेच आ. लोणीकर हे जरी पक्ष म्हणून एकाच पक्षात असले तरी, फारसे सख्य नाही हे वास्तव सर्वश्रुत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपची कार्यकारिणी निवडताना दानवेंनी लोणीकरांना किंवा त्यांचा मुलगा जि.प.सदस्य राहुल लोणीकर किंवा त्यांच्या गटाच्या एखाद्याला विश्वाासात घेणे, चर्चा करणे ही अपेक्षा लोणीकरांनी ठेवणे म्हणजे आश्वर्यच म्हणावे लागेल. आणि झालेही तसेच. दरम्यान मंगळवारी गणेश विसर्जनाचा मुहूर्त साधून  तालुका उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष आणि अन्य विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या जवळपास ६२ जणांची घोषणा केली. 

ही यादी बाहेर पडताच त्यावर लोणीकरांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या बद्दल त्यांच्या परतूर तसेच मंठा आणि काही तालुक्यातील समर्थकांची बैठक बुधवारी दुपारी भाजपच्या जिल्हा कार्यालयात पार पडली. यावेळी राहुल लोणीकर, वीरेंद्र धोका, सुनील आर्दड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राठोड आदींची उपस्थिती होती. यावेळी अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान गेल्यावर्षी परतूर तसेच मंठा तालुक्याला तीन उपाध्यक्ष होते.

पक्ष नेतृत्वाकडे म्हणणे मांडणार भाजप हा शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जातो. येथे छोटे-छोटे निर्णयही सर्व सहमतीने घेतले जातात. परंतु जिल्हा कार्यकारिणी निवडताना आम्हाला विश्वासात घेणे अपेक्षित होते. परंतु जिल्हाघ्यक्षांकडून तसा कुठलाच संपर्क साधण्यात आला  नाही. आपण केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या सोबच भाजपमध्ये काम केले आहे. अनेक वाईट दिवस बघितल्यावर आज हे चांगले दिवस आले आहेत. परंतु याची जाणीव दानवे तसेच त्यांच्या मुलांकडून ठेवली नाही. यामुळे आजच्या बैठकीतील मुद्दे हे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर शिष्टमंडळाला सोबत घेऊन कैफियत मांडणार आहोत. - आ. बबनराव लोणीकर, परतूर

राजकारण करणे हा हेतू नाहीपक्ष चालवितांना जिल्हाध्यक्षांची मोठी कसोटी असते. कुठलाही निर्णय घेताना त्यातून प्रत्येकाचे समाधान करणे शक्य नसते. ही कार्यकारिणी निवडताना आपण बराच समतोल राखण्याचा प्रयत्न केला. परंतु काही पदाधिकाऱ्यांच्या नाराजी असतील तर त्याही आपण ऐकून घेऊ. दरम्यान पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांची संवाद साधून वाद मिटविण्याचा प्रयत्न करू. - आ. संतोष दानवे, जिल्हाध्यक्ष भाजप, जालना 

टॅग्स :BJPभाजपाJalanaजालनाBabanrao Looneykarबबनराव लोणीकर