शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

विषबाधा झालेल्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 00:42 IST

पिकावर फवारणी करताना विषबाधा झालेल्या एका ३३ वर्षीय युवक शेतक-याचा मंगळवारी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पिकावर फवारणी करताना विषबाधा झालेल्या एका ३३ वर्षीय युवक शेतक-याचा मंगळवारी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गत तीन महिन्यात पिकांवर फवारणी करताना न कळत ७४ शेतकऱ्यांना विषबाधा झाली आहे.जिल्ह्यातील शेतकरी आस्मानी- सुलतानी संकटांचा सामना करीत आहे. यंदा अपु-या प्रमाणात पाऊस झाला असला तरी पीक वाढीच्या काळात कमी- अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने पिके चांगली आली. मात्र, रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने शेतक-यांनी महागडी औषधे फवारली. मात्र, ही पिके फवारताना आवश्यक ती दक्षता न घेतली गेल्याने गत तीन महिन्यांत जिल्ह्यातील तब्बल ७४ शेतक-यांना न कळत विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यात आॅगस्ट महिन्यात ७, सप्टेंबर ५७ तर तर आॅक्टोबर महिन्यात २ शेतक-यांना न कळत विषबाधा झाली होती.या बाधित शेतक-यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृती अत्यवस्थ असलेल्या सहा जणांना सोलापूरला हलविण्यात आले होते. तर इतर शेतक-यांवर जिल्हा रूग्णालयात उपचार झाले असून, त्यांना वेळेत डिश्चार्ज देण्यात आला आहे.अंबड तालुक्यातील ताड हदगाव येथील शेतकरी नामदेव महादेवराव खर्जुले (३३) यांनी रविवारी पिकावर औषध फवारणी केली होती. मात्र, रात्रीच्यावेळी त्यांना त्रास झाला. सोमवारी त्यांना अंबड येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रथमोपचारानंतर त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. मयत शेतकºयाच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.दरम्यान, कृषी विभाग जनजागृती करीत असला तरी ग्रामीण भागात प्रभावीपणे ही जनजागृती होत नसल्याचेच चित्र होणा-या विषबाधेवरून दिसून येते. विषबाधेच्या वाढणा-या घटना पाहता शेतक-यांनीही पिकांवर फवारणी करताना कृषी विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.ताड हदगाव येथील खर्जुले कुटुंबातील तीन भावंडांमध्ये केवळ अडीच एकर शेती आहे. या कुटुंबातील नामदेव यांचा औषध फवारणीनंतर न कळत झालेल्या विषबाधेने मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाने या कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.कृषी अधिका-यांनी घेतली भेटताड हादगाव येथील बाधित शेतक-याचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच कृषी विभागाच्या अधिका-यांनी खर्जुले कुटुंबाची भेट घेऊन चर्चा केल्याचे सांगण्यात आले. चर्चेचा अहवाल मात्र, रात्री उशिरापर्यंत समजू शकला नाही.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र