शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

विषबाधा झालेल्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 00:42 IST

पिकावर फवारणी करताना विषबाधा झालेल्या एका ३३ वर्षीय युवक शेतक-याचा मंगळवारी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पिकावर फवारणी करताना विषबाधा झालेल्या एका ३३ वर्षीय युवक शेतक-याचा मंगळवारी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गत तीन महिन्यात पिकांवर फवारणी करताना न कळत ७४ शेतकऱ्यांना विषबाधा झाली आहे.जिल्ह्यातील शेतकरी आस्मानी- सुलतानी संकटांचा सामना करीत आहे. यंदा अपु-या प्रमाणात पाऊस झाला असला तरी पीक वाढीच्या काळात कमी- अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने पिके चांगली आली. मात्र, रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने शेतक-यांनी महागडी औषधे फवारली. मात्र, ही पिके फवारताना आवश्यक ती दक्षता न घेतली गेल्याने गत तीन महिन्यांत जिल्ह्यातील तब्बल ७४ शेतक-यांना न कळत विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यात आॅगस्ट महिन्यात ७, सप्टेंबर ५७ तर तर आॅक्टोबर महिन्यात २ शेतक-यांना न कळत विषबाधा झाली होती.या बाधित शेतक-यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृती अत्यवस्थ असलेल्या सहा जणांना सोलापूरला हलविण्यात आले होते. तर इतर शेतक-यांवर जिल्हा रूग्णालयात उपचार झाले असून, त्यांना वेळेत डिश्चार्ज देण्यात आला आहे.अंबड तालुक्यातील ताड हदगाव येथील शेतकरी नामदेव महादेवराव खर्जुले (३३) यांनी रविवारी पिकावर औषध फवारणी केली होती. मात्र, रात्रीच्यावेळी त्यांना त्रास झाला. सोमवारी त्यांना अंबड येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रथमोपचारानंतर त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. मयत शेतकºयाच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.दरम्यान, कृषी विभाग जनजागृती करीत असला तरी ग्रामीण भागात प्रभावीपणे ही जनजागृती होत नसल्याचेच चित्र होणा-या विषबाधेवरून दिसून येते. विषबाधेच्या वाढणा-या घटना पाहता शेतक-यांनीही पिकांवर फवारणी करताना कृषी विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.ताड हदगाव येथील खर्जुले कुटुंबातील तीन भावंडांमध्ये केवळ अडीच एकर शेती आहे. या कुटुंबातील नामदेव यांचा औषध फवारणीनंतर न कळत झालेल्या विषबाधेने मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाने या कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.कृषी अधिका-यांनी घेतली भेटताड हादगाव येथील बाधित शेतक-याचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच कृषी विभागाच्या अधिका-यांनी खर्जुले कुटुंबाची भेट घेऊन चर्चा केल्याचे सांगण्यात आले. चर्चेचा अहवाल मात्र, रात्री उशिरापर्यंत समजू शकला नाही.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र