शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

‘पीएम स्वनिधी’ला राष्ट्रीयीकृत बँकांचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:31 IST

विजय मुंडे जालना : हातगाड्यांवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची आर्थिक उन्नती व्हावी, त्यांच्या व्यवसायात वृद्धी व्हावी, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने ...

विजय मुंडे

जालना : हातगाड्यांवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची आर्थिक उन्नती व्हावी, त्यांच्या व्यवसायात वृद्धी व्हावी, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने पीएम स्वनिधी योजना राबविण्यात येत आहे. परंतु या योजनेला जालना जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांकडूनच खोडा घातला जात आहे. जिल्ह्यातील ४११६ फेरीवाल्यांनी या अर्थसाहाय्यासाठी अर्ज केले आहेत. नगरपालिका, नगरपंचायतींनी ३००४ लाभार्थींचे अर्ज पाठविल्यानंतर बँकांनी ७०२ प्रस्तावांना मंजुरी दिली; परंतु मंजूर प्रस्तावांपैकी आजवर केवळ ३४० जणांना प्रत्यक्षात लाभ देण्यात आला आहे.

हातगाड्यांवर फळे, भाजीपाला यासह इतर साहित्याची विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु कोरोनामुळे या लहान व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. व्यवसाय पुन्हा सुरू करताना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने या फेरीवाल्यांना दहा हजार रुपयांचे अर्थसाहाय देण्यासाठी पीएम स्वनिधी योजना अंमलात आणली. त्यानुसार फेरीवाल्यांनी बँकांकडून अर्थसाहाय घेतल्यानंतर एका वर्षात ते परत करणे अपेक्षित आहे.

जालना जिल्ह्याला जवळपास ५२१७ फेरीवाल्यांना हे अर्थसाहाय्य वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु, याची जनजागृती कमी प्रमाणात झाल्याने जिल्ह्यातून केवळ ४११६ अर्ज शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत. अर्ज आल्यानंतर जालना पालिकेने २३४० अर्ज बँकांकडे पाठिवले. परतूरमध्ये ६३ प्रस्तावांना बँकांनी मंजुरी दिली. भोकरदनमध्ये १४५ प्रस्ताव मंजूर आहेत. अंबड मध्ये ३८१ प्रस्ताव बँकांकडे दाखल करण्यात आले आहेत. घनसावंगीतून बँकांकडे १४२ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. मंठा नगरपंचायतीला २६४ प्रस्तावांचे उद्दिष्ट असून, आजवर एकही प्रस्ताव बँकांकडे दाखल करण्यात आलेला नाही. जाफराबाद पंचायती अंतर्गत दाखल १०९ प्रस्तावांना बँकांनी मंजुरी दिली आहे, तर बदनापूर पालिकेने ३५ प्रस्ताव बँकांकडे दाखल झाले आहेत. दरम्यान, नगरपालिका, नगरपंचायतींकडून जिल्ह्यातील बँकांकडे दाखल एकूण ३००४ प्रस्तावांपैकी ७०२ प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून, ३४० जणांना प्रत्यक्षात लाभ देण्यात आला आहे. ही आकडेवारी पाहता प्रशासकीय उदासीनता आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून होणारे दुर्लक्ष यामुळे अनेक फेरीवाले अद्यापही पीएम अर्थसाहाय योजनेपासून वंचित आहेत.

तालुकानिहाय परिस्थिती

तालुकामंजूर वितरित

जालना २६९ १२०

परतूर ६३ ०४४

भोकरदन १४५ ०९४

अंबड ८९ ३६

घनसावंगी २५ २४

मंठा ०० ०००

जाफराबाद १०९ ०२१

बदनापूर ००२ ००१

कोट

वाटप सुरू आहे

पीएम स्वनिधी योजनेची प्रत्यक्षात कार्यवाही सुरू आहे. नगरपालिकांकडून दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार लाभार्थींना अर्थसाहाय्याचे वाटप केले जात आहे. ही प्रक्रिया अधिक गतीने राबविण्याबाबत बँक प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत.

- निशांत इल्लमवार

जिल्हा अग्रणी बँक अधिकारी