शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

‘पीएम स्वनिधी’ला राष्ट्रीयीकृत बँकांचा खोडा; ४११६ फेरीवाल्यांचे अर्ज केवळ ३४० जणांना मिळाला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 18:17 IST

जालना जिल्ह्यात जवळपास ५२१७ फेरीवाल्यांना हे अर्थसाहाय्य वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

ठळक मुद्देजिल्ह्यातून केवळ ४११६ अर्ज शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत.र्ज आल्यानंतर जालना पालिकेने २३४० अर्ज बँकांकडे पाठिवले.

- विजय मुंडे

जालना : हातगाड्यांवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची आर्थिक उन्नती व्हावी, त्यांच्या व्यवसायात वृद्धी व्हावी, यासाठी केंद्र शासनाच्यावतीने पीएम स्वनिधी योजना राबविण्यात येत आहे. परंतु या योजनेला जालना जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांकडूनच खोडा घातला जात आहे. जिल्ह्यातील ४११६ फेरीवाल्यांनी या अर्थसाहाय्यासाठी अर्ज केले आहेत. नगरपालिका, नगरपंचायतींनी ३००४ लाभार्थींचे अर्ज पाठविल्यानंतर बँकांनी ७०२ प्रस्तावांना मंजुरी दिली; परंतु मंजूर प्रस्तावांपैकी आजवर केवळ ३४० जणांना प्रत्यक्षात लाभ देण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यात जवळपास ५२१७ फेरीवाल्यांना हे अर्थसाहाय्य वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु, याची जनजागृती कमी प्रमाणात झाल्याने जिल्ह्यातून केवळ ४११६ अर्ज शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत. अर्ज आल्यानंतर जालना पालिकेने २३४० अर्ज बँकांकडे पाठिवले. परतूरमध्ये ६३ प्रस्तावांना बँकांनी मंजुरी दिली. भोकरदनमध्ये १४५ प्रस्ताव मंजूर आहेत. अंबड मध्ये ३८१ प्रस्ताव बँकांकडे दाखल करण्यात आले आहेत. घनसावंगीतून बँकांकडे १४२ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. मंठा नगरपंचायतीला २६४ प्रस्तावांचे उद्दिष्ट असून, आजवर एकही प्रस्ताव बँकांकडे दाखल करण्यात आलेला नाही. जाफराबाद पंचायती अंतर्गत दाखल १०९ प्रस्तावांना बँकांनी मंजुरी दिली आहे, तर बदनापूर पालिकेने ३५ प्रस्ताव बँकांकडे दाखल झाले आहेत. दरम्यान, नगरपालिका, नगरपंचायतींकडून जिल्ह्यातील बँकांकडे दाखल एकूण ३००४ प्रस्तावांपैकी ७०२ प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून, ३४० जणांना प्रत्यक्षात लाभ देण्यात आला आहे. ही आकडेवारी पाहता, प्रशासकीय उदासीनता आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून होणारे दुर्लक्ष यामुळे अनेक फेरीवाले अद्यापही पीएम अर्थसाहाय्य योजनेपासून वंचित आहेत.

तालुकानिहाय परिस्थिती

तालुका  - मंजूर - वितरितजालना - २६९   -  १२०परतूर - ६३०- ४४भोकरदन १४५०- ९४अंबड ८९ - ३६घनसावंगी २५ - २४मंठा ०० - ०००जाफराबाद १०९ - ०२१बदनापूर ००२ - ००१

वाटप सुरू आहेपीएम स्वनिधी योजनेची प्रत्यक्षात कार्यवाही सुरू आहे. नगरपालिकांकडून दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार लाभार्थींना अर्थसाहाय्याचे वाटप केले जात आहे. ही प्रक्रिया अधिक गतीने राबविण्याबाबत बँक प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत.- निशांत इल्लमवार, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी

टॅग्स :bankबँकJalanaजालनाfundsनिधी