शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कृषी विभागाकडून फळझाडांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 1:12 AM

राज्य सरकारच्या शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत कृषी विभागाला पाच लाख ४३ हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले असून, या अंतर्गत चिकू, मोसंबी तसेच डाळिंबाच्या झाडांची लागवड करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य सरकारच्या शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत कृषी विभागाला पाच लाख ४३ हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले असून, या अंतर्गत चिकू, मोसंबी तसेच डाळिंबाच्या झाडांची लागवड करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.या अंतर्गत बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण, नजीकपांगरी, चितोडा, उज्जैनपुरी या गावामधील तरूणांनी देखील या वृक्षलागडवीस चांगला प्रतिसाद दिला आहे.केळीगव्हाण परिसरातील अंकुश कदम, बाबूराव लहाने, संभाजी कान्हेरे, राजू लहाने, सखाराम लहाने, मिसार शहा, कदीर शहा, रेहमान शेख, बाळू सोरमारे आदींचा त्यात समावेश आहे. जालना जिल्ह्याला शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत जवळपास ३८ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, याची प्रभावी अंमलबजावणी करण्यायसाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे मार्गदर्शन निवृत्त वनअधिकारी तथा या मोहिमेतील सक्रिय कार्यकर्ते एकनाथ कान्हेनेरे यांनी दिली. त्यांनी रविवारी वरील गावाचा दौरा करून वृक्ष लागवडी संदर्भात मार्गदर्शन केले.कृषी विभागाला जे उद्दिष्ट दिले आहे, त्यापैकी या फळबाग लागवडीमुळे त्याला गती आली असून, आता पर्यंत ८३ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती एकनाथ कान्हेरे यांनी दिली.पावसामुळे गती वाढलीजालना जिल्ह्यात विविध विभागांनी मिळून ३७ लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. याची तयारी उन्हाळ्यात विविध गाव तसेच रस्त्यालगत खड्डे खोदून केली होती. मात्र, मध्यंतरी पाऊस लांबल्याने ही मोहीम थंडावली होती. आता चांगला पाऊस होत असल्याने झाडे लावण्यासह त्यांची वाढ होण्यास मदत होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजना