शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

एसटीच्या रातराणीसह ट्रॅव्हल्सला प्रवाशांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:39 IST

जालना : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यातील कोरोनाची रूग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे नागरिक प्रवास करीत असून, एसटी ...

जालना : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यातील कोरोनाची रूग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे नागरिक प्रवास करीत असून, एसटी महामंडळाच्या रातराणी बसेसह ट्रॅव्हल्सला आता चांगला प्रतिसाद मिळत आहेत. त्यामुळे ट्रॅव्हल्ससह रातराणी बसेसमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या रूग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे शासनाला ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लागू करावे लागले. या काळात एसटीसह ट्रॅव्हल्स बंद होत्या. आता रूग्णसंख्या कमी झाल्याने शासनाने अनलॉक जाहीर केले आहे. सर्व व्यवहार सुरू झाले असून, बस व ट्रॅव्हल्स सुरू झाल्या आहेत. अनलॉक होताच, नागरिकही मोठ्या प्रमाणात प्रवास करीत आहेत.

सध्या बसेस व ट्रॅव्हल्स सुरू झाल्यामुळे सध्या प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकंदर एसटी महामंडळ व ट्रॅव्हल्स चालकांना चांगले दिवस आले आहे. जिल्ह्यात सध्या एसटी महामडंळाच्या ३१४ फेऱ्या होत आहेत. तर तीन रातराणी बसेस सुरू आहे. यात जालना-कोल्हापूर, परतूर -मुंबई आणि जालना -पुणे अशा महामंडळाच्या रातराणी बसेस सुरू आहेत. तिन्ही मार्गांवर चांगला प्रतिसाद मिळत असून, दिवसाला महामंडळाला ५० ते ६० हजार रूपयांचे उत्पन्न मिळत आहे. दुसरीकडे ट्रॅव्हल्समध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे.

टॅव्हल्सचे तिकीट जास्त, तरीही गर्दी

चार महिन्यानंतर ट्रॅव्हल्स सुरू झाल्या आहेत. मध्यंतरी म्हणजे फेब्रुवारी ते मे या दरम्यान कोरोना महामारीमुळे ट्रॅव्हल्स बंद होत्या. आता ट्रॅव्हल्स सुरू झाल्या असून, प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जे लोक लाॅकडाऊनच्या काळात पुणे, मुंबई, नागपूर या शहरांतून परत आले आहे, ते आता परत पुणे, मुंबईकडे जात असून, प्रवाशासाठी ते ट्रॅव्हल्सला पसंती देत आहे.

ट्रॅव्हल्सच्या तिकिटाचे दरही पूर्वीप्रमाणेच असून, त्यात काहीही वाढ झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

कोरोनाचे नियम पाळले जात आहे. पेट्रोल व डिझेल दरवाढीनंतर तिकीट दरात वाढ झाली नाही.

महामंडळाने कोल्हापूर, मुंबई आणि पुणे या रातराणी बसेस सुरू केल्या आहेत. आजमितीस तरी या रातराणी बसेसेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना महामारी ओसरत चालली असली तरी कोरोनाचे नियम मात्र पाळले जात आहेत. प्रवाशाला मास्क असेल तर एसटी बसेसमध्ये प्रवेश दिला जात आहे. चालक, वाहकाला ही मास्कबाबत सूचना केली जात आहे. सध्या सर्वच बसेस सुरू झाल्या आहेत. प्रवाशांनी एसटीने प्रवास करावा. शिवाय, आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.

- प्रमोद नेहूळ, विभाग नियंत्रक , जालना

पुणे, मुंबई मार्गावर गर्दी

महामंडळाकडून जालना- कोल्हापूर, परतूर-मुंबई व जालना -पुणे या रातराणी बसेस सुरू केल्या आहेत. यातील पुणे व मुंबई मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. मध्यंतरी कोरोनामुळे एसटी बसेस बंद होत्या. त्यामुळे महामंडळाला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला होता. आजमितीस रातराणी सुरू झाल्यामुळे महामंडळाचे उत्पन्न वाढले.