शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

एसटीच्या रातराणीसह ट्रॅव्हल्सला प्रवाशांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:39 IST

जालना : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यातील कोरोनाची रूग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे नागरिक प्रवास करीत असून, एसटी ...

जालना : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यातील कोरोनाची रूग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे नागरिक प्रवास करीत असून, एसटी महामंडळाच्या रातराणी बसेसह ट्रॅव्हल्सला आता चांगला प्रतिसाद मिळत आहेत. त्यामुळे ट्रॅव्हल्ससह रातराणी बसेसमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या रूग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे शासनाला ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लागू करावे लागले. या काळात एसटीसह ट्रॅव्हल्स बंद होत्या. आता रूग्णसंख्या कमी झाल्याने शासनाने अनलॉक जाहीर केले आहे. सर्व व्यवहार सुरू झाले असून, बस व ट्रॅव्हल्स सुरू झाल्या आहेत. अनलॉक होताच, नागरिकही मोठ्या प्रमाणात प्रवास करीत आहेत.

सध्या बसेस व ट्रॅव्हल्स सुरू झाल्यामुळे सध्या प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकंदर एसटी महामंडळ व ट्रॅव्हल्स चालकांना चांगले दिवस आले आहे. जिल्ह्यात सध्या एसटी महामडंळाच्या ३१४ फेऱ्या होत आहेत. तर तीन रातराणी बसेस सुरू आहे. यात जालना-कोल्हापूर, परतूर -मुंबई आणि जालना -पुणे अशा महामंडळाच्या रातराणी बसेस सुरू आहेत. तिन्ही मार्गांवर चांगला प्रतिसाद मिळत असून, दिवसाला महामंडळाला ५० ते ६० हजार रूपयांचे उत्पन्न मिळत आहे. दुसरीकडे ट्रॅव्हल्समध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे.

टॅव्हल्सचे तिकीट जास्त, तरीही गर्दी

चार महिन्यानंतर ट्रॅव्हल्स सुरू झाल्या आहेत. मध्यंतरी म्हणजे फेब्रुवारी ते मे या दरम्यान कोरोना महामारीमुळे ट्रॅव्हल्स बंद होत्या. आता ट्रॅव्हल्स सुरू झाल्या असून, प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जे लोक लाॅकडाऊनच्या काळात पुणे, मुंबई, नागपूर या शहरांतून परत आले आहे, ते आता परत पुणे, मुंबईकडे जात असून, प्रवाशासाठी ते ट्रॅव्हल्सला पसंती देत आहे.

ट्रॅव्हल्सच्या तिकिटाचे दरही पूर्वीप्रमाणेच असून, त्यात काहीही वाढ झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

कोरोनाचे नियम पाळले जात आहे. पेट्रोल व डिझेल दरवाढीनंतर तिकीट दरात वाढ झाली नाही.

महामंडळाने कोल्हापूर, मुंबई आणि पुणे या रातराणी बसेस सुरू केल्या आहेत. आजमितीस तरी या रातराणी बसेसेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना महामारी ओसरत चालली असली तरी कोरोनाचे नियम मात्र पाळले जात आहेत. प्रवाशाला मास्क असेल तर एसटी बसेसमध्ये प्रवेश दिला जात आहे. चालक, वाहकाला ही मास्कबाबत सूचना केली जात आहे. सध्या सर्वच बसेस सुरू झाल्या आहेत. प्रवाशांनी एसटीने प्रवास करावा. शिवाय, आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.

- प्रमोद नेहूळ, विभाग नियंत्रक , जालना

पुणे, मुंबई मार्गावर गर्दी

महामंडळाकडून जालना- कोल्हापूर, परतूर-मुंबई व जालना -पुणे या रातराणी बसेस सुरू केल्या आहेत. यातील पुणे व मुंबई मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. मध्यंतरी कोरोनामुळे एसटी बसेस बंद होत्या. त्यामुळे महामंडळाला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला होता. आजमितीस रातराणी सुरू झाल्यामुळे महामंडळाचे उत्पन्न वाढले.