शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

निसर्गाचा प्रकोप; बळीराजा हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 00:22 IST

परतीच्या पावसाने केलेल्या हाहाकाराने टेंभुर्णीसह परिसरात खरीप हंगामाची दाणादाण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : परतीच्या पावसाने केलेल्या हाहाकाराने टेंभुर्णीसह परिसरात खरीप हंगामाची दाणादाण झाली आहे. निसर्गाच्या या प्रकोपाने बळीराजा पुरता भांबावून गेला असून, त्याच्या दैनीला वाण राहिलेले नाही. दरम्यान दोन- चार दिवसांच्या उघडीपीनंतर गुरूवारी सायंकाळी पुन्हा तासभर धो- धो पाऊस येथील परिसरात कोसळल्याने बळीराजाचे अवसान पुन्हा गळाले आहे.मका, सोयाबीन हातचे गेले. निदान अर्धीनिर्धी कपाशी तरी हाती येईल ही वेडी आशा शेतकरी बाळगून होता. मात्र, आता कापसाच्या वाती झाल्या तर आलेली बोंडही काळी होवून गळून पडत आहे. अतिपावसाने कपाशीची झाडे पिवळी पडू लागली आहेत. यामुळे आता कपाशीच्या आशाही मावळल्या आहेत.मागील दोन दिवसांच्या उघडीपीत शेतकरी कोंब फुटलेली मकाची कणसे, सोयाबीनचे काड जमा करण्यात गुंतला होता. त्यातच गुरुवारी पुन्हा पाऊस बरसल्याने निसर्गाच्या या क्रूरचेष्टेपुढे बळीराजा हतबल झाला आहे. ऐन दिवाळीच्या दिवसांत निसर्गाने खरीप हंगामाचं दिवाळं काढल्याने बळीराजा अक्षरश: मेटाकुटीला आला आहे.सरसकट मदतीची मागणीटेंभुर्णी परिसरात जवळपास सगळीकडेच निसर्गाने हे तांडव मांडल्याने खरीप पिके उद्धवस्त झाली आहेत. त्यामुळे आता पंचनाम्यांचा फार्स न करता शासनाने सरसकट एकरी मदत जाहीर करून ती त्वरीत शेतकऱ्यांच्या हाती द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीभोकरदन : परतीच्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. या नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, या मागणीचे निवेदन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती प्रतिष्ठानतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. खरीप हंगामातील पिकांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले असल्याने शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच केदारखेडा येथील पूर्णा नदीचे पाणी नदीकाठच्या शेतात गेल्याने पिके वाहून गेली आहेत. यामुळे शेतक-यांना आर्थिक मदतीची गरज असल्याचेही म्हटले आहे. यावेळी महेश पुरोहित, मनीष श्रीवास्तव, रमेश पगारे, शिवाजी पुंड, कृष्णा बोराडे, मारुती गाडेकर, राजू शेळके, रायभान शिंदे, प्रदीप पैठणकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी