शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
5
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
6
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
7
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
10
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
11
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
12
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
13
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
14
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
15
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
16
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
17
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
18
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
19
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
20
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

निसर्गाचा प्रकोप; बळीराजा हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 00:22 IST

परतीच्या पावसाने केलेल्या हाहाकाराने टेंभुर्णीसह परिसरात खरीप हंगामाची दाणादाण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : परतीच्या पावसाने केलेल्या हाहाकाराने टेंभुर्णीसह परिसरात खरीप हंगामाची दाणादाण झाली आहे. निसर्गाच्या या प्रकोपाने बळीराजा पुरता भांबावून गेला असून, त्याच्या दैनीला वाण राहिलेले नाही. दरम्यान दोन- चार दिवसांच्या उघडीपीनंतर गुरूवारी सायंकाळी पुन्हा तासभर धो- धो पाऊस येथील परिसरात कोसळल्याने बळीराजाचे अवसान पुन्हा गळाले आहे.मका, सोयाबीन हातचे गेले. निदान अर्धीनिर्धी कपाशी तरी हाती येईल ही वेडी आशा शेतकरी बाळगून होता. मात्र, आता कापसाच्या वाती झाल्या तर आलेली बोंडही काळी होवून गळून पडत आहे. अतिपावसाने कपाशीची झाडे पिवळी पडू लागली आहेत. यामुळे आता कपाशीच्या आशाही मावळल्या आहेत.मागील दोन दिवसांच्या उघडीपीत शेतकरी कोंब फुटलेली मकाची कणसे, सोयाबीनचे काड जमा करण्यात गुंतला होता. त्यातच गुरुवारी पुन्हा पाऊस बरसल्याने निसर्गाच्या या क्रूरचेष्टेपुढे बळीराजा हतबल झाला आहे. ऐन दिवाळीच्या दिवसांत निसर्गाने खरीप हंगामाचं दिवाळं काढल्याने बळीराजा अक्षरश: मेटाकुटीला आला आहे.सरसकट मदतीची मागणीटेंभुर्णी परिसरात जवळपास सगळीकडेच निसर्गाने हे तांडव मांडल्याने खरीप पिके उद्धवस्त झाली आहेत. त्यामुळे आता पंचनाम्यांचा फार्स न करता शासनाने सरसकट एकरी मदत जाहीर करून ती त्वरीत शेतकऱ्यांच्या हाती द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीभोकरदन : परतीच्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. या नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, या मागणीचे निवेदन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती प्रतिष्ठानतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. खरीप हंगामातील पिकांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले असल्याने शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच केदारखेडा येथील पूर्णा नदीचे पाणी नदीकाठच्या शेतात गेल्याने पिके वाहून गेली आहेत. यामुळे शेतक-यांना आर्थिक मदतीची गरज असल्याचेही म्हटले आहे. यावेळी महेश पुरोहित, मनीष श्रीवास्तव, रमेश पगारे, शिवाजी पुंड, कृष्णा बोराडे, मारुती गाडेकर, राजू शेळके, रायभान शिंदे, प्रदीप पैठणकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी