शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
3
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
4
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
5
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
6
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
7
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
8
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
9
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
10
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
11
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
12
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
13
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
14
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
15
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी
16
विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

मंदिर हाच आत्मकल्याणाचा एकमेव मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:49 AM

मंदिर हाच आपल्या आत्मकल्याणाचा एकमेव मार्ग आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बालाजी मंदिर संस्थानने प्रसादालय उभारण्याचा हाती घेतलेला संकल्प हा ऐतिहासिक क्षण आहे. कष्ट आणि संयमातून कोणत्याही चांगल्या गोष्टीला आकार येत असतो, आणि हिंदू संस्कृतीला सर्वश्रेष्ठ संस्कृती मानले गेले आहे. त्याचे कारण देखील हेच आहे. म्हणूनच मंदिर हाच आपल्या आत्मकल्याणाचा एकमेव मार्ग आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.जुना जालना भागातील कचेरी रोडवरील बालाजी मंदिरात भक्तांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या प्रसादालयाचे भूमिपूजन जाफराबाद येथील नवनाथ संस्थानचे प. पू. भास्करराव महाराज देशपांडे (भाऊ) यांच्या हस्ते आणि ब्रह्मवृंदांसह मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी वे.शा.सं. शेष महाराज गोंदीकर, प. पू. रामदास महाराज आचार्य, ह.भ.प. नाना महाराज पोखरीकर, ह.भ.प. प्राचार्य दीनानंद महाराज पाठक, प. पू. विवेक महाराज जोगवडकर, वे. शा. सं. रवि महाराज जहागीरदार, वे. शा. सं. विनायक महाराज फुलंब्रीकर यांच्यासह माजी आ. अरविंद चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, जि. प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, माजी नगराध्यक्ष विलास नाईक, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष कल्याण देशपांडे, दत्त मंदिर संस्थानचे अध्यक्ष सुधाकर लोखंडे, प्रा. एस. व्ही. देशपांडे, किरण गरड, अ‍ॅड. बलवंत नाईक, गुजराती समाजाचे अध्यक्ष अमित कसारी, पंडित भुतेकर, विष्णू पाचफुले, गणेश सुपारकर, चंद्रप्रकाश शर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी खोतकर म्हणाले की, या संस्थानच्या विश्वस्तांनी अत्यंत कष्ट आणि संयमातून या मंदिराची उभारणी केल्यानंतर प्रसादालयाचे काम देखील हाती घेतले आहे. या संस्थानकडून खऱ्या अर्थाने हिंदू संस्कृती जपण्याचे कार्य होत असल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय देशपांडे यांनी केले.भास्कर महाराज यांचे मार्गदर्शनया प्रसंगी प. पू. भास्कर महाराज देशपांडे म्हणाले की, देणाºयाचे हात हजारो, दुबळी माझी झोळी ! या कार्याला देखील आपण स्वत: शक्य ती मदत करणार असून, प्रत्येकानेच ती केली तर प्रसादलयाचे कार्य सिध्दीस जाईल असे ते म्हणाले.जिथे अन्नपूर्णा वास करते त्या ठिकाणी देणाऱ्यांची उणीव भासत नाही. या सत्कार्याला निश्चितच सर्वांचेच सहकार्य लाभेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळे