शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकांशिवाय भरली ऑनलाइन शाळा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST

जालना : कोरोनामुळे मुलांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. नव्या शैक्षणिक वर्षातही पुस्तकांविनाच ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. काही ...

जालना : कोरोनामुळे मुलांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. नव्या शैक्षणिक वर्षातही पुस्तकांविनाच ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. काही मुलांनी शाळेतून मिळालेल्या जुन्या पुस्तकांवर ज्ञानार्जन सुरू केले आहे.

कोरोनामुळे नवीन शैक्षणिक वर्षात शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण मुलांना दिले जात आहे. दुसरीकडे शासनाने कोरोनामुक्त गावांमधील शाळा सुरू करण्याच्या हलचाली सुरू केल्या आहेत. परंतु, सर्वशिक्षा अभियानांतर्गत मुलांना शासनाकडून देण्यात येणारी नवीन पाठ्यपुस्तके अद्यापही मिळालेली नाही. प्रतिवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवसांपासून पुस्तकांचे वाटप सुरू केले जाते. परंतु, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप शासनाकडून पुस्तकांचा पुरवठा झालेला नाही. शाळांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत काही मुलांनी जुनी पुस्तके शाळेत जमा केली आहेत. या पुस्तकांवरच काही मुलांनी अभ्यासक्रम सुरू केला आहे. परंतु, जिल्ह्यातील असंख्य मुलं आजही नवीन शैक्षणिक वर्षातील पुस्तकांपासून वंचित आहेत. जिल्ह्याला जवळपास १३ लाखांहून अधिक पुस्तकं लागणार आहेत. त्याची मागणीही शिक्षण विभागाने शासनाकडे नोंदविली आहे.

४० टक्के मुलांनीच केली पुस्तके परत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शासनाकडून पुस्तके मिळण्यास विलंब होत आहे.

शासनाकडून पुस्तके मिळण्यास उशीर होणार असल्याने मुलांनी शाळेत जुनी पुस्तके जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले होते.

त्यानुसार जवळपास ४० टक्के मुलांनी जुनी पुस्तके शाळेत जमा केली आहेत. नव्या वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांना ही पुस्तके वाटप करण्यात आली आहेत.

पुस्तके नाहीत, अभ्यास कसा करणार?

आम्हाला शिक्षकांकडून ऑनलाइन मार्गदर्शन केले जात आहे. परंतु, पुस्तकं नसल्याने अभ्यास करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे आम्हाला अभ्यासासाठी नवीन पुस्तके शासनाने द्यावीत.

- आयान शेख

ऑनलाइन शाळा सुरू झाली आहे. शिक्षकांकडून शिकविण्यास सुरुवातही करण्यात आली आहे. परंतु, नवीन पुस्तकं मिळालेली नाहीत. पुस्तकांसाठी शिक्षकांकडे विचारणा करीत आहोत.

- आदित्य रोडी

शासनाकडे मागणी केली आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. मुलांसाठी लागणाऱ्या पुस्तकांची नोंदणी शासनाकडे केली आहे. पुस्तके प्राप्त होताच गरजूंना वाटप केली जातील. - कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी