शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

विभागीय आयुक्तांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:04 IST

शुक्रवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आढावा बैठकीत अधिकारी, कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात तीव्र दुष्काळ पडला आहे, अशा स्थितीत पाणीटंचाई तसेच मजुरांना कामे उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. असे असतांना अनेक अधिकारी, कर्मचारी ही बाब गांभीर्याने घेत नसल्याने शुक्रवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आढावा बैठकीत अधिकारी, कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात केंद्रेकर यांनी पाच तास आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, स्वामी, तहसीलदार सुधाळकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य व्यवस्थापक आशुतोष देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी केंद्रेकर यांचा रोख हा सुरुवातीपासूनच अत्यंत आक्रमक होता. अनेक अधिका-यांना जागेवर उभे करून त्यांनी त्या विभागाचा जाब विचारला. काही अधिकारी, कर्मचा-यांना समाधानकारक उत्तरे न देता आल्याने त्यांच्यावर केंद्रेकर हे जाम चिडल्याचे सूत्रांनी सांगितले. वातानुकूलित सभागृहातही केंद्रेकरांनी आढावा घेताना अधिकारी, कर्मचा-यांना चांगलाच घाम फोडला. बैठक पाच तास चालल्याने केवळ ज्यांना प्रकृतीची कारणे आहेत, त्यांना काही काळ बैठकीबाहेर जाऊन येण्यास परवानगी दिली होती.अनेक गावांमध्ये शेतक-यांना कर्जमाफी, पीकविमा तसेच शासनाकडून आलेले वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान वाटपात गोंधळ दिसून आला. ही बाब गंभीर असल्याचे सांगून एका गावातील तलाठ्याकडे तीन सजाचा पदभार असल्याने हा गोंधळ झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. परंतु मंडळ अधिकारी तसेच तलाठी, ग्रामसेवकांनी मुख्यालय न सोडण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. दुष्काळ असल्याने कुठल्याच विभागाने तो सहज न घेण्याचे आदेश दिले. मजुरांना कामे उपलब्ध करून देताना काही ठिकाणी दिरंगाई होत असल्याचेही दिसून आले.दुष्काळ : बँकांनी अनुदान वाटप न केल्यास गुन्हे दाखल करणारजालना जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळेच टँकरच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. हे जरी मान्य असले तरी, टँकरने योग्य त्या फे-या होतात काय, याची तपासणी करण्याचे सांगितले. तसेच टंचाईचे आलेले प्रस्ताव संबंधित विभागातील अधिका-यांनी आठवड्याच्या आत त्यावर निर्णय घेण्याचेही ते म्हणाले.अनेक बँकांमध्ये शासनाचे विविध योजनेतून शेतकºयांसाठी अनुदान आणि मदत आली आहे. मात्र, ती केवळ खाते क्रमांक तसेच अन्य काही कारणांमुळे वाटप होत नसल्याचे दिसून आले. ते शेतकºयांच्या खात्यात न गेल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले.जालना जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीपुरवठा योजनांसह टँकरचा आढावा यावेळी घेण्यात आला. बैठक संपल्यावर केंद्रेकर यांनी बदनापूर येथील सोमठाणा धरणास भेट देऊन पाहणी केली. दरम्यान मजुरांना कामे उपलब्ध करून देताना ती जलसंधारणाची द्यावीत असेही केंद्रेकरांनी सुचविले.

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाdroughtदुष्काळ