शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

विभागीय आयुक्तांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:04 IST

शुक्रवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आढावा बैठकीत अधिकारी, कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात तीव्र दुष्काळ पडला आहे, अशा स्थितीत पाणीटंचाई तसेच मजुरांना कामे उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. असे असतांना अनेक अधिकारी, कर्मचारी ही बाब गांभीर्याने घेत नसल्याने शुक्रवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आढावा बैठकीत अधिकारी, कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात केंद्रेकर यांनी पाच तास आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, स्वामी, तहसीलदार सुधाळकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य व्यवस्थापक आशुतोष देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी केंद्रेकर यांचा रोख हा सुरुवातीपासूनच अत्यंत आक्रमक होता. अनेक अधिका-यांना जागेवर उभे करून त्यांनी त्या विभागाचा जाब विचारला. काही अधिकारी, कर्मचा-यांना समाधानकारक उत्तरे न देता आल्याने त्यांच्यावर केंद्रेकर हे जाम चिडल्याचे सूत्रांनी सांगितले. वातानुकूलित सभागृहातही केंद्रेकरांनी आढावा घेताना अधिकारी, कर्मचा-यांना चांगलाच घाम फोडला. बैठक पाच तास चालल्याने केवळ ज्यांना प्रकृतीची कारणे आहेत, त्यांना काही काळ बैठकीबाहेर जाऊन येण्यास परवानगी दिली होती.अनेक गावांमध्ये शेतक-यांना कर्जमाफी, पीकविमा तसेच शासनाकडून आलेले वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान वाटपात गोंधळ दिसून आला. ही बाब गंभीर असल्याचे सांगून एका गावातील तलाठ्याकडे तीन सजाचा पदभार असल्याने हा गोंधळ झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. परंतु मंडळ अधिकारी तसेच तलाठी, ग्रामसेवकांनी मुख्यालय न सोडण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. दुष्काळ असल्याने कुठल्याच विभागाने तो सहज न घेण्याचे आदेश दिले. मजुरांना कामे उपलब्ध करून देताना काही ठिकाणी दिरंगाई होत असल्याचेही दिसून आले.दुष्काळ : बँकांनी अनुदान वाटप न केल्यास गुन्हे दाखल करणारजालना जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळेच टँकरच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. हे जरी मान्य असले तरी, टँकरने योग्य त्या फे-या होतात काय, याची तपासणी करण्याचे सांगितले. तसेच टंचाईचे आलेले प्रस्ताव संबंधित विभागातील अधिका-यांनी आठवड्याच्या आत त्यावर निर्णय घेण्याचेही ते म्हणाले.अनेक बँकांमध्ये शासनाचे विविध योजनेतून शेतकºयांसाठी अनुदान आणि मदत आली आहे. मात्र, ती केवळ खाते क्रमांक तसेच अन्य काही कारणांमुळे वाटप होत नसल्याचे दिसून आले. ते शेतकºयांच्या खात्यात न गेल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले.जालना जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीपुरवठा योजनांसह टँकरचा आढावा यावेळी घेण्यात आला. बैठक संपल्यावर केंद्रेकर यांनी बदनापूर येथील सोमठाणा धरणास भेट देऊन पाहणी केली. दरम्यान मजुरांना कामे उपलब्ध करून देताना ती जलसंधारणाची द्यावीत असेही केंद्रेकरांनी सुचविले.

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाdroughtदुष्काळ