शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

विभागीय आयुक्तांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:04 IST

शुक्रवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आढावा बैठकीत अधिकारी, कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात तीव्र दुष्काळ पडला आहे, अशा स्थितीत पाणीटंचाई तसेच मजुरांना कामे उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. असे असतांना अनेक अधिकारी, कर्मचारी ही बाब गांभीर्याने घेत नसल्याने शुक्रवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आढावा बैठकीत अधिकारी, कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात केंद्रेकर यांनी पाच तास आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, स्वामी, तहसीलदार सुधाळकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य व्यवस्थापक आशुतोष देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी केंद्रेकर यांचा रोख हा सुरुवातीपासूनच अत्यंत आक्रमक होता. अनेक अधिका-यांना जागेवर उभे करून त्यांनी त्या विभागाचा जाब विचारला. काही अधिकारी, कर्मचा-यांना समाधानकारक उत्तरे न देता आल्याने त्यांच्यावर केंद्रेकर हे जाम चिडल्याचे सूत्रांनी सांगितले. वातानुकूलित सभागृहातही केंद्रेकरांनी आढावा घेताना अधिकारी, कर्मचा-यांना चांगलाच घाम फोडला. बैठक पाच तास चालल्याने केवळ ज्यांना प्रकृतीची कारणे आहेत, त्यांना काही काळ बैठकीबाहेर जाऊन येण्यास परवानगी दिली होती.अनेक गावांमध्ये शेतक-यांना कर्जमाफी, पीकविमा तसेच शासनाकडून आलेले वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान वाटपात गोंधळ दिसून आला. ही बाब गंभीर असल्याचे सांगून एका गावातील तलाठ्याकडे तीन सजाचा पदभार असल्याने हा गोंधळ झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. परंतु मंडळ अधिकारी तसेच तलाठी, ग्रामसेवकांनी मुख्यालय न सोडण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. दुष्काळ असल्याने कुठल्याच विभागाने तो सहज न घेण्याचे आदेश दिले. मजुरांना कामे उपलब्ध करून देताना काही ठिकाणी दिरंगाई होत असल्याचेही दिसून आले.दुष्काळ : बँकांनी अनुदान वाटप न केल्यास गुन्हे दाखल करणारजालना जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळेच टँकरच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. हे जरी मान्य असले तरी, टँकरने योग्य त्या फे-या होतात काय, याची तपासणी करण्याचे सांगितले. तसेच टंचाईचे आलेले प्रस्ताव संबंधित विभागातील अधिका-यांनी आठवड्याच्या आत त्यावर निर्णय घेण्याचेही ते म्हणाले.अनेक बँकांमध्ये शासनाचे विविध योजनेतून शेतकºयांसाठी अनुदान आणि मदत आली आहे. मात्र, ती केवळ खाते क्रमांक तसेच अन्य काही कारणांमुळे वाटप होत नसल्याचे दिसून आले. ते शेतकºयांच्या खात्यात न गेल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले.जालना जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीपुरवठा योजनांसह टँकरचा आढावा यावेळी घेण्यात आला. बैठक संपल्यावर केंद्रेकर यांनी बदनापूर येथील सोमठाणा धरणास भेट देऊन पाहणी केली. दरम्यान मजुरांना कामे उपलब्ध करून देताना ती जलसंधारणाची द्यावीत असेही केंद्रेकरांनी सुचविले.

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाdroughtदुष्काळ