शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बालकामगार प्रकल्पातील महिलांचे कार्य उद्दिष्टपूर्ततेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:16 IST

बालकामगार प्रकल्प यशस्वी करण्यात या प्रकल्पातील महिलांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी यापुढेही असेच चांगले काम केल्यास जिल्ह्यातून बालकामगारांचे उच्चाटन होईल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बालकामगार प्रकल्प यशस्वी करण्यात या प्रकल्पातील महिलांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी यापुढेही असेच चांगले काम केल्यास जिल्ह्यातून बालकामगारांचे उच्चाटन होईल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. त्यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, कामगार अधिकारी टी.ई. कराड, प्रकल्प संचालक मनोज देशमुख, विधितज्ज्ञ अश्विनी धन्नावत, स्त्रीरोग तज्ज्ञ अंजली हुसे, दानकुंवर महिला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या विद्या पटवारी, जे.ई.एस. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या संध्या रोटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना विजया रहाटकर यांनी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील महिला कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून बालकामगार विद्यार्थ्यानी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, कार्यक्रमाचे नियोजन पाहून तसेच बालकामगार प्रकल्पातील महिला कर्मचाºयांचे कार्य व शिस्त बघून सांगितले की, खरोखरच हा बालकामगार प्रकल्प उद्दिष्टपूर्ततेकडे जात आहे. आज महिला सक्षमीकरण काळाची गरज आहे, हे त्यांनी महिला संदर्भातील विविध कायदे याचे उदाहरण देऊन सांगितले. महाराष्ट्र राज्य महिला आयोगा सोबत पुढील येणा-या काळात महत्वकांक्षी प्रकल्प व महत्वाकांक्षी उपक्रम राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पासोबत राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर महिला व बालकांसंदर्भात प्रस्ताव केंद्र शासनाकडून मंजूर करून त्याचा प्रत्यक्ष लाभ प्रकल्पास देण्याची ग्वाही दिली.सूत्रसंचालन मो. फरहीन तर आभार प्रदर्शन छाया सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील कार्यक्रम व्यवस्थापक रामदास जगताप, व्यवसायिक प्रशिक्षक उषा मगर, रेखा बोर्डे, रुपाली कोकणे, दुर्गा शेळके, अर्चना घाटेकर, शेख समीना, रूचिरा धोत्रे, पुष्पा कापसे, शेख अरेफा, प्रतिभा सुरडकर, दत्तात्रय रायमल, राजू राठोड, शुभांगी रत्नपारखी यांच्यासह कार्यालयीन अधिकारी व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.जालन्यात २००५ पासून हा प्रकल्प यशस्वीपणे सुरू असल्याची माहिती मनोज देशमुख यांनी देऊन, यातून अनेकांना लाभ झाला आहे.यावेळी अपर जिल्हाधिकारी खपले म्हणाले की, प्रकल्पाकरिता भविष्यात प्रशासनास्तरावर आवश्यक मदत करण्याचे आश्वासन देऊन शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकामध्ये प्रकल्प संचालक मनोज देशमुख यांनी सांगितले की, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प जालना हा महिला सक्षमीकरणाचे एक उत्तम उदाहरण असून, प्रकल्पात महिला कर्मचारी जास्त असल्यामुळेच त्यांच्या माध्यमातून बालकामगार विद्यार्थ्यांना आतापर्यंत शासकीय व अशासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळून दिला आहे. यावेळी डॉ. अंजली हुसे, विधि तज्ज्ञ अश्विनी धन्नावत, विद्या पटवारी, संध्या रोटकर यांनीही उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :WomenमहिलाVijaya Rahatkarविजया रहाटकरSocialसामाजिक