शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

बालकामगार प्रकल्पातील महिलांचे कार्य उद्दिष्टपूर्ततेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:16 IST

बालकामगार प्रकल्प यशस्वी करण्यात या प्रकल्पातील महिलांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी यापुढेही असेच चांगले काम केल्यास जिल्ह्यातून बालकामगारांचे उच्चाटन होईल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बालकामगार प्रकल्प यशस्वी करण्यात या प्रकल्पातील महिलांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी यापुढेही असेच चांगले काम केल्यास जिल्ह्यातून बालकामगारांचे उच्चाटन होईल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. त्यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, कामगार अधिकारी टी.ई. कराड, प्रकल्प संचालक मनोज देशमुख, विधितज्ज्ञ अश्विनी धन्नावत, स्त्रीरोग तज्ज्ञ अंजली हुसे, दानकुंवर महिला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या विद्या पटवारी, जे.ई.एस. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या संध्या रोटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना विजया रहाटकर यांनी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील महिला कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून बालकामगार विद्यार्थ्यानी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, कार्यक्रमाचे नियोजन पाहून तसेच बालकामगार प्रकल्पातील महिला कर्मचाºयांचे कार्य व शिस्त बघून सांगितले की, खरोखरच हा बालकामगार प्रकल्प उद्दिष्टपूर्ततेकडे जात आहे. आज महिला सक्षमीकरण काळाची गरज आहे, हे त्यांनी महिला संदर्भातील विविध कायदे याचे उदाहरण देऊन सांगितले. महाराष्ट्र राज्य महिला आयोगा सोबत पुढील येणा-या काळात महत्वकांक्षी प्रकल्प व महत्वाकांक्षी उपक्रम राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पासोबत राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर महिला व बालकांसंदर्भात प्रस्ताव केंद्र शासनाकडून मंजूर करून त्याचा प्रत्यक्ष लाभ प्रकल्पास देण्याची ग्वाही दिली.सूत्रसंचालन मो. फरहीन तर आभार प्रदर्शन छाया सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील कार्यक्रम व्यवस्थापक रामदास जगताप, व्यवसायिक प्रशिक्षक उषा मगर, रेखा बोर्डे, रुपाली कोकणे, दुर्गा शेळके, अर्चना घाटेकर, शेख समीना, रूचिरा धोत्रे, पुष्पा कापसे, शेख अरेफा, प्रतिभा सुरडकर, दत्तात्रय रायमल, राजू राठोड, शुभांगी रत्नपारखी यांच्यासह कार्यालयीन अधिकारी व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.जालन्यात २००५ पासून हा प्रकल्प यशस्वीपणे सुरू असल्याची माहिती मनोज देशमुख यांनी देऊन, यातून अनेकांना लाभ झाला आहे.यावेळी अपर जिल्हाधिकारी खपले म्हणाले की, प्रकल्पाकरिता भविष्यात प्रशासनास्तरावर आवश्यक मदत करण्याचे आश्वासन देऊन शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकामध्ये प्रकल्प संचालक मनोज देशमुख यांनी सांगितले की, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प जालना हा महिला सक्षमीकरणाचे एक उत्तम उदाहरण असून, प्रकल्पात महिला कर्मचारी जास्त असल्यामुळेच त्यांच्या माध्यमातून बालकामगार विद्यार्थ्यांना आतापर्यंत शासकीय व अशासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळून दिला आहे. यावेळी डॉ. अंजली हुसे, विधि तज्ज्ञ अश्विनी धन्नावत, विद्या पटवारी, संध्या रोटकर यांनीही उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :WomenमहिलाVijaya Rahatkarविजया रहाटकरSocialसामाजिक