वडीगोद्री(जालना)- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकरी प्रश्नांवर मोठं आंदोलन उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत मागं हटणार नाही, असा इशारा त्यांनी दिला असून, “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता रस्त्यावर कसा फिरतो, हेच पाहतो,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
अंतरवलीत शेतकरी नेत्यांसोबत चर्चा
जरांगे पाटलांनी सांगितले की, येत्या २ नोव्हेंबर रोजी अंतरवली सराटीत शेतकरी नेते, शेतकरी संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, अभ्यासक आणि तज्ञ यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतीमालाला भाव आणि शेतकरी स्वावलंबन या विषयांवर सविस्तर चर्चा केली जाईल. शेतकऱ्यांसाठी आम्ही इमानदारीने लढाई लढू आणि ती जिंकू. हे आंदोलन ऐतिहासिक ठरणार, असंही त्यांनी सांगितलं.
भुजबळांचा जामीन रद्द करुन मंत्रिमंडळातून बाहेर काढा; जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
शेतकरी संघटनांना आग्रहाचे निमंत्रण
या बैठकीसाठी शेतकरी संघटनांचे सर्व अध्यक्ष, कार्यकर्ते, अभ्यासक आणि तज्ञांना जरांगे पाटलांनी आग्रहाचे निमंत्रण दिलं आहे. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची राज्यस्तरीय बैठक बोलावली जाईल आणि त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
Web Summary : Manoj Jarange Patil prepares farmer protest demanding complete loan waiver. He challenges leaders to face public if farmers' debts remain unpaid. Meeting planned with farm leaders, experts to discuss solutions; state-level meeting to follow to decide protest strategy.
Web Summary : मनोज जरांगे पाटिल ने किसान कर्ज माफी की मांग के साथ आंदोलन की तैयारी की। उन्होंने नेताओं को चुनौती दी कि अगर किसानों का कर्ज माफ नहीं होता है तो वे सार्वजनिक रूप से सामना करें। समाधान पर चर्चा के लिए किसान नेताओं और विशेषज्ञों के साथ बैठक की योजना; विरोध रणनीति तय करने के लिए राज्य स्तरीय बैठक होगी।