शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

आता पाच वर्षे वाट पाहणार नाही; कैलास गोरंट्याल यांनी दिले पक्ष बदलाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 16:04 IST

मी महापौर म्हणून किंवा उमेदवारीसाठी कोणला आश्वासने दिली नाहीत. त्याचा फटका मला बसला.

जालना : जिथं आपण अधिक काम केलं तिथं आपल्या विरोधात फतवे निघाले. आजवर इमानदारीने काम केलं. मी पाच वर्षे वाट पाहणार नाही. जालन्यात राजकीय भूकंप कसे येतात हे लवकरच दिसेल. झालेल्या राजकीय वस्त्रहरणास मी चेकमेट करणार असल्याचे सांगत काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पक्ष सोडण्याबाबतचे संकेत दिले.

खा. कल्याण काळे यांनी सुरू केलेल्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी गोरंट्याल बोलत होते. गोरंट्याल यांनी आजवर केलेले काम आणि निवडणुकीत झालेला पराभव यावर मत व्यक्त केले. जालन्याच्या पाण्याचा प्रभावच वेगळा आहे. इथं चांगले काम केले की लोकं जा.. ना.. असे म्हणतात. मी महापौर म्हणून किंवा उमेदवारीसाठी कोणला आश्वासने दिली नाहीत. त्याचा फटका मला बसला. इथं तुम्ही किमान २५ जणांना 'तूच महापौर होणार' असे म्हणा असेही गोरंट्याल खा. काळे यांना म्हणाले. आपण आणखी पाच वर्षे वाट पाहू शकत नाही. राजकीय भूकंप कसे येतात हे लवकरच दिसेल. झालेल्या राजकीय वस्त्रहरणास मी चेकमेट करणार आहे. परंतु, तत्पूर्वी जवळील साप, विंचवांना बाहेर काढणार असल्याचेही गोरंट्याल यावेळी म्हणाले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही गोरंट्याल यांनी पक्षाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यात खासदारांच्या पक्ष कार्यालय उद्घाटन कार्यक्रमात आपण पाच वर्षे वाट पाहणार नाही, असे म्हणत पक्षबदलाचे संकेतच गोरंट्याल यांनी दिल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.

खोतकरांच्या निवडणूक उमेदवारी अर्जावर गोरंट्याल यांची याचिकाजालना विधानसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार अर्जुन खोतकर यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाविरुद्ध काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. खोतकर यांच्या उमेदवारी अर्जाबाबत लेखी स्वरूपात आक्षेप जालना विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता. खोतकरांनी चुकीच्या फॉरमॅटमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला असा आक्षेप गोरंट्याल यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने खोतकरांचा अर्ज आक्षेपानंतरही कायम ठेवल्याचा गोरंट्याल यांचा आरोप आहे. न्यायदेवता आम्हाला योग्य न्याय देईल, अशी अपेक्षाही गोरंट्याल यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :Jalanaजालनाcongressकाँग्रेस