शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

आता शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आंदोलन; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जरांगेंची नवी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 16:53 IST

५ सप्टेंबरपासून राज्यभरात विधानसभा मतदारसंघनिहाय घोंगडी बैठक घेणारं.

- पवन पवार वडीगोद्री ( जालना): ''शेतकरी देखील आमचाच आहे. सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी लक्ष द्यायला तयार नाही. आता आम्ही या प्रश्नात लक्ष घालणार, सरकार कसं कर्जमाफी देणार नाही हे आम्ही बघतो,'' असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला. मराठा आरक्षणानंतर आता आगामी विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत असताना शेतकरी कर्जमाफीवर जरांगे यांनी घेतलेल्या भूमिकेने राज्यातील राजकारणाला नवे वळण मिळू शकते.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत चर्चा करून निर्णय घेऊ. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जास्त ताकद लावणार, असल्याचेही जरांगे यांनी जाहीर केले. तसेच निवडणुकीचे आणखी नियोजन नाही. राज्यभरात विधानसभा मतदार संघानिहाय घोंगडी बैठक घेणारं. याची सुरुवात ५ सप्टेंबरपासून गेवराई मतदार संघातून होईल. यावेळी आमची भूमिका लोकसंसमोर मांडणार. घोंगडी बैठकीचा समारोप कुठे करायचा यांबाबत समाजाची भूमिका जाणून घेऊ, असेही जरांगे म्हणाले.

आमचं आरक्षण ओबीसीत आहे. दिल्लीशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही. त्यांना वेळ काढून न्यायचा होता. सरकार वाटत असलेले पैसे आमचेच आहेत, सरकार काही त्यांचे घर विकून पैसे देत नाही. सरकार आरक्षण देत नाही. चणे आणि रेवड्या देत आहे. आम्ही कट्टर हिंदू आहोत आणि आमचा डीएनए ओबीसींचा आहे एवढंच माहीत आहे, असे जरांगे यांनी निक्षून सांगितले. 

ही लढाई गरिबांची आहे. गरीब कसा मोठा होत नाही ते आपण बघू. माझी मागणी गरिबांना न्याय देण्यासाठी आरक्षण देण्यासाठी आहे. हिंदूच हिंदूला आरक्षण द्यायला विरोध का करतोय. आम्हाला देखील आमचा अभिमान आहे मग लाठ्याकाठ्या मारायलाच मराठा का दिसतो, असा सवाल जरांगे यांनी केला. मराठयांनी आणि शेतकऱ्यांनी लेकराला मोठं करायचा आनंद असावा. आपल लेकरू शेतात काम करत असताना मोठं झालं पाहिजे आणि शेतातून तुम्हाला लोकांनीं खांद्यावर घेऊन गुलाल टाकून मिरवणूक काढत गावात आणायला हवं.

फडणवीस यांनी हेरगिरी करायला ड्रोन ठेवलेरात्री इकडे ड्रोन आले होते ते फडणवीस यांचेच ड्रोन आहेत, त्यांनीच हेरगिरी करायला ड्रोन ठेवले आहेत, असा आरोप करत जरांगे यांनी तुम्ही काहीच करू शकणार नाही, तुमच्या ड्रोनने गोळ्या घातल्या तरी हरकत नाही. मी नसलो तरी माझा समाज तयार आहे, असे आव्हान फडणवीस यांना दिले. आमच्या मागे ईडी लावायला आमच्याकडे मुंबईला जाण्यासाठीचे तिकिटाचे पैसे नाहीत. इथे सगळे अपक्षच उभे राहतील  निवडणूक कशी हे लढणार हे आता सांगणार नाही, अन्यथा फडणवीस यांना तो कळेल, अशी मिश्किल टोलेबाजी जरांगे यांनी केली. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणFarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस