शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

नववसाहतीत ना पाणी, ना धड रस्ते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST

जालना शहराची स्टील उद्योगामुळे देशभरात ओळख आहे. त्यातच वाढलेल्या शैक्षणिक संस्था, बाहेरगावहून कामासाठी येणे आदींमुळे शहरात येणाऱ्यांची संख्या ...

जालना शहराची स्टील उद्योगामुळे देशभरात ओळख आहे. त्यातच वाढलेल्या शैक्षणिक संस्था, बाहेरगावहून कामासाठी येणे आदींमुळे शहरात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे शहराचा विस्तारही झपाट्याने होत आहे. शहरात नववसाहती निर्माण झाल्या आहेत; परंतु सदरील वसाहतींमध्ये सोयीसुविधा मिळत नसल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. काही वसाहतींमध्ये रस्ते नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. पावसाळ्यात तर रस्त्यावर चिखल झाल्याने मोठी कसरत करावी लागते, तर काही ठिकाणी नळ कनेक्शन नसल्याने पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. बहुतांश रहिवाशांनी नळपट्टी भरलेली असतानाही त्यांना पाणी मिळत नाही. नगरपालिकेने कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या सुरू केल्या आहेत; परंतु घंटागाड्या येत नसल्याने घराच्या बाजूलाच कचरा टाकावा लागत आहे. यामुळे दुर्गंधी पसरली असून, रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत अनेकवेळा पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले; पण याकडे लक्ष केले जात आहे.

रस्ता, पाण्याच्या समस्या कायम

नगर परिषद या भागातील रहिवाशांकडून कराची वसुली करते. मग आम्हाला सुविधा का पुरवत नाही, असा सवाल या भागातील रहिवाशांकडून केला जात आहे. मागील सहा वर्षांत येथे कुठलीच विकास कामे झाली नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात हा भाग चिखलमय होतो. या भागात साफसफाई होत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येते. नाल्या नसल्याने रहिवाशांना नाइलाजाने सांडपाणी रस्त्यावर सोडावे लागते. दुसरीकडे नळाला पाणी नसल्याने पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

आम्ही मागील काही दिवसांपासून इंदेवाडी परिसरात राहतो. आमच्या वसाहतीकडे येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने मोठी गैरसोय होत आहे. त्यातच घंटागाडी येत नाही. घंटागाडी येत नसल्याने घराच्या बाजूलाच कचरा टाकावा लागत आहे. आमच्या वसाहतीकडे घंटागाडी पाठवावी.

-मुक्ता माने, इंदेवाडी परिसर

मागील काही वर्षांपासून शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे; परंतु म्हणाव्या तशा सोयीसुविधा नगरपालिका प्रशासनाकडून पुरविल्या जात नाहीत. आमच्या वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत अनेकवेळा निवेदने दिली; परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

-सागर कोकाटे, शिवनगर

शहरातील नववसाहतींमध्ये मुख्य समस्या ही रस्त्याची आहे. बहुतांश कॉलन्यांमधील रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून चालणेही अवघड झाले आहे. तर साफसफाई न होणे, कचरा न उचलणे, कचऱ्यामुळे पसरलेली दुर्गंधी, पाणी न येणे, नाल्या नसल्याने पाणी रस्त्यावर येणे आदी समस्यांना येथील रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे.