शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

नववसाहतीत ना पाणी, ना धड रस्ते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST

जालना शहराची स्टील उद्योगामुळे देशभरात ओळख आहे. त्यातच वाढलेल्या शैक्षणिक संस्था, बाहेरगावहून कामासाठी येणे आदींमुळे शहरात येणाऱ्यांची संख्या ...

जालना शहराची स्टील उद्योगामुळे देशभरात ओळख आहे. त्यातच वाढलेल्या शैक्षणिक संस्था, बाहेरगावहून कामासाठी येणे आदींमुळे शहरात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे शहराचा विस्तारही झपाट्याने होत आहे. शहरात नववसाहती निर्माण झाल्या आहेत; परंतु सदरील वसाहतींमध्ये सोयीसुविधा मिळत नसल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. काही वसाहतींमध्ये रस्ते नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. पावसाळ्यात तर रस्त्यावर चिखल झाल्याने मोठी कसरत करावी लागते, तर काही ठिकाणी नळ कनेक्शन नसल्याने पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. बहुतांश रहिवाशांनी नळपट्टी भरलेली असतानाही त्यांना पाणी मिळत नाही. नगरपालिकेने कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या सुरू केल्या आहेत; परंतु घंटागाड्या येत नसल्याने घराच्या बाजूलाच कचरा टाकावा लागत आहे. यामुळे दुर्गंधी पसरली असून, रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत अनेकवेळा पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले; पण याकडे लक्ष केले जात आहे.

रस्ता, पाण्याच्या समस्या कायम

नगर परिषद या भागातील रहिवाशांकडून कराची वसुली करते. मग आम्हाला सुविधा का पुरवत नाही, असा सवाल या भागातील रहिवाशांकडून केला जात आहे. मागील सहा वर्षांत येथे कुठलीच विकास कामे झाली नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात हा भाग चिखलमय होतो. या भागात साफसफाई होत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येते. नाल्या नसल्याने रहिवाशांना नाइलाजाने सांडपाणी रस्त्यावर सोडावे लागते. दुसरीकडे नळाला पाणी नसल्याने पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

आम्ही मागील काही दिवसांपासून इंदेवाडी परिसरात राहतो. आमच्या वसाहतीकडे येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने मोठी गैरसोय होत आहे. त्यातच घंटागाडी येत नाही. घंटागाडी येत नसल्याने घराच्या बाजूलाच कचरा टाकावा लागत आहे. आमच्या वसाहतीकडे घंटागाडी पाठवावी.

-मुक्ता माने, इंदेवाडी परिसर

मागील काही वर्षांपासून शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे; परंतु म्हणाव्या तशा सोयीसुविधा नगरपालिका प्रशासनाकडून पुरविल्या जात नाहीत. आमच्या वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत अनेकवेळा निवेदने दिली; परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

-सागर कोकाटे, शिवनगर

शहरातील नववसाहतींमध्ये मुख्य समस्या ही रस्त्याची आहे. बहुतांश कॉलन्यांमधील रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून चालणेही अवघड झाले आहे. तर साफसफाई न होणे, कचरा न उचलणे, कचऱ्यामुळे पसरलेली दुर्गंधी, पाणी न येणे, नाल्या नसल्याने पाणी रस्त्यावर येणे आदी समस्यांना येथील रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे.