शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

नववसाहतीत ना पाणी, ना धड रस्ते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST

जालना शहराची स्टील उद्योगामुळे देशभरात ओळख आहे. त्यातच वाढलेल्या शैक्षणिक संस्था, बाहेरगावहून कामासाठी येणे आदींमुळे शहरात येणाऱ्यांची संख्या ...

जालना शहराची स्टील उद्योगामुळे देशभरात ओळख आहे. त्यातच वाढलेल्या शैक्षणिक संस्था, बाहेरगावहून कामासाठी येणे आदींमुळे शहरात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे शहराचा विस्तारही झपाट्याने होत आहे. शहरात नववसाहती निर्माण झाल्या आहेत; परंतु सदरील वसाहतींमध्ये सोयीसुविधा मिळत नसल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. काही वसाहतींमध्ये रस्ते नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. पावसाळ्यात तर रस्त्यावर चिखल झाल्याने मोठी कसरत करावी लागते, तर काही ठिकाणी नळ कनेक्शन नसल्याने पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. बहुतांश रहिवाशांनी नळपट्टी भरलेली असतानाही त्यांना पाणी मिळत नाही. नगरपालिकेने कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या सुरू केल्या आहेत; परंतु घंटागाड्या येत नसल्याने घराच्या बाजूलाच कचरा टाकावा लागत आहे. यामुळे दुर्गंधी पसरली असून, रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत अनेकवेळा पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले; पण याकडे लक्ष केले जात आहे.

रस्ता, पाण्याच्या समस्या कायम

नगर परिषद या भागातील रहिवाशांकडून कराची वसुली करते. मग आम्हाला सुविधा का पुरवत नाही, असा सवाल या भागातील रहिवाशांकडून केला जात आहे. मागील सहा वर्षांत येथे कुठलीच विकास कामे झाली नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात हा भाग चिखलमय होतो. या भागात साफसफाई होत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येते. नाल्या नसल्याने रहिवाशांना नाइलाजाने सांडपाणी रस्त्यावर सोडावे लागते. दुसरीकडे नळाला पाणी नसल्याने पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

आम्ही मागील काही दिवसांपासून इंदेवाडी परिसरात राहतो. आमच्या वसाहतीकडे येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने मोठी गैरसोय होत आहे. त्यातच घंटागाडी येत नाही. घंटागाडी येत नसल्याने घराच्या बाजूलाच कचरा टाकावा लागत आहे. आमच्या वसाहतीकडे घंटागाडी पाठवावी.

-मुक्ता माने, इंदेवाडी परिसर

मागील काही वर्षांपासून शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे; परंतु म्हणाव्या तशा सोयीसुविधा नगरपालिका प्रशासनाकडून पुरविल्या जात नाहीत. आमच्या वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत अनेकवेळा निवेदने दिली; परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

-सागर कोकाटे, शिवनगर

शहरातील नववसाहतींमध्ये मुख्य समस्या ही रस्त्याची आहे. बहुतांश कॉलन्यांमधील रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून चालणेही अवघड झाले आहे. तर साफसफाई न होणे, कचरा न उचलणे, कचऱ्यामुळे पसरलेली दुर्गंधी, पाणी न येणे, नाल्या नसल्याने पाणी रस्त्यावर येणे आदी समस्यांना येथील रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे.