शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

'आमदारांच्या पगारात कपात नाही, शेतकऱ्यांच्या अनुदानात का?'; कृषिमंत्र्यांना शेतकऱ्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 13:29 IST

'हे सरकार अधिकाऱ्यांचं आहे का?'; कृषिमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

- पवन पवार

वडीगोद्री (जालना): कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी वडीगोद्री परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असता, शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे तीव्र संताप व्यक्त केला. “आमदार, खासदार आणि नोकरदारांच्या पगारात कपात होत नाही, मग शेतकऱ्यांच्या अनुदानातच कपात का होते? हे सरकार अधिकाऱ्यांचे आहे की शेतकऱ्यांचे?” असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी थेट मंत्र्यांना विचारला.

भिजलेला कापूस हातात घेऊन मांडली व्यथाबुधवारी सकाळी ११:३० वाजता मंत्री भरणे यांनी धाकलगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी एका शेतकऱ्याने भिजलेला कापूस हातात घेऊन अतिवृष्टीमुळे पिकांची झालेली दयनीय अवस्था दाखवली. शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, "मागील वर्षी फळबागांसाठी प्रति हेक्टरी ३६ हजार आणि कोरडवाहू पिकांसाठी १८ हजार रुपये मदत मिळत होती. मात्र, आता सरकार तटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसत आहे."

यावेळी शेतकऱ्यांनी ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा, बँकांनी होल्ड केलेली खाती मोकळी करावीत, तसेच 'लाडकी बहीण' योजनेचे पैसे कर्ज खात्यात वर्ग न करता थेट शेतकऱ्यांच्या हातात द्यावेत, अशा मागण्यांचे निवेदन कृषिमंत्र्यांना दिले.

'दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देणार'शेतकऱ्यांचा संताप पाहून कृषीमंत्री भरणे यांनी त्यांना आश्वासन दिले. ते म्हणाले, “जालना जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत. कधी गारपीट होते, कधी अतिवृष्टी होते, तर कधी दुष्काळ पडतो. सगळ्यांचे पंचनामे करून दिवाळीपूर्वी प्रत्येकाला नुकसानभरपाई मिळेल. कर्जमाफीच्या बाबतीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील.” यावेळी आमदार नारायण कुचे, माजी आमदार शिवाजी चोथे, माजी आमदार अरविंद चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रJalanaजालना