शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

जलयुक्तवर जोर.. बंधाऱ्यांना घोर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:57 IST

सरकार केवळ जलयुक्त शिवार योजनेला प्राधान्य देत असल्याने या बंधा-यांच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधारे दुरूस्तीसाठी विशेष निधीची गरज असून, बहुतांश बंधा-यांना दरवाजे नाहीत, तर काही बंधा-यांचा सांडवा तसेच भिंत मोडकळीस आल्याने त्यात पाणी साठविण्यासाठी आतापासून प्रशासनाने लक्ष दिल्यास येत्या पावसाळ्या पर्यंत हे बंधारे दुरूस्त होऊ शकतात. परंतु आता सरकार केवळ जलयुक्त शिवार योजनेला प्राधान्य देत असल्याने या बंधा-यांच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.जालना जिल्हा सिंचनाच्या अनुशेषाच्या बाबतीत मराठवाड्यातील इतर जिल्ह्याच्या मानाने खूप मागे आहे. त्यामुळे आता भविष्यात मोठमोठे प्रकल्प येऊ घातले असले तरी, आहेत, त्या बंधा-यांच्या दुरूस्तीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन विभागाकडे निधी मिळावा म्हणून विशेष प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.हा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षापासून सादर करण्यात आला असला तरी, यासाठी राजकीय पक्ष अथवा प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे हा प्रस्ताव पडून आहे. एकूण जवळपास ७० बंधा-यांना दुरूस्तीसाठी सहा ते सात कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.काही बंधा-यांना लोखंडी गेट बसविल्यास त्यातून भरपूर पाणीसाठा शिल्लक राहू शकतो. परंतु एकीकडे राज्य सरकार जलयुक्त शिवार योजना राबविण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याने या छोट्या बंधा-यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव आहे.एक्स्प्रेस बंधा-यांमुळे लाभतत्कालीन आघाडी सरकारने अर्थात माजी पालकमंत्री राजेश टोपे यांनी गोदावरी नदीवर जे चार मोठे एक्स्प्रेस बंधारे बांधले आहेत, त्याचा मोठा लाभ अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील सिंचनक्षेत्र वाढीसाठी होऊन उसाची लागवड त्यामुळे वाढल्याचे दिसून आले. असे असले तरी डावा कालावा आणि त्याच्या वितरिकांची दुरूस्ती ही अद्यापही कळीचा मुद्दा ठरत आहे.जालना जिल्ह्यात हातवनसह अन्य सहा मोठे सिंचन प्रकल्प येऊ घातले आहेत. त्यासाठी ७०० कोटी रूपयांचा निधी लागणार असल्याचे बोलले जात असून, त्यात जास्त करून निधी हा भूसंपादनासाठीच खर्च होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हा भूसंपादनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येऊन हे प्रकल्प लांबणीवर पडू शकतात. यासाठी आता राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी हातवन प्रकल्पासाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे घालणार असल्याचे जाहीर केले आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पwater shortageपाणीटंचाई