शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

नंदापूर ठरतेय विकासाचे रोल मॉडेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 1:00 AM

आदर्श ग्रामसंसद योजनेत जालना तालुक्यातील नंदापूर गाव राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दत्तक घेऊन गत अडीच वर्षांत जलयुक्त शिवार, आमदार निधी आणि जिल्हा परिषदेतील विविध योजनांच्या माध्यमातून मुलभूत सुविधांसह विकास कामे सुरु केली आहेत. २०१९ पर्यंत बहुतांश कामे पूर्ण केली जाणार असल्याचा दावा खोतकर यांनी केला.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आदर्श ग्रामसंसद योजनेत जालना तालुक्यातील नंदापूर गाव राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दत्तक घेऊन गत अडीच वर्षांत जलयुक्त शिवार, आमदार निधी आणि जिल्हा परिषदेतील विविध योजनांच्या माध्यमातून मुलभूत सुविधांसह विकास कामे सुरु केली आहेत. २०१९ पर्यंत बहुतांश कामे पूर्ण केली जाणार असल्याचा दावा खोतकर यांनी केला.जालना तालुक्यातील द्राक्ष पंढरी म्हणून उदयास येत असलेल्या कडवंची गावाजवळ नंदापूर हे गाव असून, या गावात पूर्वी मूलभूत सुविधा योग्य त्या प्रमाणात नव्हत्या. महामार्गाशी संलग्न असलेल्या या गावात आता द्राक्षाची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि ग्रामविकास हा केंद्रबिंदू ठेवून राज्यमंत्री खोतकर यांनी नंदापूर या गावाची आदर्श ग्रामसंसद योजनेसाठी निवड केली. गत अडीच वर्षांत जलयुक्त शिवार योजनेतून ३० लाख रुपये खर्चांचे सिमेंट बंधारे आणि २० लाख रुपये खर्चाचे नदी-नाला खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. तसेच दहा लाख रुपये खर्चाचे सामाजिक सभागृह, १० लाख रुपये खर्चाचे दलित वस्ती योजनेतून सिमेंट रस्ते बांधले आहेत.तर ग्रामपंचायत कार्यालयासाठी १२ रुपये खर्चाची इमारत, राष्ट्रीय पेयजल योजनेतून ५० लाख रुपये खर्चाचे काम आणि पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून ५ कोटी रुपये अंदाजपत्रक असलेल्या थार-नंदापूर-अंभोरेवाडी-कडवंची या मार्गाचे काम मंजूर झाले आहे. सदरील कामे आगामी दोन महिन्यांत सुरु होतील, अशी माहिती सरपंच दत्तात्रय भानुदास चव्हाण यांनी सांगितले.विधानसभा मतदार संघातील एक गाव आदर्श संसद योजनेसाठी निवडायचे होते. नजरेसमोर अनेक गावे होती. मात्र, नंदापूर हे गाव सर्वच बाबतीत विकासात तुलनेने मागे होते. या गावातील अनेक शेतकरी प्रगतीशील आहेत. या गावात इतर मूलभूत सुविधांसह आवश्यक ती कामे सुरू झालेली आहे. लवकरच ती पूर्ण होतील. तर विकासाच्या दृष्टीने रस्त्यांची सुविधा आवश्यक होती. यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून पाच कोटी रुपये खर्चाचा रस्ता मंजूर झाला आहे. याचे काम लवकरच सुरु केले जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतgovernment schemeसरकारी योजना