शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

जालन्यात शेतीच्या वादातून तरुणाचा खून; दोन संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 19:09 IST

तरुण रात्री शेतात राखण करण्यासाठी गेला होता

गोलापांगरी (जालना) : शेतीच्या वादातून एका २५ वर्षीय युवकाचा कुऱ्हाडीने वार करुन खून झाल्याची घटना जालना तालुक्यातील दुधना काळेगाव येथे गुरुवारी उघडकीस आली. अमोल नारायण म्हस्के (२५) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे.

जालना तालुक्यातील दुधना काळेगाव येथील शेतकरी अमोल म्हस्के यानी आपल्या शेतात कपाशीची लागवड केली आहे. परंतु, वन्यप्राणी रात्रीच्यावेळी या पिकाची नासदूस करतात. त्यामुळे अमोल बुधवारी रात्री ११ वाजता शेत राखण्यासाठी गेला होता. सकाळी साडेसहा वाजता शेजारचे कैलास म्हस्के हे शेतात गेले होते. अमोल आणखी का उठला नाही म्हणून त्यांनी त्याला आवाज दिला. परंतु, अमोलने आवाजाला प्रतिसाद न दिलेल्याने ते त्याला बघण्यासाठी गेले असता, अमोल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. 

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर यांनी घटनास्थळाची पाहाणी केली.  त्यानंतर घटनास्थळी स्वान पथकाने प्राचारण केले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरुन व गोठ्यातील काही वस्तू जप्त केल्या आहे. हा खून शेतीच्या वादातून झाला असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर यांनी सांगितले.

तीन महिन्यांपूर्वीच झाला होता विवाहअमोलला दोन भाऊ आहे. एक आपेगाव येथे महाराज आहे. दुसरा गावातच शेती करतो. अमोलचे २९ मार्च रोजी लग्न झाले होते. सामनगाव येथील त्याची पत्नी आहे. दरम्यान, अमोलचे दिवसांपूर्वीच पांडुरंगांच्या वारीला गेले होते.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीJalanaजालनाPoliceपोलिस