शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जालन्यात शेतीच्या वादातून तरुणाचा खून; दोन संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 19:09 IST

तरुण रात्री शेतात राखण करण्यासाठी गेला होता

गोलापांगरी (जालना) : शेतीच्या वादातून एका २५ वर्षीय युवकाचा कुऱ्हाडीने वार करुन खून झाल्याची घटना जालना तालुक्यातील दुधना काळेगाव येथे गुरुवारी उघडकीस आली. अमोल नारायण म्हस्के (२५) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे.

जालना तालुक्यातील दुधना काळेगाव येथील शेतकरी अमोल म्हस्के यानी आपल्या शेतात कपाशीची लागवड केली आहे. परंतु, वन्यप्राणी रात्रीच्यावेळी या पिकाची नासदूस करतात. त्यामुळे अमोल बुधवारी रात्री ११ वाजता शेत राखण्यासाठी गेला होता. सकाळी साडेसहा वाजता शेजारचे कैलास म्हस्के हे शेतात गेले होते. अमोल आणखी का उठला नाही म्हणून त्यांनी त्याला आवाज दिला. परंतु, अमोलने आवाजाला प्रतिसाद न दिलेल्याने ते त्याला बघण्यासाठी गेले असता, अमोल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. 

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर यांनी घटनास्थळाची पाहाणी केली.  त्यानंतर घटनास्थळी स्वान पथकाने प्राचारण केले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरुन व गोठ्यातील काही वस्तू जप्त केल्या आहे. हा खून शेतीच्या वादातून झाला असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर यांनी सांगितले.

तीन महिन्यांपूर्वीच झाला होता विवाहअमोलला दोन भाऊ आहे. एक आपेगाव येथे महाराज आहे. दुसरा गावातच शेती करतो. अमोलचे २९ मार्च रोजी लग्न झाले होते. सामनगाव येथील त्याची पत्नी आहे. दरम्यान, अमोलचे दिवसांपूर्वीच पांडुरंगांच्या वारीला गेले होते.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीJalanaजालनाPoliceपोलिस