शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

लाठीहल्ल्याची न्यायालयीन चौकशी करा, त्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 08:48 IST

घटनेनंतर शरद पवार यांनी अंबड उपजिल्हा रुग्णालयात जखमींची भेट घेतल्यानंतर अंतरवाली सराटी गावाला भेट दिली.

अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) : आंदोलनस्थळी सर्व काही सुरळीत होते. पोलिस आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत होते. तेव्हाच वरून (मंत्रालय) फोन आला. त्यानंतर पोलिसांनी अमानुषपणे लाठीहल्ला केल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. त्या वरून आलेल्या फोनसह या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. 

घटनेनंतर खा. पवार यांनी अंबड उपजिल्हा रुग्णालयात जखमींची भेट घेतल्यानंतर अंतरवाली सराटी गावाला भेट दिली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  ते म्हणाले की, आंदोलकर्त्यांनी कायदा हातात घेण्याची कोणतीही कृती केलेली नाही. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू असतानाच पोलिसांचा हल्ला अमानवी आहे. त्यात पोलिसांचा दोष नाही. त्यांना हल्ला करण्याचा आदेश कोणी दिला, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.  न्यायालयीन चाैकशीनंतर बऱ्याच गाेष्टी स्पष्ट हाेतील.

‘त्या’ घटनेनंतर मंत्र्यांनी राजीनामे दिले होते...एका प्रश्नाच्या उत्तरात पवार म्हणाले, नागपुरात २८ वर्षांपूर्वी घडलेल्या गोवारी हत्याकांडाचा काहींनी उल्लेख केला. त्यांच्या माहितीसाठी त्या घटनेनंतर  आदिवासीमंत्री मधुकरराव पिचड यांनी राजीनामा दिला. त्यानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही एका घटनेनंतर राजीनामा दिला होता. याची आठवण करून देत पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारJalanaजालनाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaratha Reservationमराठा आरक्षण