शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
4
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
5
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
6
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
7
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
8
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
9
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
10
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
11
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
12
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
13
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
14
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
15
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
16
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
17
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
18
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
19
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
20
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

आईची काळजी वाढली; काळजावर दगड ठेवून कोरोनाकाळातही मुलांना पाठविले शाळेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:19 IST

जिल्ह्यात मोजक्याच गावांमध्ये शाळा सुरू लोकमत न्यूज नेटवर्क जालना : गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा कशाबशा सुरू झाल्या ...

जिल्ह्यात मोजक्याच गावांमध्ये शाळा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा कशाबशा सुरू झाल्या आहेत. अद्याप संपूर्ण जिल्ह्यातील शाळा सुरू होणे बाकी आहे; परंतु ज्या गावामध्ये महिनाभरापासून एकही कोरोनाचा रुग्ण नाही, अशा गावांमध्ये या शाळा सुरू झाल्या आहेत.

शाळा सुरू झाल्या असल्या तरी पालकांकडून मुला-मुलींना शाळेत जाण्यासाठी पूर्वीइतका आग्रह धरला जात नाही. कोरोना अद्याप पूर्णत: नियंत्रणात आला नसल्याने पालक काळजावर दगड ठेवून मुलांना शाळेत पाठवीत आहेत; परंतु ज्या क्षमतेने शाळांची मैदाने आणि वर्ग फुलून जात होते ती संख्या गाठणे आता शक्य नाही. सम आणि विषम हजेरी क्रमांकानुसार विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्यास सांगितले जाते; परंतु ज्याठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत. तेथील विद्यार्थ्यांमध्ये मात्र चैतन्याचे वातावरण असून, दीड वर्षापासून हे विद्यार्थी एक प्रकारे बंदिस्तच झाले होते.

शाळेतून घरी येताच कपडे बदला, अंघोळही करा!

कोरोनामुळे आजही घरात प्रवेश करताना बहुतांश ठिकाणी बाहेर जाण्यासाठी वापरलेले कपडे हे घराबाहेरच ठेवण्याचा आग्रह केला जात आहे. त्यातच अनेक पालक हे विद्यार्थ्यांना अंघोळ करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत; परंतु या दोन्हींसाठी विद्यार्थ्यांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसून, शाळेतून घरी आल्यावर कधी एकदा तणावमुक्त होतो, याकडेच कल आहे.

अ) मास्क काढू नये.

ब) हात साबणाने वारंवार धुवावा किंवा सॅनिटायझर वापरावे.

क) सोशल डिस्टिन्सिंग पाळावे.

ड) घरी आल्यानंतर कपडे धुवायला टाकावेत आणि अंघोळ करावी.

काळजी आहेच; पण शिक्षणही महत्त्वाचे!

दीड वर्षापासून कोरोनामुळे मुले घरातच होती; परंतु आता काही गावांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. असे असले तरी भीती कायम असून, सर्व ती काळजी घेण्याच्या सूचना देऊनच शाळेत पाठविले जाते. -अरुणा थोरे

शैक्षणिक सत्र थोडेबहुत का होईना सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण होईल, यात शंका नाही. गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घेऊन शिक्षण द्यावे.

-शीला नरुटे

ऑनलाइनच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षापासून शिक्षण घेत होते; परंतु प्रत्यक्ष शाळेत जाऊन जे शिक्षण मिळते ते अधिक लवकर आत्मसात होते. ऑनलाइनमुळे विद्यार्थ्यांची चिडचिड वाढली होती. -ज्योती गुळवणे