शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

आईची काळजी वाढली; काळजावर दगड ठेवून कोरोनाकाळातही मुलांना पाठविले शाळेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:19 IST

जिल्ह्यात मोजक्याच गावांमध्ये शाळा सुरू लोकमत न्यूज नेटवर्क जालना : गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा कशाबशा सुरू झाल्या ...

जिल्ह्यात मोजक्याच गावांमध्ये शाळा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा कशाबशा सुरू झाल्या आहेत. अद्याप संपूर्ण जिल्ह्यातील शाळा सुरू होणे बाकी आहे; परंतु ज्या गावामध्ये महिनाभरापासून एकही कोरोनाचा रुग्ण नाही, अशा गावांमध्ये या शाळा सुरू झाल्या आहेत.

शाळा सुरू झाल्या असल्या तरी पालकांकडून मुला-मुलींना शाळेत जाण्यासाठी पूर्वीइतका आग्रह धरला जात नाही. कोरोना अद्याप पूर्णत: नियंत्रणात आला नसल्याने पालक काळजावर दगड ठेवून मुलांना शाळेत पाठवीत आहेत; परंतु ज्या क्षमतेने शाळांची मैदाने आणि वर्ग फुलून जात होते ती संख्या गाठणे आता शक्य नाही. सम आणि विषम हजेरी क्रमांकानुसार विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्यास सांगितले जाते; परंतु ज्याठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत. तेथील विद्यार्थ्यांमध्ये मात्र चैतन्याचे वातावरण असून, दीड वर्षापासून हे विद्यार्थी एक प्रकारे बंदिस्तच झाले होते.

शाळेतून घरी येताच कपडे बदला, अंघोळही करा!

कोरोनामुळे आजही घरात प्रवेश करताना बहुतांश ठिकाणी बाहेर जाण्यासाठी वापरलेले कपडे हे घराबाहेरच ठेवण्याचा आग्रह केला जात आहे. त्यातच अनेक पालक हे विद्यार्थ्यांना अंघोळ करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत; परंतु या दोन्हींसाठी विद्यार्थ्यांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसून, शाळेतून घरी आल्यावर कधी एकदा तणावमुक्त होतो, याकडेच कल आहे.

अ) मास्क काढू नये.

ब) हात साबणाने वारंवार धुवावा किंवा सॅनिटायझर वापरावे.

क) सोशल डिस्टिन्सिंग पाळावे.

ड) घरी आल्यानंतर कपडे धुवायला टाकावेत आणि अंघोळ करावी.

काळजी आहेच; पण शिक्षणही महत्त्वाचे!

दीड वर्षापासून कोरोनामुळे मुले घरातच होती; परंतु आता काही गावांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. असे असले तरी भीती कायम असून, सर्व ती काळजी घेण्याच्या सूचना देऊनच शाळेत पाठविले जाते. -अरुणा थोरे

शैक्षणिक सत्र थोडेबहुत का होईना सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण होईल, यात शंका नाही. गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घेऊन शिक्षण द्यावे.

-शीला नरुटे

ऑनलाइनच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षापासून शिक्षण घेत होते; परंतु प्रत्यक्ष शाळेत जाऊन जे शिक्षण मिळते ते अधिक लवकर आत्मसात होते. ऑनलाइनमुळे विद्यार्थ्यांची चिडचिड वाढली होती. -ज्योती गुळवणे