शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

हाताला काम नसल्याने १५० कुटुंबांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:45 IST

घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव परिसरात दुष्काळी परिस्थिमुळे मजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे परिसरामधील १५० कुटुंबे कामासाठी स्थलांतरित झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कराणीउंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव परिसरात दुष्काळी परिस्थिमुळे मजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे परिसरामधील १५० कुटुंबे कामासाठी स्थलांतरित झाली आहेत. परिसरात रोजगार हमीची कामे उपलब्ध करून स्थलांतर थांबवावे, यावी अशी मागणी मजुरांमधून होत आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे शेतात कामे राहिलेली नाही. जिरायत शेतीमधील पिकांची मागील महिन्यातच धूळधाण झाली. बागायती शेती विहिरीची पाणी पातळी एकदम कमी झाल्याने संकटामध्ये सापडली आहे. अशा परिस्थितीत मजुरांच्या हाताला शेतीशी निगडित असलेली कामे बंद पडली. काम उपलब्ध होत नसल्याने परिसरामधील जवळपास १५० कुटुंबे ऊस तोडणीसाठी तसेच शहराच्या ठिकाणी कामाच्या शोधात स्थलांतरित झाली असल्याचे समजले. परिसरात रोहयोची कामे सुरू नसल्याने रोजगारासाठी मजुरांवर स्थलांतराची वेळ आली आहे.महात्मा गांधी महाराष्ट्र रोजगार हमीची कामे मिळावी म्हणून गांवातील ३२० मजुरांनी कामाची मागणी केली आहे. परंतु निधीअभावी कामे करता येत नसल्याचे राणी उंचेगावचे सरपंच विठ्ठलराव खैरे यांनी सांगितले. या प्रकाराकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे लक्ष घालण्याची मागणीही केली आहे.राणी उंचेगाव कृषी मंडळामध्ये रोजगार हमीची कामे प्रलंबित आहेत. या प्रलंबित कामांच्या मागणीसाठी मजुरांना तालुका कृषी कार्यलयात, कृषीसहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकाºयांच्या संमतीसाठी चकरा माराव्या लागत आहेत. परंतु ही मंडळी अप-डाउन मध्ये व्यस्त असल्याने मजुरांची भेट होऊ शकत नाही. त्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये प्रशासन मजुरांच्या कामाबद्दल उदासीन धोरण राबवत असल्याने मजुरांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :Migrationस्थलांतरणgovernment schemeसरकारी योजना