शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

हाताला काम नसल्याने १५० कुटुंबांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:45 IST

घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव परिसरात दुष्काळी परिस्थिमुळे मजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे परिसरामधील १५० कुटुंबे कामासाठी स्थलांतरित झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कराणीउंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव परिसरात दुष्काळी परिस्थिमुळे मजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे परिसरामधील १५० कुटुंबे कामासाठी स्थलांतरित झाली आहेत. परिसरात रोजगार हमीची कामे उपलब्ध करून स्थलांतर थांबवावे, यावी अशी मागणी मजुरांमधून होत आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे शेतात कामे राहिलेली नाही. जिरायत शेतीमधील पिकांची मागील महिन्यातच धूळधाण झाली. बागायती शेती विहिरीची पाणी पातळी एकदम कमी झाल्याने संकटामध्ये सापडली आहे. अशा परिस्थितीत मजुरांच्या हाताला शेतीशी निगडित असलेली कामे बंद पडली. काम उपलब्ध होत नसल्याने परिसरामधील जवळपास १५० कुटुंबे ऊस तोडणीसाठी तसेच शहराच्या ठिकाणी कामाच्या शोधात स्थलांतरित झाली असल्याचे समजले. परिसरात रोहयोची कामे सुरू नसल्याने रोजगारासाठी मजुरांवर स्थलांतराची वेळ आली आहे.महात्मा गांधी महाराष्ट्र रोजगार हमीची कामे मिळावी म्हणून गांवातील ३२० मजुरांनी कामाची मागणी केली आहे. परंतु निधीअभावी कामे करता येत नसल्याचे राणी उंचेगावचे सरपंच विठ्ठलराव खैरे यांनी सांगितले. या प्रकाराकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे लक्ष घालण्याची मागणीही केली आहे.राणी उंचेगाव कृषी मंडळामध्ये रोजगार हमीची कामे प्रलंबित आहेत. या प्रलंबित कामांच्या मागणीसाठी मजुरांना तालुका कृषी कार्यलयात, कृषीसहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकाºयांच्या संमतीसाठी चकरा माराव्या लागत आहेत. परंतु ही मंडळी अप-डाउन मध्ये व्यस्त असल्याने मजुरांची भेट होऊ शकत नाही. त्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये प्रशासन मजुरांच्या कामाबद्दल उदासीन धोरण राबवत असल्याने मजुरांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :Migrationस्थलांतरणgovernment schemeसरकारी योजना