शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
3
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
4
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
5
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
6
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
7
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
8
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
9
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
10
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
11
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
12
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
13
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
14
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
15
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
16
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
17
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
18
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
19
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
20
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 

दमदार योद्धा! मराठा आरक्षण लढ्यासाठी जमीन विकणारे मनोज जरांगे

By विजय मुंडे  | Updated: September 4, 2023 20:35 IST

मनाेज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी शहागड येथे जोरदार मोर्चा काढला आणि अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केले

अंतरवाली सराटी (जि.जालना) : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाची आज राज्यातील सत्ताधारी, विरोधकांनीच नव्हे तर देशभरातील नेत्यांनी दखल घेतली आहे. हिंदी, मराठी, इंग्रजी माध्यमांचे प्रतिनिधी या गावात ठाण मांडून असून, सर्वत्र एकच विषय मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले बेमुदत उपोषण आणि पोलिसांचा लाठीचार्ज. एकीकडे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना दुसरीकडे मनोज जरांगे यांच्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

१२ वीपर्यंत शिक्षण झालेल्या मनोज जरांगे यांचे मूळ गाव मातोरी (ता.गेवराई) आहे. आई-वडिल गावाकडे राहत असून, सध्या ते पत्नी, एक मुलगा, तीन मुलींसमवेत समवेत अंकुशनगर येथे राहतात. घरची परिस्थिती बेताची असली तरी समाजासाठी अहोरात्र काम करण्याची तळमळ त्यांची आहे. गत काही वर्षांपासून ते मराठा आरक्षणासाठी धडाडीने प्रयत्न करीत आहेत. आरक्षणासाठी त्यांनी दोन एकर जमीन विक्री केली. मराठा आरक्षणासाठी शिवबा संघटनेच्या मार्फत त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्त कार्यालयावर काढलेल्या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर राज्यभरात होणाऱ्या मराठा आरक्षणासाठीचे मोर्चे असोत किंवा कोपर्डी प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी होणारे आंदोलन असो यावेळीही त्यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. साष्ठपिंपळगाव येथे केलेल्या आंदोलनानंतरही अनेक मागण्या त्यांनी मान्य करून घेतल्या.

मराठा आरक्षणासाठी शहीद झालेल्यांच्या कुटुंबांना मदत मिळावी, यासाठीही त्यांनी यशस्वी लढा दिला आहे. आरक्षणासाठी शहागड ते मुंबई काढलेली दिंडी असो किंवा साष्टपिंपळगाव येथे केलेले आंदोलन असो या आंदोलनांनी राज्याचे लक्ष वेधले होते. गत २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनाची दखल राज्याने नव्हे देशाने घेतली आहे. विशेषत: लाठीहल्ल्यानंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. गल्लीपासून- मुंबईपर्यंतचे सत्ताधारी, विरोधी बाकावरील नेतेमंडळी अंतरवाली सराटीत धाव घेत आहेत. आंदोलनाची वाढती तीव्रता पाहता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत उपसमितीची बैठक घेऊन काही निर्णय घेतले आहेत. शिवाय शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

मेलो तरी माघार नाहीमनाेज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी शहागड येथे जोरदार मोर्चा काढला आणि अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले. उपोषणाच्या सातव्या दिवशीही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. चर्चेशिवाय मार्ग निघत नाहीत हे खरं आहे. परंतु, चर्चेच्या गुऱ्हाळात पहिले पाढे पंचावन्न नको. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मेलो तरी माघार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आरक्षणाचा जीआर काढा लगेच उपोषण मागे घेतले जाईल, अशी मागणीही त्यांनी शासनाकडे केली आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना