शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

दमदार योद्धा! मराठा आरक्षण लढ्यासाठी जमीन विकणारे मनोज जरांगे

By विजय मुंडे  | Updated: September 4, 2023 20:35 IST

मनाेज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी शहागड येथे जोरदार मोर्चा काढला आणि अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केले

अंतरवाली सराटी (जि.जालना) : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाची आज राज्यातील सत्ताधारी, विरोधकांनीच नव्हे तर देशभरातील नेत्यांनी दखल घेतली आहे. हिंदी, मराठी, इंग्रजी माध्यमांचे प्रतिनिधी या गावात ठाण मांडून असून, सर्वत्र एकच विषय मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले बेमुदत उपोषण आणि पोलिसांचा लाठीचार्ज. एकीकडे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना दुसरीकडे मनोज जरांगे यांच्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

१२ वीपर्यंत शिक्षण झालेल्या मनोज जरांगे यांचे मूळ गाव मातोरी (ता.गेवराई) आहे. आई-वडिल गावाकडे राहत असून, सध्या ते पत्नी, एक मुलगा, तीन मुलींसमवेत समवेत अंकुशनगर येथे राहतात. घरची परिस्थिती बेताची असली तरी समाजासाठी अहोरात्र काम करण्याची तळमळ त्यांची आहे. गत काही वर्षांपासून ते मराठा आरक्षणासाठी धडाडीने प्रयत्न करीत आहेत. आरक्षणासाठी त्यांनी दोन एकर जमीन विक्री केली. मराठा आरक्षणासाठी शिवबा संघटनेच्या मार्फत त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्त कार्यालयावर काढलेल्या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर राज्यभरात होणाऱ्या मराठा आरक्षणासाठीचे मोर्चे असोत किंवा कोपर्डी प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी होणारे आंदोलन असो यावेळीही त्यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. साष्ठपिंपळगाव येथे केलेल्या आंदोलनानंतरही अनेक मागण्या त्यांनी मान्य करून घेतल्या.

मराठा आरक्षणासाठी शहीद झालेल्यांच्या कुटुंबांना मदत मिळावी, यासाठीही त्यांनी यशस्वी लढा दिला आहे. आरक्षणासाठी शहागड ते मुंबई काढलेली दिंडी असो किंवा साष्टपिंपळगाव येथे केलेले आंदोलन असो या आंदोलनांनी राज्याचे लक्ष वेधले होते. गत २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनाची दखल राज्याने नव्हे देशाने घेतली आहे. विशेषत: लाठीहल्ल्यानंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. गल्लीपासून- मुंबईपर्यंतचे सत्ताधारी, विरोधी बाकावरील नेतेमंडळी अंतरवाली सराटीत धाव घेत आहेत. आंदोलनाची वाढती तीव्रता पाहता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत उपसमितीची बैठक घेऊन काही निर्णय घेतले आहेत. शिवाय शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

मेलो तरी माघार नाहीमनाेज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी शहागड येथे जोरदार मोर्चा काढला आणि अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले. उपोषणाच्या सातव्या दिवशीही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. चर्चेशिवाय मार्ग निघत नाहीत हे खरं आहे. परंतु, चर्चेच्या गुऱ्हाळात पहिले पाढे पंचावन्न नको. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मेलो तरी माघार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आरक्षणाचा जीआर काढा लगेच उपोषण मागे घेतले जाईल, अशी मागणीही त्यांनी शासनाकडे केली आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना