शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

दमदार योद्धा! मराठा आरक्षण लढ्यासाठी जमीन विकणारे मनोज जरांगे

By विजय मुंडे  | Updated: September 4, 2023 20:35 IST

मनाेज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी शहागड येथे जोरदार मोर्चा काढला आणि अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केले

अंतरवाली सराटी (जि.जालना) : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाची आज राज्यातील सत्ताधारी, विरोधकांनीच नव्हे तर देशभरातील नेत्यांनी दखल घेतली आहे. हिंदी, मराठी, इंग्रजी माध्यमांचे प्रतिनिधी या गावात ठाण मांडून असून, सर्वत्र एकच विषय मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले बेमुदत उपोषण आणि पोलिसांचा लाठीचार्ज. एकीकडे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना दुसरीकडे मनोज जरांगे यांच्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

१२ वीपर्यंत शिक्षण झालेल्या मनोज जरांगे यांचे मूळ गाव मातोरी (ता.गेवराई) आहे. आई-वडिल गावाकडे राहत असून, सध्या ते पत्नी, एक मुलगा, तीन मुलींसमवेत समवेत अंकुशनगर येथे राहतात. घरची परिस्थिती बेताची असली तरी समाजासाठी अहोरात्र काम करण्याची तळमळ त्यांची आहे. गत काही वर्षांपासून ते मराठा आरक्षणासाठी धडाडीने प्रयत्न करीत आहेत. आरक्षणासाठी त्यांनी दोन एकर जमीन विक्री केली. मराठा आरक्षणासाठी शिवबा संघटनेच्या मार्फत त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्त कार्यालयावर काढलेल्या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर राज्यभरात होणाऱ्या मराठा आरक्षणासाठीचे मोर्चे असोत किंवा कोपर्डी प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी होणारे आंदोलन असो यावेळीही त्यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. साष्ठपिंपळगाव येथे केलेल्या आंदोलनानंतरही अनेक मागण्या त्यांनी मान्य करून घेतल्या.

मराठा आरक्षणासाठी शहीद झालेल्यांच्या कुटुंबांना मदत मिळावी, यासाठीही त्यांनी यशस्वी लढा दिला आहे. आरक्षणासाठी शहागड ते मुंबई काढलेली दिंडी असो किंवा साष्टपिंपळगाव येथे केलेले आंदोलन असो या आंदोलनांनी राज्याचे लक्ष वेधले होते. गत २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनाची दखल राज्याने नव्हे देशाने घेतली आहे. विशेषत: लाठीहल्ल्यानंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. गल्लीपासून- मुंबईपर्यंतचे सत्ताधारी, विरोधी बाकावरील नेतेमंडळी अंतरवाली सराटीत धाव घेत आहेत. आंदोलनाची वाढती तीव्रता पाहता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत उपसमितीची बैठक घेऊन काही निर्णय घेतले आहेत. शिवाय शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

मेलो तरी माघार नाहीमनाेज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी शहागड येथे जोरदार मोर्चा काढला आणि अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले. उपोषणाच्या सातव्या दिवशीही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. चर्चेशिवाय मार्ग निघत नाहीत हे खरं आहे. परंतु, चर्चेच्या गुऱ्हाळात पहिले पाढे पंचावन्न नको. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मेलो तरी माघार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आरक्षणाचा जीआर काढा लगेच उपोषण मागे घेतले जाईल, अशी मागणीही त्यांनी शासनाकडे केली आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना