शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

तूर नोंदणीची १५ मार्च डेडलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 00:25 IST

नाफेडकडून जालन्यात सहा हमीभाव केंदे्र सुरू केली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : यंदा तुरीचे उत्पादन बऱ्यापैकी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून ती हमी भावाने खरेदी करून त्यांना आर्थिक मदत करण्याच्या हेतूने नाफेडकडून जालन्यात सहा हमीभाव केंदे्र सुरू केली आहेत. आतापर्यंत जवळपास ९०० पेक्षा अधिक शेतक-यांनी सात हजार ९८३ क्विंटल खरेदी झाली असल्याची माहिती नाफेडच्या पणन अधिकारी विमल वाघमारे यांनी दिली.गेल्यावर्षी अवकाळी पावसामुळे अनेक पिकांना मोठा फटका बसला, परंतु तुरीला याचा ख-या अर्थाने लाभ झाला असेच कृषी विभाकगडून सांगण्यात आले. काही अंशी काळी पडल्याचे प्रकार पुढे आले आहेत, परंतु ते किरकोळ स्वरूपाचे असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात जवहपास एक लाख हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली होती. त्यामुळे यंदा चांगले उत्पादन होईल असे भाकीत होते. ते जवळपास खरे ठरले आहे. त्यातच आता सरकारने हमीभावही चांगला वाढवून दिला आहे. पाच हजार ८०० रूपये प्रतिक्ंिटल तूर खरेदी करण्याचे निर्देश आहेत.यामुळे जिल्ह्यातील सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आली असून, जालन्यासह मंठा, परतूर, अंबड, तीर्थपुरी भोकरदनचा समावेश आहे. दरम्यान जास्तीत जास्त शेतक-यांनी या चांगल्या हमीभावाचा लाभ घ्यावा यासाठी शेतक-यांना त्यांच्या मोबाईलवर मेसेजस पाठविण्यात आले आहे. जवळपास दोन हजारपेक्षा अधिक शेतक-यांना हे मेसेज पाठविले असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.एकूणच हमीभाव जरी यंदा चांगले असले तरी, अनेक शेतक-यांनी आपल्या तूर या खाजगी व्यापा-यांनाच देणे पसंत केल्याचे दिसून येते. याचे कारण शेतक-यांना विचारले असता, व्यापा-यांकडे आम्हाला लगेचच थोडा कमी दर का असेना, तो रोखीने मिळतो. तसेच अनेकवेळा आम्ही काही कामानिमित्त अडत व्यापा-यांकडून उचलही घेतली जाते. त्यामुळे नाफेडकडे तूर आणून घालण्यास शेतकरी प्राधान्य देत नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी