शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

तूर नोंदणीची १५ मार्च डेडलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 00:25 IST

नाफेडकडून जालन्यात सहा हमीभाव केंदे्र सुरू केली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : यंदा तुरीचे उत्पादन बऱ्यापैकी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून ती हमी भावाने खरेदी करून त्यांना आर्थिक मदत करण्याच्या हेतूने नाफेडकडून जालन्यात सहा हमीभाव केंदे्र सुरू केली आहेत. आतापर्यंत जवळपास ९०० पेक्षा अधिक शेतक-यांनी सात हजार ९८३ क्विंटल खरेदी झाली असल्याची माहिती नाफेडच्या पणन अधिकारी विमल वाघमारे यांनी दिली.गेल्यावर्षी अवकाळी पावसामुळे अनेक पिकांना मोठा फटका बसला, परंतु तुरीला याचा ख-या अर्थाने लाभ झाला असेच कृषी विभाकगडून सांगण्यात आले. काही अंशी काळी पडल्याचे प्रकार पुढे आले आहेत, परंतु ते किरकोळ स्वरूपाचे असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात जवहपास एक लाख हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली होती. त्यामुळे यंदा चांगले उत्पादन होईल असे भाकीत होते. ते जवळपास खरे ठरले आहे. त्यातच आता सरकारने हमीभावही चांगला वाढवून दिला आहे. पाच हजार ८०० रूपये प्रतिक्ंिटल तूर खरेदी करण्याचे निर्देश आहेत.यामुळे जिल्ह्यातील सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आली असून, जालन्यासह मंठा, परतूर, अंबड, तीर्थपुरी भोकरदनचा समावेश आहे. दरम्यान जास्तीत जास्त शेतक-यांनी या चांगल्या हमीभावाचा लाभ घ्यावा यासाठी शेतक-यांना त्यांच्या मोबाईलवर मेसेजस पाठविण्यात आले आहे. जवळपास दोन हजारपेक्षा अधिक शेतक-यांना हे मेसेज पाठविले असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.एकूणच हमीभाव जरी यंदा चांगले असले तरी, अनेक शेतक-यांनी आपल्या तूर या खाजगी व्यापा-यांनाच देणे पसंत केल्याचे दिसून येते. याचे कारण शेतक-यांना विचारले असता, व्यापा-यांकडे आम्हाला लगेचच थोडा कमी दर का असेना, तो रोखीने मिळतो. तसेच अनेकवेळा आम्ही काही कामानिमित्त अडत व्यापा-यांकडून उचलही घेतली जाते. त्यामुळे नाफेडकडे तूर आणून घालण्यास शेतकरी प्राधान्य देत नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी