शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मराठा आरक्षण हेच आता माझ्यावरील उपचार: मनोज जरांगे पाटील, वैद्यकीय पथकाला परत पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 05:32 IST

आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शासन, प्रशासन पातळीवरून कोणी संवाद साधला नसल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क, अंतरवाली सराटी (जि. जालना) : अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला. मराठा आरक्षण हेच माझ्यावरील उपचार आहेत, असे सांगत वैद्यकीय पथकाला परत पाठविले. आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शासन, प्रशासन पातळीवरून कोणी संवाद साधला नसल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी शासनाला दिलेला ४० दिवसांचा कालावधी संपला. यामुळे जरांगे पाटील यांनी बुधवारी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. राज्यात ठिकठिकाणीही साखळी उपोषण केले जात आहे.

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी जिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध भागांतील युवक अंतरवाली सराटी गावात येऊन जरांगे पाटील यांची भेट घेत होते. जरांगे यांची तपासणी करण्यासाठी वडीगोद्री येथील डाॅ. शीतल कुटे व आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम आली होती. परंतु, जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला.

तोडफोडीचे समर्थन नाही 

आमचे आंदोलन शांततेत सुरू आहे. आपण तोडफोडीचे समर्थन करीत नाही. गुणरत्न सदावर्ते यांच्या टीकेला आपण उत्तर देणार नाही, असे सांगत मराठा आरक्षणासाठी आपण  उपचारही घेणार नसल्याचा पुनरुच्चार जरांगे पाटील यांनी केला.

आरक्षणाच्या मागणीसाठी  तिघांनी संपविले जीवन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता समाजातील तरुण टोकाचे पाऊल उचलू लागले आहेत. गुरुवारी मराठवाड्यात तिघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली टेंभी (ता. घनसावंगी) येथील शिवाजी अण्णाकिसन माने (४५) यांनी गुरुवारी सकाळी घरामध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. अंतरवाली टेंभी येथील साखळी उपोषणात ते सहभागी झाले होते. नंतर ते घरी गेले आणि दरवाजाच्या कोंड्याला रुमाल बांधून गळफास घेतला.   

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आपतगाव येथे गणेश काकासाहेब कुबेर (२८) या तरुणाने गुरुवारी दुपारी गळफास घेत मृत्युला कवटाळले. आत्महत्येपूर्वी त्यांनी शालेय पाटीवर ‘मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत माझा मृतदेह जाळू नका’, असा मजकूर त्याने लिहून ठेवला होता.  हिंगोली जिल्ह्यात देवजना येथील कृष्णा ऊर्फ लहू यशवंतराव कल्याणकर (२५) या तरुणाने बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेतला. ‘मी मराठा आरक्षणामुळे जीव देत आहे’ अशा आशयाची चिठ्ठी त्याच्या खिशात आढळली.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील