शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

अंतरवालीतील मंडप हटवल्याचं वृत्त येताच जरांगे रुग्णालयातून निघाले; पोलिसांनी आश्वासन देऊन रोखलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 16:51 IST

अंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळावरील मंडप पोलिसांनी हटवण्यास सुरुवात केली असल्याचे वृत्त समोर आले होते.

Manoj Jarange Antarwali Sarati ( Marathi News ) :मराठा आरक्षण आंदोलन दिवसागणिक वेगवेगळं वळण घेताना पाहायला मिळत आहे. या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत आक्षेपार्ह भाषेचाही वापर केला. त्यानंतर सरकारने कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली असून आज सकाळीच जरांगे पाटील यांची एसआयटीच्या मार्फत चौकशी करण्यात यावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिल्या होत्या. त्यानंतर आता पोलिसांकडून अंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळावरील मंडप हटवण्यास सुरुवात करण्यात आल्याचे वृत्त समोर आले. याबाबतची माहिती मिळताच रुग्णालयात असणारे मनोज जरांगे हे उपचार सोडून तातडीने अंतरवालीकडे निघाले होते. मात्र पोलिसांनी मंडप हटवण्यात येणार नसल्याचं आश्वासन दिल्यानंतर जरांगे हे पुन्हा रुग्णालयातच थांबले आहेत.

मंडप हटवण्याच्या हालचालींबाबत मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आक्रमक इशारा दिला आहे. "मंडप हटवत असल्याची बातमी आल्यानंतर सगळीकडेच खळबळ झाली होती. कारण गृहमंत्री वागतातच तसे. मात्र आता डीवायएसपी साहेबांनी आम्हाला मंडप हटवणार नसल्याचं आश्वासन दिलं आहे. त्यांच्या शब्दाला मान देऊन मी इथं थांबत आहे. नाही तर मी थेट अंतरवालीला निघालो होतो. दिलेला शब्द पाळा. मंडपाला, छत्रपतींच्या मूर्तीला हात लावला तर गृहमंत्र्यांना सुट्टी नाही," असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

दरम्यान, "मला बळजबरीने अटक करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील करोडो मराठे उपोषण करतील. सरकारने मराठ्यांचा रोष ओढावून घेऊ नये. अजूनही वेळ गेली नाही. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा," अशी मागणीही जरांगेंनी केली आहे.

का होणार जरांगेंची एसआयटी चौकशी?

मनोज जरांगे यांनी सभागृहातील सदस्यांबाबत केलेल्या व्यक्तिगत वक्तव्यांच्या अनुषंगाने विधानसभा सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावनांची सभागृहाने नोंद घेत मनोज जरांगे यांच्या भूमिकेची ‘एसआयटी’ मार्फत सखोल चौकशी करावी, असे निर्देश आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शासनाला दिले. संसदीय लोकशाहीला जपणे ही सभागृहाची जबाबदारी आहे. हिंसक वक्तव्यांचे समर्थन कुणीही करीत नाही. यामुळे चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी याबाबत सखोल चौकशी करावी, असं नार्वेकर यांनी सांगितलं.

दरम्यान, "मराठा समाजाने यापूर्वी काढलेले मोर्चे शांततेने झाले, तथापि यावेळी तसे घडले नाही. कोणी वैयक्तिक टीका करणार असेल तर सभागृहाने भूमिका घेतली पाहिजे. केवळ जरांगे यांची भूमिका नाही तर त्यांचा बोलविता धनी शोधणे महत्त्वाचे असल्याचे सांगून सर्व चौकशी करून सत्य बाहेर काढलं जाईल,' असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस