शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषणास्त्र; सरकारला दिलेली मुदत संपली, अंतरवाली सराटीत आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 06:07 IST

गिरीश महाजन यांनी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क, अंतरवाली सराटी (जि. जालना) :  दिलेल्या मुदतीत मराठा आरक्षण न दिल्याने अंतरवाली सराटी येथील आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी आमरण उपोषण सुरू होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्याशी मोबाइलद्वारे संवाद साधला. मराठा आरक्षणासह इतर मागण्यांवर शासन सकारात्मक असून, टोकाची भूमिका घेऊ नये, अशी विनंती महाजन यांनी केली.

महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण देण्याच्या मागणीसाठी २८ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. शासनाला ४० दिवसांची मुदत दिल्याने साखळी उपोषण केले जात हाेते. परंतु, मागण्या मान्य न झाल्याने ४१ व्या दिवशी बुधवारी सकाळी ११ वाजता मनोज जरांगे पाटील यांनी साखळी उपोषणाचे रुपांतर पुन्हा आमरण उपोषणात केले आहे.

मनोज शब्दाचा पक्का : संभाजीराजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती यांनी बुधवारी दुपारी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज हा शब्दाचा पक्का आहे. त्याला बळ देण्यासाठी मी इथं आलो. तुम्ही आमरण उपोषण करा; परंतु, पाणी प्या, तब्येतीची काळजी घ्या, अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर जरांगे यांनी पाणी पिले.

आरक्षण शंभर टक्के द्यायचं आहे

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी शासन सकारात्मक आहे. शंभर टक्के आरक्षण मिळणार आहे. परंतु, तुम्ही टोकाची भूमिका घेत उपोषण करू नका. दोन दिवसात इतर प्रश्न मार्गी लागतील. भावनेच्या भरात नाही तर त्या आरक्षणाला कोणी चॅलेंज करणार नाही, असे आरक्षण द्यायचे आहे, असे सांगत मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाऐवजी साखळी उपोषण करावे, अशी विनंती केली.जरांगे म्हणाले...    

नेत्यांनी सांगितल्यानुसार आम्ही ४० दिवसांचा वेळ शासनाला दिला. परंतु ४१ दिवसांनंतरही आरक्षण जाहीर झालेले नाही. दोन दिवसांत गुन्हे मागे घेणे असो किंवा सभेवेळी झालेले शेतकऱ्यांचे नुकसान, त्यावरही शासनाने निर्णय घेतलेला नाही. आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या १६ ते १७ युवकांच्या कुटुंबीयांना अद्याप शासकीय मदत मिळालेली नाही.

शासन समाजाची दिशाभूल करीत असून, आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही. उपोषणात अन्न-पाण्याचा त्याग करणार असून, उपचारही घेणार नाही. युवकांच्या आत्महत्यांना दिशाभूल करणारे सरकार जबाबदार आहे. - मनोज जरांगे-पाटील, नेते, मराठा आरक्षण आंदोलन.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील