शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
4
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
5
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
6
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
7
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
8
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
9
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
10
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
11
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
12
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
13
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
14
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
15
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
16
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा
17
ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार
18
Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!
19
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
20
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?

मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषणास्त्र; सरकारला दिलेली मुदत संपली, अंतरवाली सराटीत आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 06:07 IST

गिरीश महाजन यांनी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क, अंतरवाली सराटी (जि. जालना) :  दिलेल्या मुदतीत मराठा आरक्षण न दिल्याने अंतरवाली सराटी येथील आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी आमरण उपोषण सुरू होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्याशी मोबाइलद्वारे संवाद साधला. मराठा आरक्षणासह इतर मागण्यांवर शासन सकारात्मक असून, टोकाची भूमिका घेऊ नये, अशी विनंती महाजन यांनी केली.

महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण देण्याच्या मागणीसाठी २८ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. शासनाला ४० दिवसांची मुदत दिल्याने साखळी उपोषण केले जात हाेते. परंतु, मागण्या मान्य न झाल्याने ४१ व्या दिवशी बुधवारी सकाळी ११ वाजता मनोज जरांगे पाटील यांनी साखळी उपोषणाचे रुपांतर पुन्हा आमरण उपोषणात केले आहे.

मनोज शब्दाचा पक्का : संभाजीराजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती यांनी बुधवारी दुपारी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज हा शब्दाचा पक्का आहे. त्याला बळ देण्यासाठी मी इथं आलो. तुम्ही आमरण उपोषण करा; परंतु, पाणी प्या, तब्येतीची काळजी घ्या, अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर जरांगे यांनी पाणी पिले.

आरक्षण शंभर टक्के द्यायचं आहे

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी शासन सकारात्मक आहे. शंभर टक्के आरक्षण मिळणार आहे. परंतु, तुम्ही टोकाची भूमिका घेत उपोषण करू नका. दोन दिवसात इतर प्रश्न मार्गी लागतील. भावनेच्या भरात नाही तर त्या आरक्षणाला कोणी चॅलेंज करणार नाही, असे आरक्षण द्यायचे आहे, असे सांगत मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाऐवजी साखळी उपोषण करावे, अशी विनंती केली.जरांगे म्हणाले...    

नेत्यांनी सांगितल्यानुसार आम्ही ४० दिवसांचा वेळ शासनाला दिला. परंतु ४१ दिवसांनंतरही आरक्षण जाहीर झालेले नाही. दोन दिवसांत गुन्हे मागे घेणे असो किंवा सभेवेळी झालेले शेतकऱ्यांचे नुकसान, त्यावरही शासनाने निर्णय घेतलेला नाही. आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या १६ ते १७ युवकांच्या कुटुंबीयांना अद्याप शासकीय मदत मिळालेली नाही.

शासन समाजाची दिशाभूल करीत असून, आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही. उपोषणात अन्न-पाण्याचा त्याग करणार असून, उपचारही घेणार नाही. युवकांच्या आत्महत्यांना दिशाभूल करणारे सरकार जबाबदार आहे. - मनोज जरांगे-पाटील, नेते, मराठा आरक्षण आंदोलन.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील