शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषणास्त्र; सरकारला दिलेली मुदत संपली, अंतरवाली सराटीत आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 06:07 IST

गिरीश महाजन यांनी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क, अंतरवाली सराटी (जि. जालना) :  दिलेल्या मुदतीत मराठा आरक्षण न दिल्याने अंतरवाली सराटी येथील आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी आमरण उपोषण सुरू होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्याशी मोबाइलद्वारे संवाद साधला. मराठा आरक्षणासह इतर मागण्यांवर शासन सकारात्मक असून, टोकाची भूमिका घेऊ नये, अशी विनंती महाजन यांनी केली.

महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण देण्याच्या मागणीसाठी २८ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. शासनाला ४० दिवसांची मुदत दिल्याने साखळी उपोषण केले जात हाेते. परंतु, मागण्या मान्य न झाल्याने ४१ व्या दिवशी बुधवारी सकाळी ११ वाजता मनोज जरांगे पाटील यांनी साखळी उपोषणाचे रुपांतर पुन्हा आमरण उपोषणात केले आहे.

मनोज शब्दाचा पक्का : संभाजीराजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती यांनी बुधवारी दुपारी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज हा शब्दाचा पक्का आहे. त्याला बळ देण्यासाठी मी इथं आलो. तुम्ही आमरण उपोषण करा; परंतु, पाणी प्या, तब्येतीची काळजी घ्या, अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर जरांगे यांनी पाणी पिले.

आरक्षण शंभर टक्के द्यायचं आहे

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी शासन सकारात्मक आहे. शंभर टक्के आरक्षण मिळणार आहे. परंतु, तुम्ही टोकाची भूमिका घेत उपोषण करू नका. दोन दिवसात इतर प्रश्न मार्गी लागतील. भावनेच्या भरात नाही तर त्या आरक्षणाला कोणी चॅलेंज करणार नाही, असे आरक्षण द्यायचे आहे, असे सांगत मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाऐवजी साखळी उपोषण करावे, अशी विनंती केली.जरांगे म्हणाले...    

नेत्यांनी सांगितल्यानुसार आम्ही ४० दिवसांचा वेळ शासनाला दिला. परंतु ४१ दिवसांनंतरही आरक्षण जाहीर झालेले नाही. दोन दिवसांत गुन्हे मागे घेणे असो किंवा सभेवेळी झालेले शेतकऱ्यांचे नुकसान, त्यावरही शासनाने निर्णय घेतलेला नाही. आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या १६ ते १७ युवकांच्या कुटुंबीयांना अद्याप शासकीय मदत मिळालेली नाही.

शासन समाजाची दिशाभूल करीत असून, आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही. उपोषणात अन्न-पाण्याचा त्याग करणार असून, उपचारही घेणार नाही. युवकांच्या आत्महत्यांना दिशाभूल करणारे सरकार जबाबदार आहे. - मनोज जरांगे-पाटील, नेते, मराठा आरक्षण आंदोलन.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील