शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

“२ तासांत पुढील निर्णय घेणार, फडणवीसांवर पश्चात्तापाची वेळ येईल”; जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 09:07 IST

Manoj Jarange Patil News: देवेंद्र फडणवीसांविरोधात नाराजीची प्रचंड लाट उसळेल. देवेंद्र फडणवीसांना सुट्टी नाही, असे सांगत मनोज जरांगेंनी घणाघाती टीका केली.

Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगेंच्या आरोपांवर उत्तर दिले. यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत येत्या दोन तासांत पुढील निर्णय घेणार असून, देवेंद्र फडणवीस यांना पश्चात्ताप करण्याची वेळ येईल, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. 

मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत मुंबईतील सागर बंगल्याकडे कूच केली आहे. अंतरवाली सराटीतून भांबेरी पर्यंत गेले असून, रविवारी रात्री समाज बांधवांच्या विनंतीनुसार भांबेरी गावात थांबले आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रविवारी मध्यरात्री १ वाजल्यापासून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संचारबदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे यांच्या एका सहकाऱ्यासह ५ जणांना रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

वैद्यकीय उपचार घेण्यास मनोज जरांगे तयार

भांबेरी गावातून भूमिका मनोज जरांगे यांनी भूमिका स्पष्ट केली. तसेच वैद्यकीय उपचार घेण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. संचारबंदी उठवा, मग मुंबईला येणारच. पुन्हा एकदा आम्ही लढायला सज्ज आहोत. रात्री काय डाव शिजला होता, याची कल्पना होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता शहाणे व्हावे. संचारबंदीचा निर्णय मागे घ्यावा. आमच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी सोडावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. कायद्याचा मान ठेवायला हवा. पोलिसांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.

आज मी जिंकलो, देवेंद्र फडणवीस हरले

आज मी जिंकलो, देवेंद्र फडणवीस हरले. सगेसोयरे याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. देवेंद्र फडणवीसांविरोधात नाराजीची प्रचंड लाट उसळेल. अधिवेशनाच्या आधी सगेसोयरेबाबत निर्णय घ्यावा. देवेंद्र फडणवीसांच्या माहितीशिवाय जिल्हाधिकारी संचारबंदीचा निर्णय घेऊ शकत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्यात दम नाही. हे छत्रपती शिवरायांचे राज्य आहे. राज्यकर्त्यांना असले वागणे शोभत नाही. त्यांचा डाव आम्ही आधीच ओळखला, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

देवेंद्र फडणवीसांना सुट्टी नाही

जनता कामे केल्यावर आदर देते. देवेंद्र फडणवीसांनी असले धंदे बंद करावेत. देवेंद्र फडणवीसांना सुट्टी नाही. देवेंद्र फडणवीसांना आता हरवायचे आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ द्यायचे नाही. राज्यासह देशात त्यांना अडचणीत आणू. जनतेचा अंत पाहू नये. संचारबंदी लावून सरकार चालवण्यात कसली मर्दानगी आहे, असा सवाल करत, त्यांच्यात दम नाही, ते पोलिसांच्या आडूनच कामे करणार, असे अनेक गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केले.

दरम्यान, अंतरवाली सराटीत परतण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला आहे. तसेच तिथे जाऊन एक बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. आंदोलकांनी शांत राहावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षण