शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

फळ बागांच्या नुकसानीचे पंचनामी करा; जालन्यात ‘स्वाभिमानी’चा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 15:16 IST

या रास्तारोको आंदोलनामुळे जालना- बीड महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

ठळक मुद्देअतिवृष्टीमुळे डाळिंब, मोसंबी, द्राक्षे, ऊस यासह इतर फळपिकांचे मोठे नुकसान प्रत्येक शेतकऱ्यांना पाच ते सहा लाख रूपयांचा फटका

वडीगोद्री (जि. जालना) : अतिवृष्टीमुळे फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे फळ पिकांचे पंचनामे करून शेकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि.१५ )  सकाळी सुखापुरी फाट्यावर (ता.अंबड) रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या रास्तारोको आंदोलनामुळेजालना- बीड महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे डाळिंब, मोसंबी, द्राक्षे, ऊस यासह इतर फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून खरिपातील काही पिकांचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. मात्र, फळपिकांचे पंचनामे अद्यापही सुरू करण्यात आलेले नाहीत. मोसंबीवर रोगराई पडल्याने, फळगळ झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांवर करपा पडल्याने प्रत्येक शेतकऱ्यांना पाच ते सहा लाख रूपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील फळपिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, मागणी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी सकाळी जालना- बीड महामार्गावरील सुखापुरी फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

रास्तारोको आंदोलनामुळे महामार्गावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती. मंडळाधिकारी दिवाकर जोगलादेवीकर यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, जिल्हा सचिव पांडुरंग गटकळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश बोर्डे, राधाकिसन मैंद, वडीकाळ्याचे सरपंच रामभाऊ काळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :agitationआंदोलनJalanaजालना