शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Maharashtra Election 2019 : कार्यकर्ते जोमात तर शेतकरी पावसामुळे चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 18:16 IST

शेतकरी मतदार मात्र पावसाच्या चिंतेने हैराण

राजूर : विधानसभा निवडणूक अवघ्या दहा दिवसांवर आली असून, उमेदवारांनी प्रचाराला गती दिली आहे. आपापल्या पक्षाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून शेतकरी मतदार मात्र पावसाच्या चिंतेने हैराण झाल्याचे चित्र राजूर परिसरात दिसून येत आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी सर्वच प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी राजूरेश्वराला नारळ फोडून प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. उमेदवारांनी आपापल्या कार्यकर्त्यांना प्रचाराच्या कामाला भिडवल्याने कार्यकर्त्यांनी सुध्दा मरगळ झटकून पायाला भिंगरी बांधली आहे. खेड्यापाड्यात कार्यकर्ते प्रचार करीत असले तरी शेतकऱ्यांमध्ये निवडणुकीचा ऊत्साह कमी दिसून येत आहे. राजूर हे पंचक्रोशितील गावांचे राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाते. कोणत्याही निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ राजूरेश्वरापासून केला जातो.  

यावर्षी राजूरसह परिसरात एकही जोरदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम रिमझीम पावसावर तग धरून आहे. परतीच्या पावसाने सुध्दा दगा दिल्याने शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे. विहीरी, ओढे, नाले, तलाव कोरडेठाक असल्याने शेतकऱ्यांना पाण्याची चिंता सतावत आहे. परिसरात पाण्याची भिषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. संभाव्य पाणी समस्येने सामान्य नागरिकांच्या डोळ््यात पाणी येत आहे. रिमझीम पावसावर खरीपाचा हंगाम निघेल मात्र रब्बीचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अर्थिक नियोजन शेती व्यवसायावर अवलंबून राहात असल्याने त्यांना ऊदरनिवार्हाची चिंता सतावत आहे. त्यामुळे विविध पक्षाचे उमेदवार कार्यकर्ते जोमात फिरत असले तरी शेतकरी मात्र निवडणुकीच्या काळातही चिंतेत दिसून येत आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019jalna-acजालनाJalanaजालना