शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Maharashtra Election 2019 : कार्यकर्ते जोमात तर शेतकरी पावसामुळे चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 18:16 IST

शेतकरी मतदार मात्र पावसाच्या चिंतेने हैराण

राजूर : विधानसभा निवडणूक अवघ्या दहा दिवसांवर आली असून, उमेदवारांनी प्रचाराला गती दिली आहे. आपापल्या पक्षाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून शेतकरी मतदार मात्र पावसाच्या चिंतेने हैराण झाल्याचे चित्र राजूर परिसरात दिसून येत आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी सर्वच प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी राजूरेश्वराला नारळ फोडून प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. उमेदवारांनी आपापल्या कार्यकर्त्यांना प्रचाराच्या कामाला भिडवल्याने कार्यकर्त्यांनी सुध्दा मरगळ झटकून पायाला भिंगरी बांधली आहे. खेड्यापाड्यात कार्यकर्ते प्रचार करीत असले तरी शेतकऱ्यांमध्ये निवडणुकीचा ऊत्साह कमी दिसून येत आहे. राजूर हे पंचक्रोशितील गावांचे राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाते. कोणत्याही निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ राजूरेश्वरापासून केला जातो.  

यावर्षी राजूरसह परिसरात एकही जोरदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम रिमझीम पावसावर तग धरून आहे. परतीच्या पावसाने सुध्दा दगा दिल्याने शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे. विहीरी, ओढे, नाले, तलाव कोरडेठाक असल्याने शेतकऱ्यांना पाण्याची चिंता सतावत आहे. परिसरात पाण्याची भिषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. संभाव्य पाणी समस्येने सामान्य नागरिकांच्या डोळ््यात पाणी येत आहे. रिमझीम पावसावर खरीपाचा हंगाम निघेल मात्र रब्बीचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अर्थिक नियोजन शेती व्यवसायावर अवलंबून राहात असल्याने त्यांना ऊदरनिवार्हाची चिंता सतावत आहे. त्यामुळे विविध पक्षाचे उमेदवार कार्यकर्ते जोमात फिरत असले तरी शेतकरी मात्र निवडणुकीच्या काळातही चिंतेत दिसून येत आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019jalna-acजालनाJalanaजालना