शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 07:02 IST

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण, राजकारण, विधानसभा निवडणूक आणि आंदोलनाची पुढील दिशा यावर जरांगे पाटील यांनी ‘लोकमत’सोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. 

लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये निर्णायक भूमिका बजावल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा विधानसभा निवडणुकीचाही गनिमी कावा ठरला आहे. समाजाचे नुकसान होऊ नये म्हणून आपण निवडणुकीतून माघार घेतली. एकट्या समाजाच्या बळावर निवडून येणे अशक्य असते. परंतु आता कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडायचे हा निरोप त्या-त्या मतदारसंघात पोहोचला आहे, असा दावा जरांगे पाटील यांनी केला. अंतरवाली सराटीत ड्रॅगन फ्रूटच्या शेतात ‘लोकमत’च्या छत्रपती संभाजीनगर आवृत्तीचे संपादक नंदकिशोर पाटील यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत मनोज जरांगे पाटील यांनी ही माहिती दिली.

प्रश्न: अखेरच्या क्षणी विधानसभा निवडणुकीतून माघार का घेतली?या प्रश्नावर जरांगे पाटील यांनी माघार नाही तर निर्णायक भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले. एका जातीच्या आधारावर निवडणूक जिंकता येत नाही. मराठा उमेदवार पराभूत झाले असते तर त्याचा फटका आरक्षण आंदोलनाला बसला असता. राजकारण हा माझा प्रांत नाही. मला समाजासाठी लढायचे आहे. त्यांना आरक्षण मिळवून द्यायचे आहे. म्हणून मी हा निर्णय घेतला. तो मी एकट्याने घेतला नाही. मराठा समाजबांधवांशी चर्चा केली. त्यांनाही माझे म्हणणे पटले. नंतर मी हा निर्णय जाहीर केला, असे जरांगे यांनी सांगितले. प्रश्न: तुम्ही शब्द दिला म्हणून आजही अनेकजण निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. हे का घडले? यावर जरांगे म्हणाले, ज्यांना समाजासाठी लढायचे होते. त्यांनी माझ्या आवाहनानंतर माघार घेतली. ज्यांना समाजाची मदत घेऊन फक्त आमदार व्हायचे होते ते रिंगणात कायम आहे. मराठा समाजाने राजकारणात पडूच नये. जेवणातील लोणच्याप्रमाणे राजकारण करा. आगामी दहा-बारा दिवस हे चालू द्या. नंतर आपल्या पोरा-बाळाच्या भविष्यासाठी आंदोलनात वेळ द्या. त्यांचे भविष्य उज्ज्वल करा, असा सल्ला जरांगे पाटील यांनी मराठा समाजबांधवांना दिला.प्रश्न: तुमच्या आंदोलनामुळे समाजा-समाजात तेढ निर्माण झाली असे वाटत नाही का?या प्रश्नावर जरांगे म्हणाले, मला बदनाम करण्यासाठी असा आरोप केला जातो. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. आजही आम्ही सर्वजण एकच आहोत. आमच्यात कसलेही मतभेद नाहीत. उलट जे असा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याच मागे समाज नाही. प्रश्न: शरद पवारांचा फोन येतो का?१३ महिन्यांपासून मी फोन वापरणे बंद केले आहे. मग मला फोन कसा येईल? माझ्या मराठा समाजबांधवांसाठी मी माझ्या डोक्याने चालतो. कोण म्हणतो रिमोट पवारांचा, कोण म्हणतो शिंदेंचा? रिमोट माझ्याच हातात असून बदनामीसाठी सोयीने ही नावे घेतली जातात, असे जरांगे म्हणाले.प्रश्न: ५७ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र?आंदोलनासाठी राज्यातील ५७ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले. एका कुटुंबात पाच असे गृहीत धरले तर जवळपास तीन कोटी लोकांना आरक्षणाचा फायदा झाला.  रोज पाच-दहा मराठा तरुण मला नोकरी लागली असे सांगायला येतात. हे यश मराठा समाजाच्या एकजुटीचे आहे. स्वार्थासाठी या समाजाचा मी कधीच विश्वासघात करणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.प्रश्न: लाखोंच्या संख्येने येणाऱ्या मराठा बांधवांसाठी लाखोंचा खर्च करतो कोण? या प्रश्नावर जरांगे म्हणाले, ‘आता वडीगोद्रीला जायचे म्हटले तर माझ्या खिशात दहा रुपये नाहीत. पैसा लागतो कशाला? कोटींच्या संख्येने समाज माझ्या पाठीशी आहे. स्वयंस्फूर्तीने ते खर्च करतात. मला एक रुपयासाठी कधी हात पसरावा लागला नाही. वर्गणी गोळा करून ते खर्च करतात आणि हाच समाज माझी ताकद आहे.’

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक