शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

जालन्यात युतीच्या डावात जुनेच पत्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 17:23 IST

गेल्या निवडणुकीत भाजप तीन आणि शिवसेना एक असे युतीचे उमेदवार विजयी झाले होते

ठळक मुद्देयुतीकडून कुठलाच उमेदवार बदला नाही

- संजय देशमुख जालना : जालना जिल्ह्यातील युतीच्या उमेदवारांची घोषणा आता जवळपास निश्चित झाली. युतीकडून कुठलाच उमेदवार बदलण्याची हिंमत दाखवली नसल्याने युतीच्या डावात जुनेच पत्ते असे याचे विश्लेषण करता येईल. गेल्या निवडणुकीत भाजप तीन आणि शिवसेना एक असे युतीचे उमेदवार विजयी झाले होते, विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती नव्हती. केवळ घनसावंगी मतदारसंघातून आ. राजेश टोपे यांनी घडाळ्याची टिकटिक कायम ठेवली होती. 

जालना जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. यात आजघडीला जालन्यातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्या रूपाने एकमेव आमदार आहेत, तर भाजपचे तीन आमदार आहेत. त्यात पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, हे परतूर विधानसभेचे नेतृत्व करतात. बदनापूर हा राखीव मतदारसंघ असून, त्यातून  भाजपचे आ. नारायण कुचे तर भोकरदन मतदारसंघातून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे हे आमदार आहेत. एकूणच तीन भाजप, एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादी असे गेल्या निवडणुकीतील चित्र आहे. यंदा भाजपने आपली यादी जाहीर करताना ती सर्वात शेवटी केली आहे. तत्पूर्वी शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या जालना आणि घनसावंगी येथील उमेदवारांना खुद्द पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी मुंबईत ए.बी. अर्ज दिले होते.

दरम्यान, पुन्हा एकदा जुन्याच लढती कायम राहतील असे चित्र दिसत आहे. जालन्यात काँग्रेसकडून माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्याविरूध्द खोतकर, परतूरमध्ये लोणीकरांविरूध्द माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, भोकरदनमध्ये भाजपचे संतोष दानवेंविरूध्द राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. चंद्रकांत दानवे तसेच घनसांवगी मतदारसंघात आ. राजेश टोपे यांच्याविरूध्द शिवसेनेकडून निवृत्त उपजिल्हाधिकारी डॉ. हिकमत उढाण यांच्यात लढत होईल. बदनापूर मतदारसंघात आ. कुचेंविरूध्द राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष लागून आहे.  बदनापूर मतदारसंघ शिवसेनेकडे सोडावा, या मागणीसाठी माजी आ. संतोष दानवे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे हट्ट धरला होता आणि ठाकरे यांनीही बराच उचलून धरला परंतु ऐनवेळी यात बदल शक्य झाला नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आता संतोष सांबरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यंदा वंचित, एमआयएमकडे लक्ष यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे उमेदवार किती प्रभाव पाडतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे. वंचित आघाडीने आपले पाचही उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच जालन्यातील एमआयएमचे उमेदवारही यापूर्वीच घोषित केले आहेत. त्यामुळे प्रचारातील रंगत आता चांगली वाढणार आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेना