शहरं
Join us  
Trending Stories
1
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
4
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
5
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
6
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
7
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
8
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
9
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
10
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
11
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
12
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
13
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
14
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
15
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
16
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
17
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
18
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
19
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
20
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात युतीच्या डावात जुनेच पत्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 17:23 IST

गेल्या निवडणुकीत भाजप तीन आणि शिवसेना एक असे युतीचे उमेदवार विजयी झाले होते

ठळक मुद्देयुतीकडून कुठलाच उमेदवार बदला नाही

- संजय देशमुख जालना : जालना जिल्ह्यातील युतीच्या उमेदवारांची घोषणा आता जवळपास निश्चित झाली. युतीकडून कुठलाच उमेदवार बदलण्याची हिंमत दाखवली नसल्याने युतीच्या डावात जुनेच पत्ते असे याचे विश्लेषण करता येईल. गेल्या निवडणुकीत भाजप तीन आणि शिवसेना एक असे युतीचे उमेदवार विजयी झाले होते, विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती नव्हती. केवळ घनसावंगी मतदारसंघातून आ. राजेश टोपे यांनी घडाळ्याची टिकटिक कायम ठेवली होती. 

जालना जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. यात आजघडीला जालन्यातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्या रूपाने एकमेव आमदार आहेत, तर भाजपचे तीन आमदार आहेत. त्यात पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, हे परतूर विधानसभेचे नेतृत्व करतात. बदनापूर हा राखीव मतदारसंघ असून, त्यातून  भाजपचे आ. नारायण कुचे तर भोकरदन मतदारसंघातून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे हे आमदार आहेत. एकूणच तीन भाजप, एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादी असे गेल्या निवडणुकीतील चित्र आहे. यंदा भाजपने आपली यादी जाहीर करताना ती सर्वात शेवटी केली आहे. तत्पूर्वी शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या जालना आणि घनसावंगी येथील उमेदवारांना खुद्द पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी मुंबईत ए.बी. अर्ज दिले होते.

दरम्यान, पुन्हा एकदा जुन्याच लढती कायम राहतील असे चित्र दिसत आहे. जालन्यात काँग्रेसकडून माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्याविरूध्द खोतकर, परतूरमध्ये लोणीकरांविरूध्द माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, भोकरदनमध्ये भाजपचे संतोष दानवेंविरूध्द राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. चंद्रकांत दानवे तसेच घनसांवगी मतदारसंघात आ. राजेश टोपे यांच्याविरूध्द शिवसेनेकडून निवृत्त उपजिल्हाधिकारी डॉ. हिकमत उढाण यांच्यात लढत होईल. बदनापूर मतदारसंघात आ. कुचेंविरूध्द राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष लागून आहे.  बदनापूर मतदारसंघ शिवसेनेकडे सोडावा, या मागणीसाठी माजी आ. संतोष दानवे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे हट्ट धरला होता आणि ठाकरे यांनीही बराच उचलून धरला परंतु ऐनवेळी यात बदल शक्य झाला नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आता संतोष सांबरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यंदा वंचित, एमआयएमकडे लक्ष यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे उमेदवार किती प्रभाव पाडतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे. वंचित आघाडीने आपले पाचही उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच जालन्यातील एमआयएमचे उमेदवारही यापूर्वीच घोषित केले आहेत. त्यामुळे प्रचारातील रंगत आता चांगली वाढणार आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेना