शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

विवाह नोंदणीकडे नवदाम्पत्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 01:05 IST

विवाहाचा अधिकृत शासकीय पुरावा म्हणून आवश्यक विवाह नोंदणी प्रमाणपत्राबाबत नवदांम्पत्यांची भूमिका उदासीन असल्याचे पहावयास मिळत आहे. महिन्याकाठी शेकडो शुभमंगल लागत असताना नगरपालिकेच्या विवाह नोंदणी विभागात केवळ शंभर नवदाम्पत्यांनी नोंदणी केली आहे

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विवाहाचा अधिकृत शासकीय पुरावा म्हणून आवश्यक विवाह नोंदणी प्रमाणपत्राबाबत नवदांम्पत्यांची भूमिका उदासीन असल्याचे पहावयास मिळत आहे. महिन्याकाठी शेकडो शुभमंगल लागत असताना नगरपालिकेच्या विवाह नोंदणी विभागात केवळ शंभर नवदाम्पत्यांनी नोंदणी केली आहेविवाहाचा कायदेशीर पुरावा म्हणून विवाह नोंदणी प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. शिवाय पती-पत्नीचे संयुक्त बँक खाते उघडणे, विमा पॉलिसी, पासपोर्ट काढणे, वारसा हक्क दावा, आंतरजातीय विवाह झाल्यास आदी शासकीय कामांसाठी विवाह नोंदणी प्रमाणत्र आवश्यक असते. नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, दुय्यम निबंधक कार्यालयात विवाह नोंदणी करून प्रमाणपत्र मिळविता येते. मात्र, विवाह नोंदणीबाबत बहुतांश नवदाम्पत्य अनभिज्ञ आहेत. याबाबत जनजागृती नसल्याने विवाह नोंदणी करावी लागते याबाबत अनेकांना माहिती नसल्याचे चित्र आहे. जालना नगरपालिका कार्यालयात विवाह नोंदणी स्वतंत्र विभाग आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर नवदांम्पत्यांना तात्काळ नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, येथे नोंदणीसाठी येणाऱ्या दाम्पत्यांचे प्रमाण नगण्य असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी पद्धतीने विवाह केलेल्या जोडप्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, हे प्रमाण अत्यंत कमी आहे. जालना शहरात पासपोर्ट सेवा सुरू झाल्यामुळे विवाह नोंदणी करणाºयांच्या संख्येत भर पडेल, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :marriageलग्नRegistrarकुलसचिव