शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
2
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
3
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
4
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
5
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
6
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
7
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
8
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
9
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
10
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
11
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
12
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
13
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
14
"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
15
'भाजपा उपऱ्यांचा पक्ष बनलाय; आता रेशिमबाग नाही तर अदानी-अंबानी भाजपा चालवणार', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 
16
चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
17
नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
18
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
19
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
20
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
Daily Top 2Weekly Top 5

मोसंबी उत्पादकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 01:08 IST

जालना तालुक्यातील बहुतांश गावात मोसंबी आंबे बहराची फळगळ मोठ्या प्रमणात झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : जालना तालुक्यातील बहुतांश गावात मोसंबी आंबे बहराची फळगळ मोठ्या प्रमणात झाली आहे. यामुळे मोसंबी उत्पादनात मोठी घट होणार असून मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.तालुक्यातील फळधारणाक्षम मोसंबी अवघी साडेतीन हजार हेक्टरच्या आसपास आहे. खरीपाचा समजला जाणारा आंबे बहरावर यावर्षी दुष्काळाचे मोठे संकट होते. यामुळे मोठ्या प्रयत्नाने डिसेंबर- जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांनी हजारो रूपये खर्च करून मोसंबी आंबे बहराची फूट काढून अतिशय काळजी घेत झाडावर फळधारणा केली. परंतु, मार्च- एप्रिल महिन्यात बदलत्या वातावरणामुळे बोरा एवढ्या आकाराच्या मोसंबीच्या फळांची बहुतांश बागांमध्ये गळ झाली आहे.तालुक्यात फळपिकांमध्ये एकमेव मोसंबी हे असे फळपीक आहे की, इतर फळपिकांच्या तुलनेत सोपे आहे. द्राक्ष, डाळींब यापेक्षाही मोसंबी चांगली म्हणणारा शेतकरी वर्ग आजही आहे. जालना जिल्ह्यात मोसंबीसाठी असणारे अनुकूल वातावरण वर्षानुवर्ष बदलत चालले असल्याचे आंबा उत्पादक सांगतात. गेल्या सात- आठ वर्षापासून सातत्याने पडणा-या दुष्काळामुळे मोसंबी उत्पादकांच्या हाती एरव्ही फार काही लागले नाही. प्रत्येक वर्षी तोच पाढा यावर्षी काहीही होवो; झाडे वाचली म्हणजे झालं. अशी झाडं वाचविता- वाचविता अनेकांच्या बागा नष्ट झाल्या. एकेकाळी तालुक्यात १० हेक्टरच्या आसपास मोसंबी होती. आता ती अवघी तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर आली. एरव्ही वृक्ष लागवडीसाठी शासनस्तरावरून लाखो रूपये खर्च केले जातात. २० ते २५ वर्ष मोसंबी वृक्षाचे जतन करणा-या उत्पादकाला काय, असा सवालही मोसंबी उत्पादकांमधून विचारला जात आहे. तालुक्यातील फळगळतीची पाहणी करून फळपीक विमा तातडीने द्यावा, अशी मागणीही मोसंबी उत्पादकांमधून होत आहे.मोसंबीचा जिल्हा म्हणून जालन्याची महाराष्ट्रात ओळख आहे. परंतु, गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्ह्यातील मोसंबी खºया अर्थाने शाश्वत उत्पन्न देणारी ठरावी, यासाठी संबंधित विभागाकडून कुठल्याच ठोस उपाय- योजना केल्या जात नसल्याचे मोसंबी उत्पादक संघाचे अध्यक्ष भगवान डोंगरे यांनी सांगितले.निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे कृषी विभागाकडे मोसंबी उत्पादकांच्या समस्या सोडविण्यास सध्या तरी पुरता वेळ नसल्याचे दिसून येत आहे. यावर्षी पडलेल्या दुष्काळामुळे आंबे बहराच्या मोसंबीचे जतन करणे, जिकिरीचे होतेच. परंतु, पुढील वर्षी या मोसंबीस ३० ते ४० हजार रूपये प्रति टन भाव मिळणारच, असे खुद्द व्यापा-यांसह मोसंबी उत्पादक सांगत आहेत.

टॅग्स :fruitsफळेAgriculture Sectorशेती क्षेत्रweatherहवामान