शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
3
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
4
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
5
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
6
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
7
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
8
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
9
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
10
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
11
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
12
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
13
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
14
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
15
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
16
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
17
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
18
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
19
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
20
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली

मोसंबी उत्पादकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 01:08 IST

जालना तालुक्यातील बहुतांश गावात मोसंबी आंबे बहराची फळगळ मोठ्या प्रमणात झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : जालना तालुक्यातील बहुतांश गावात मोसंबी आंबे बहराची फळगळ मोठ्या प्रमणात झाली आहे. यामुळे मोसंबी उत्पादनात मोठी घट होणार असून मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.तालुक्यातील फळधारणाक्षम मोसंबी अवघी साडेतीन हजार हेक्टरच्या आसपास आहे. खरीपाचा समजला जाणारा आंबे बहरावर यावर्षी दुष्काळाचे मोठे संकट होते. यामुळे मोठ्या प्रयत्नाने डिसेंबर- जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांनी हजारो रूपये खर्च करून मोसंबी आंबे बहराची फूट काढून अतिशय काळजी घेत झाडावर फळधारणा केली. परंतु, मार्च- एप्रिल महिन्यात बदलत्या वातावरणामुळे बोरा एवढ्या आकाराच्या मोसंबीच्या फळांची बहुतांश बागांमध्ये गळ झाली आहे.तालुक्यात फळपिकांमध्ये एकमेव मोसंबी हे असे फळपीक आहे की, इतर फळपिकांच्या तुलनेत सोपे आहे. द्राक्ष, डाळींब यापेक्षाही मोसंबी चांगली म्हणणारा शेतकरी वर्ग आजही आहे. जालना जिल्ह्यात मोसंबीसाठी असणारे अनुकूल वातावरण वर्षानुवर्ष बदलत चालले असल्याचे आंबा उत्पादक सांगतात. गेल्या सात- आठ वर्षापासून सातत्याने पडणा-या दुष्काळामुळे मोसंबी उत्पादकांच्या हाती एरव्ही फार काही लागले नाही. प्रत्येक वर्षी तोच पाढा यावर्षी काहीही होवो; झाडे वाचली म्हणजे झालं. अशी झाडं वाचविता- वाचविता अनेकांच्या बागा नष्ट झाल्या. एकेकाळी तालुक्यात १० हेक्टरच्या आसपास मोसंबी होती. आता ती अवघी तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर आली. एरव्ही वृक्ष लागवडीसाठी शासनस्तरावरून लाखो रूपये खर्च केले जातात. २० ते २५ वर्ष मोसंबी वृक्षाचे जतन करणा-या उत्पादकाला काय, असा सवालही मोसंबी उत्पादकांमधून विचारला जात आहे. तालुक्यातील फळगळतीची पाहणी करून फळपीक विमा तातडीने द्यावा, अशी मागणीही मोसंबी उत्पादकांमधून होत आहे.मोसंबीचा जिल्हा म्हणून जालन्याची महाराष्ट्रात ओळख आहे. परंतु, गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्ह्यातील मोसंबी खºया अर्थाने शाश्वत उत्पन्न देणारी ठरावी, यासाठी संबंधित विभागाकडून कुठल्याच ठोस उपाय- योजना केल्या जात नसल्याचे मोसंबी उत्पादक संघाचे अध्यक्ष भगवान डोंगरे यांनी सांगितले.निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे कृषी विभागाकडे मोसंबी उत्पादकांच्या समस्या सोडविण्यास सध्या तरी पुरता वेळ नसल्याचे दिसून येत आहे. यावर्षी पडलेल्या दुष्काळामुळे आंबे बहराच्या मोसंबीचे जतन करणे, जिकिरीचे होतेच. परंतु, पुढील वर्षी या मोसंबीस ३० ते ४० हजार रूपये प्रति टन भाव मिळणारच, असे खुद्द व्यापा-यांसह मोसंबी उत्पादक सांगत आहेत.

टॅग्स :fruitsफळेAgriculture Sectorशेती क्षेत्रweatherहवामान