शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

मोसंबी उत्पादकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 01:08 IST

जालना तालुक्यातील बहुतांश गावात मोसंबी आंबे बहराची फळगळ मोठ्या प्रमणात झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : जालना तालुक्यातील बहुतांश गावात मोसंबी आंबे बहराची फळगळ मोठ्या प्रमणात झाली आहे. यामुळे मोसंबी उत्पादनात मोठी घट होणार असून मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.तालुक्यातील फळधारणाक्षम मोसंबी अवघी साडेतीन हजार हेक्टरच्या आसपास आहे. खरीपाचा समजला जाणारा आंबे बहरावर यावर्षी दुष्काळाचे मोठे संकट होते. यामुळे मोठ्या प्रयत्नाने डिसेंबर- जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांनी हजारो रूपये खर्च करून मोसंबी आंबे बहराची फूट काढून अतिशय काळजी घेत झाडावर फळधारणा केली. परंतु, मार्च- एप्रिल महिन्यात बदलत्या वातावरणामुळे बोरा एवढ्या आकाराच्या मोसंबीच्या फळांची बहुतांश बागांमध्ये गळ झाली आहे.तालुक्यात फळपिकांमध्ये एकमेव मोसंबी हे असे फळपीक आहे की, इतर फळपिकांच्या तुलनेत सोपे आहे. द्राक्ष, डाळींब यापेक्षाही मोसंबी चांगली म्हणणारा शेतकरी वर्ग आजही आहे. जालना जिल्ह्यात मोसंबीसाठी असणारे अनुकूल वातावरण वर्षानुवर्ष बदलत चालले असल्याचे आंबा उत्पादक सांगतात. गेल्या सात- आठ वर्षापासून सातत्याने पडणा-या दुष्काळामुळे मोसंबी उत्पादकांच्या हाती एरव्ही फार काही लागले नाही. प्रत्येक वर्षी तोच पाढा यावर्षी काहीही होवो; झाडे वाचली म्हणजे झालं. अशी झाडं वाचविता- वाचविता अनेकांच्या बागा नष्ट झाल्या. एकेकाळी तालुक्यात १० हेक्टरच्या आसपास मोसंबी होती. आता ती अवघी तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर आली. एरव्ही वृक्ष लागवडीसाठी शासनस्तरावरून लाखो रूपये खर्च केले जातात. २० ते २५ वर्ष मोसंबी वृक्षाचे जतन करणा-या उत्पादकाला काय, असा सवालही मोसंबी उत्पादकांमधून विचारला जात आहे. तालुक्यातील फळगळतीची पाहणी करून फळपीक विमा तातडीने द्यावा, अशी मागणीही मोसंबी उत्पादकांमधून होत आहे.मोसंबीचा जिल्हा म्हणून जालन्याची महाराष्ट्रात ओळख आहे. परंतु, गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्ह्यातील मोसंबी खºया अर्थाने शाश्वत उत्पन्न देणारी ठरावी, यासाठी संबंधित विभागाकडून कुठल्याच ठोस उपाय- योजना केल्या जात नसल्याचे मोसंबी उत्पादक संघाचे अध्यक्ष भगवान डोंगरे यांनी सांगितले.निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे कृषी विभागाकडे मोसंबी उत्पादकांच्या समस्या सोडविण्यास सध्या तरी पुरता वेळ नसल्याचे दिसून येत आहे. यावर्षी पडलेल्या दुष्काळामुळे आंबे बहराच्या मोसंबीचे जतन करणे, जिकिरीचे होतेच. परंतु, पुढील वर्षी या मोसंबीस ३० ते ४० हजार रूपये प्रति टन भाव मिळणारच, असे खुद्द व्यापा-यांसह मोसंबी उत्पादक सांगत आहेत.

टॅग्स :fruitsफळेAgriculture Sectorशेती क्षेत्रweatherहवामान