शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मोसंबी फळबाग उत्पादकांचे नुकसान..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 01:09 IST

जालना तालुक्यात आंबे बहराची मोसंबीची ऐन मोसमात आली असताना ठिकठिकाणच्या मोसंबी बागेत मोठ्या फळांची गळ होत असल्यामुळे मोसंबी उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : जालना तालुक्यात आंबे बहराची मोसंबीची ऐन मोसमात आली असताना ठिकठिकाणच्या मोसंबी बागेत मोठ्या फळांची गळ होत असल्यामुळे मोसंबी उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.गतवर्षीच्या दुष्काळातून अथक प्रयत्नाने तालुक्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी फळबागा वाचविल्या. आंबे बहराची मोसंबी झाडावर बहरत असताना बुरशीजन्य रोगामुळे मोठमोठी फळे देठापासून सुटून खाली पडत आहे. फळगळीचे प्रमाण आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडत असल्याने मोसंबी उत्पादक शेतक-यांनी आता कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज असल्याचे बोलले जाते. हातवनचे मोसंबी उत्पादक प्रगतशिल शेतकरी अशोकराव गायकवाड यांनी सांगितले की, मोसंबी साखरे फायदेशीर फळपिक कोणतेच नाही. परंतू, गेल्या दोन - तीन वर्षापासून वेगवेगळ्या कारणाने फळगळीचा सामना उत्पादकांना करावा लागत असल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. माली पिंपळगावचे प्रगतशिल शेतकरी गणेश थोरात यांनी सांगितले की, यावर्ष मृग बहर आला नसल्याने आंबे बहराची मोसंबी चांगल्या भावाने विकली जाणार ३० ते ३५ हजार रूपये प्रतिटन मोसंबीस भाव नक्की मिळणार. आता दसरा, दिवाळीत मोसंबीचा आंबे बहर विक्री केला जातो. देठ कुजल्यामुळे आज विक्रीस आलेल्या मोसंबीची फळबाग झाली तर साठ हजाराच्यावर शेतक-यांचे नुकसान होणार आहे. शेती व्यवसाय प्रचंड धोक्यात आला. आता करावे तरी काय, हाच मोठा प्रश्न शेतक-यांना पडला.

टॅग्स :fruitsफळेFarmerशेतकरी