शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कर्जवसुलीस स्थगिती असतानाही कर्ज खात्यात रक्कम केली वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:33 IST

दुष्काळात कर्जवसूलीस स्थगिती असतानाही कापूस विकून आलेले २२ हजार रूपये हे महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शोखेने कर्ज खात्यात वर्ग केल्याने माझी अडचण झाल्याची व्यथा जालना तालुक्यातील देऊळगाव -सी येथील शेतकरी राजेंद्र बाबूराव खरात यांनी मांडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सध्या दुष्काळाने शेतकरी हवालदिल झाला आहे. असे असताना शासनाने दुष्काही जाहीर केला आहे. या दुष्काळात कर्जवसूलीस स्थगिती असतानाही कापूस विकून आलेले २२ हजार रूपये हे महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शोखेने कर्ज खात्यात वर्ग केल्याने माझी अडचण झाल्याची व्यथा जालना तालुक्यातील देऊळगाव -सी येथील शेतकरी राजेंद्र बाबूराव खरात यांनी मांडली.सोमवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान राजेंद्र खरात हे जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. परंतु ते जनसुनावणीसाठी बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. यावेळी तेथे उपस्थित आमच्या प्रतिनिधीशी खरात यांनी आपली व्यथा मांडली. त्यांनी गेल्या आठवड्यात त्यांचा कापूस हा देऊळगावराजा येथील एका खासगी जिनिंगमध्ये विक्री केला होता. त्यापोटी त्यांना संबंधित जिनिंग मालकाने २२ हजार रूपयांचा धनादेश दिला होता. तो धनादेश खरात यांनी त्यांचे महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शाखेत असलेल्या बचत खात्यात क्लिअरींगसाठी टाकला होता.हा धनादेश क्लिअर झाल्यावर त्याची रक्कम काढण्यासाठी बँकेत गेले असता, त्यांचे हे २२ हजार रूपये त्यांच्या कर्जखात्यात जमा केल्याचे व्यवस्थापकांनी त्यांना सांगितले. परंतु साहेब कर्ज वसुलीस सध्या सरकारने स्थगिती दिली आहे. असे सांगूनही बँकेने त्यांचे काहीएक ऐकले नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिका-यांकडे या संदर्भातील निवेदन दिले आहे. विशेष म्हणजे शासनाने पीककर्ज दीड लाख रूपयांपर्यंतचे माफ केले आहे, त्यामुळे माझे कर्ज केवळ ६० हजार रूपयांचेच आहे. त्यामुळे तुम्ही ही रक्कम कर्ज खात्यात वळती करू नये अशी विनंती केली. मात्र ही शेतकºयांची विनंती नाकरण्यात आली. तसेच तुम्ही जे कर्ज घेतले आहे, ते शेतात पाईपलाईन टाकण्यासाठी घेतलेली आहे, तुमचे पीककर्जच माफ झाल्याचा युक्तिवाद बँक अधिका-यांनी केल्याचे खरात यांनी सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळCrop Loanपीक कर्जBanking Sectorबँकिंग क्षेत्र