शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

'झालं गेलं विसरून जाऊ'; रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात पुन्हा दिलजमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 14:52 IST

लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यानंतर खोतकर व दानवे यांच्यात मोठा राजकीय दुरावा निर्माण झाला.

- फकिरा देशमुखभोकरदन( जालना) : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुरावलेले माजी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे व शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात पुन्हा दुसऱ्यांदा दिलजमाई झाली. झाले गेले विसरून विधनसभा निवडणुकीत आपण एकमेकाचे काम करू, असे दोघांनीही पत्रकारांना सांगितले.

लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यानंतर खोतकर व दानवे यांच्यात मोठा राजकीय दुरावा निर्माण झाला. विधानसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर हे महायुतीचे जालन्यातून उमेदवार आहेत तर रावसाहेब दानवे यांचे चुलत भाऊ भास्करराव दानवे यांनीही येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, दानवे यांनी अर्ज मागे घेतला. परंतु, जालन्यात भाजपचे कोणतेही कार्यकर्ते खोतकर यांच्या प्रचारात सक्रिय नसल्याने खोतकर अडचणीत सापडले आहेत. त्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जालन्यात प्रचार सभा आहे. सभेसाठी आपण यावे म्हणून अर्जुन खोतकर व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी आज सकाळी ७ वाजता रावसाहेब दानवे यांचे भोकरदन येथील निवस्थान गाठले. मात्र, दानवे प्रचारासाठी ग्रामीण भागात गेले होते. खोतकर यांनी दानवे यांना फोन करून आपण घरी आलो आहोत, असा निरोप दिला. त्यानंतर दानवे घरी आले.

दानवे - खोतकर तब्बल २ तास चर्चादरम्यान, खोतकर आणि दानवे यांच्यात तब्बल दोन तास खलबत्ते झाली. त्यामध्ये मागच्या अनेक चुकावर प्रकाश टाकण्यात आला. आता आपण झाले गेले विसरून पुढे काही चुका होणार नाही असा शब्द दानवे आणि खोतकरांनी एकमेकांना दिला. पुन्हा महायुतीचा सुखाने संसार करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शिवसेना शिंदे यांचे पदाधिकारी विशाल गाढे, भुषण शर्मा, यांची उपस्थिती होती.

रावसाहेब दानवे यांनी आशीर्वाद दिलामाजी राज्यमंत्री तथा जालना मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी सांगितले की, मी जालन्यातुन महायुतीचा उमेदवार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जालना येथे सभा आहे. त्याचे निमंत्रण देण्यासाठी व दानवे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज येथे आलो. दानवे यांनी मला आशीर्वाद दिला आहे, ते माझ्या प्रचारासाठी येणार आहेत. मागच्या काळात जे काही मतभेद होते, गैरसमज होते ते दूर झाले आहेत. यापुढे आमच्यात कोणताही दुरावा निर्माण होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, आमचे कार्यकर्ते सुध्दा भोकरदन मतदार संघात संतोष दानवे यांना निवडून आणण्यासाठी परिश्रम घेतील असे खोतकर यांनी सांगितले.

जुन्या वादावर पडदामाजी केंद्रिय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, मी राज्य पातळीवर काम करणारा नेता आहे. आतापर्यंत राज्यात अनेक ठिकाणी जाऊन महायुतीसाठी सभा घेतल्या. त्यामुळे जालन्यात जाता आले नाही. मी पक्षशिस्त पाळणारा, त्यामुळे खोतकर आले नसते तरीही मी महायुतीचा प्रचार करणार होतो. मात्र अर्जुनराव खोतकर घरी आले. आमच्यात चर्चा झाली, मागे काय झाले यावर पडदा टाकून पुढे एकत्र काम करण्याचे ठरले आहे. मी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी जाणार आहे.  माझा लोकसभेत जो पराभव मान्य करून परत कामाला लागलो आहे. मी खचून जाणारा कार्यकर्ता नाही असे दानवे यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकbhokardan-acभोकरदनjalna-acजालनाArjun Khotkarअर्जुन खोतकरraosaheb danveरावसाहेब दानवे