शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

'झालं गेलं विसरून जाऊ'; रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात पुन्हा दिलजमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 14:52 IST

लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यानंतर खोतकर व दानवे यांच्यात मोठा राजकीय दुरावा निर्माण झाला.

- फकिरा देशमुखभोकरदन( जालना) : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुरावलेले माजी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे व शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात पुन्हा दुसऱ्यांदा दिलजमाई झाली. झाले गेले विसरून विधनसभा निवडणुकीत आपण एकमेकाचे काम करू, असे दोघांनीही पत्रकारांना सांगितले.

लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यानंतर खोतकर व दानवे यांच्यात मोठा राजकीय दुरावा निर्माण झाला. विधानसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर हे महायुतीचे जालन्यातून उमेदवार आहेत तर रावसाहेब दानवे यांचे चुलत भाऊ भास्करराव दानवे यांनीही येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, दानवे यांनी अर्ज मागे घेतला. परंतु, जालन्यात भाजपचे कोणतेही कार्यकर्ते खोतकर यांच्या प्रचारात सक्रिय नसल्याने खोतकर अडचणीत सापडले आहेत. त्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जालन्यात प्रचार सभा आहे. सभेसाठी आपण यावे म्हणून अर्जुन खोतकर व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी आज सकाळी ७ वाजता रावसाहेब दानवे यांचे भोकरदन येथील निवस्थान गाठले. मात्र, दानवे प्रचारासाठी ग्रामीण भागात गेले होते. खोतकर यांनी दानवे यांना फोन करून आपण घरी आलो आहोत, असा निरोप दिला. त्यानंतर दानवे घरी आले.

दानवे - खोतकर तब्बल २ तास चर्चादरम्यान, खोतकर आणि दानवे यांच्यात तब्बल दोन तास खलबत्ते झाली. त्यामध्ये मागच्या अनेक चुकावर प्रकाश टाकण्यात आला. आता आपण झाले गेले विसरून पुढे काही चुका होणार नाही असा शब्द दानवे आणि खोतकरांनी एकमेकांना दिला. पुन्हा महायुतीचा सुखाने संसार करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शिवसेना शिंदे यांचे पदाधिकारी विशाल गाढे, भुषण शर्मा, यांची उपस्थिती होती.

रावसाहेब दानवे यांनी आशीर्वाद दिलामाजी राज्यमंत्री तथा जालना मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी सांगितले की, मी जालन्यातुन महायुतीचा उमेदवार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जालना येथे सभा आहे. त्याचे निमंत्रण देण्यासाठी व दानवे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज येथे आलो. दानवे यांनी मला आशीर्वाद दिला आहे, ते माझ्या प्रचारासाठी येणार आहेत. मागच्या काळात जे काही मतभेद होते, गैरसमज होते ते दूर झाले आहेत. यापुढे आमच्यात कोणताही दुरावा निर्माण होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, आमचे कार्यकर्ते सुध्दा भोकरदन मतदार संघात संतोष दानवे यांना निवडून आणण्यासाठी परिश्रम घेतील असे खोतकर यांनी सांगितले.

जुन्या वादावर पडदामाजी केंद्रिय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, मी राज्य पातळीवर काम करणारा नेता आहे. आतापर्यंत राज्यात अनेक ठिकाणी जाऊन महायुतीसाठी सभा घेतल्या. त्यामुळे जालन्यात जाता आले नाही. मी पक्षशिस्त पाळणारा, त्यामुळे खोतकर आले नसते तरीही मी महायुतीचा प्रचार करणार होतो. मात्र अर्जुनराव खोतकर घरी आले. आमच्यात चर्चा झाली, मागे काय झाले यावर पडदा टाकून पुढे एकत्र काम करण्याचे ठरले आहे. मी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी जाणार आहे.  माझा लोकसभेत जो पराभव मान्य करून परत कामाला लागलो आहे. मी खचून जाणारा कार्यकर्ता नाही असे दानवे यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकbhokardan-acभोकरदनjalna-acजालनाArjun Khotkarअर्जुन खोतकरraosaheb danveरावसाहेब दानवे