शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

लीळाचरित्र ग्रंथ आदर्शवादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:46 IST

महानुभावांचाच नव्हे, तर मानवतवादी तत्वज्ञानाचा कुठला ग्रंथ असेल तर तो लीळाचरित्र ग्रंथ आहे. हा ग्रंथ आदर्शवादी आहे. असा हितोपदेश महंत सुरेशराज राहेरकर यांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमहदंबा नगरी : महानुभावांचाच नव्हे, तर मानवतवादी तत्वज्ञानाचा कुठला ग्रंथ असेल तर तो लीळाचरित्र ग्रंथ आहे. यामध्ये संस्कार, तत्वविचार दिसतात. यामुळे आज संपत्तीच्या पाठीमागे लागलेल्यांसाठी हा ग्रंथ आदर्शवादी आहे. असा हितोपदेश महंत सुरेशराज राहेरकर यांनी दिला आहे.येथील बगडिया इंटरनॅशनल मध्ये आयोजित अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलनातील तीसऱ्या परिसंवादात सोमवारी लीळाचरित्र- संस्कार दर्शन या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर डॉ. राजधर सोनपेठकर, डॉ. संदीप तडस, कुलाचार्य लासूरकर महाराज, आचार्य सेवलीकर महाराज, कोठीकर महाराज आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना राहेरकर महाराज म्हणाले, १२ शतकात वनस्तपतीचा एकत्र रसायन प्रक्रियेतून सोनं कसं तयार करायचे याची प्रक्रिया या ग्रंथात आली आहे. अन्याय अत्याचाºयाच्या घटना आज आपल्या सर्वांच्याच बाजूला घडत आहेत. आजच्या शिक्षण व्यवस्थेने माणूस सुशिक्षित होत आहे. पण, तो सुसंस्कृत होती की नाही. ही महत्त्वाची बाब आहे.वाल्या कोळ्या बदलल्याच्या आजपर्यंत आपण इतिहास ऐकत होतोत. पण, या राज्याने हा इतिहास डोळ््याने पाहिला आहे की, नागदेवाचार्यासारखा दरोडेखोर माणूस आरपार बदलला आहे. स्वामींच्या सुसंस्काराने आज तो आपल्याला लीळाचरित्र ग्रंथात दिसत आहे. तसेच माणूस अहंकाराने दूर जातो. पण, त्याला जागेवर आणण्याचे काम स्वामिंनी केले असून त्यांनी माणसांवरच नाही तर प्राण्यांवरही प्रेम केले असल्याचेही महंत सुरेशराज राहेरकर यांनी सांगितले आहे.स्मृतीस्थळ या विषयावर बोलताना संदीप तडस म्हणाले, महानुभाव साहित्यातून मराठी भाषेचा उगम झालेला असून महानुभाव साहित्य मराठी भाषेची जननी व उगमस्थान आहे. यामुळे प्रत्येकाने एकदा तरी हा स्मृतीस्थळ हा ग्रंथ वाचावा, या ग्रंथाची भाषा साधी, सोपी व घरगुती आहे. परंतु, ती तेवढीच आत्मकल्याणाची आहे.आज ख-या अर्थाने महानुभाव साहित्याचे संशोधन होण्याची गरज आहे. पण, आपल्याकडे खेकडे प्रवृत्ती असल्याने चळवळ निर्माण करायला गेले की मागे पाय ओढवले जात असल्याची खंतही डॉ. संदीप तडस यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक